शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:26 IST

जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. संयुक्त चिकित्सा समितीत त्यांचाही समावेश होता. तेव्हा अंतिम मसुदा त्यांच्याच सहमतीने मंजूर केला गेला. - फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच. पण कर्जमाफी हा तत्कालिक उपाय आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे, त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. त्याच्याच शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. संयुक्त चिकित्सा समितीत त्यांचाही समावेश होता. तेव्हा अंतिम मसुदा त्यांच्याच सहमतीने मंजूर केला गेला. मसुद्यात काहीच आक्षेपार्ह नसल्याने त्यांनी तेव्हा कोणताच विरोध केला नाही आता मात्र कोणाचा तरी दबाव आल्याने त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

 विधिमंडळ सदस्यांकडून निश्चितच चांगल्या वर्तनाची अपेक्षा आहे. गोपीचंद पडळकर जेव्हा अजितदादांविरोधात बोलले तेव्हा मी त्यांना समज दिली. शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे बोलले तेव्हा मी दिलगिरी व्यक्त केली होती. पण नेहमी पडळकरच का दिसतात? दुसरे का दिसत नाहीत? दुसरे जेव्हा असे वागतात तेव्हा त्यांचे आका कोण हे शोधून काढले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधक उदासीनच : अजित पवारअधिवेशनानिमित्त विरोधकांना छाप पाडण्याची संधी होती, ती त्यांना पाडता आली नाही. त्यातून विरोधकांची अधिवेशनाबबत उदासीनता पहायला मिळाली, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या इतिहासात एवढ्या लक्षवेधी कधी झाल्या नाहीत. एका दिवशी २५-२५ लक्षवेधी आणि ११-११ अर्धा तासाच्या चर्चा  लागल्या होत्या. रात्री ३ वाजता आमच्याकडे ललक्षवेधी यायच्या, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना माहितीसाठी फोन लावायचा म्हटले तर ते झोपलेले असायचे, त्यामुळे मंत्र्यांची पंचाईत व्हायची असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी टोचले मंत्र्यांचे कानलाडकी बहीण योजनेबाबत काही मंत्र्यांची वेगवेगळी विधाने येत असतात. मंत्र्यांच्या बोलण्याच्या अधिकारावर तर मी बंदी आणू शकत नाही, मात्र मंत्र्यांनी सदसदविवेकबुद्धीने बोलावे.आपण योजना मंजूर करताना सगळे सोबत असतो. अर्थसंकल्प मंजूर करताना देखील सगळे सोबत असतो. विधिमंडळात देखील अर्थसंकल्प मंजूर होताना सगळे असतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांचे कान टोचले.गमतीच्या गोष्टी सीरियसली का घेता?उद्धव ठाकरेंना तुम्ही तुमच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे, त्याबाबत विचारले असता, अहो...उद्धवजी देखील याबाबत बोलले आहेत की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात.आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात बोललो तरी हेडलाईन होते. मी बोललो तर ती ऑफर झाली का? अलीकडच्या काळात संवाद होत असेल किंवा गंमत - जंमत होते ती का सिरियसली घेता, असा उलट सवाल फडणवीस यांनी केला.

विरोधी पक्षात एकी दिसलीच नाहीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनात विरोधी पक्षांची एकी दिसलीच नाही, असे सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावात खोटे प्रश्न होते. चुकीच्या माहितीच्या आधारावर कामकाज करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला. विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केले. मात्र, त्यांच्याकडे ठोस मुद्देच नव्हते. विधिमंडळात मारामारीचा झालेला प्रकार अक्षम्य होता, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी