शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत बुद्ध विहार उभारणार, योगी आदित्यनाथांना भेटून जागा मिळवणारः रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 12:47 IST

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. त्यावरून, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर बाण सोडत आहेत.

‘भारत बौद्धमय असताना अयोध्येचे नाव साकेत नगरी होते. अयोध्येत राम मंदिराच्या पूर्वीपासून बुद्ध विहार होते. अयोध्येतील मंदिर-मशिदीचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मार्गी लागला आहे. त्यामुळे आता अयोध्येत बुद्ध विहार उभारू, त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटून जागा मिळवू’, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईंचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी नुकतीच अयोध्येत महाबुद्धविहार बांधण्याची मागणी केली होती. तोच धागा पकडून आठवले यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आहे. अयोध्येत राम मंदिर, मशीद आणि बुद्ध विहार उभारून या सर्वधर्मसमभावाचं दर्शन जगाला घडवावं’, असं आवाहनही आठवले यांनी केलं आहे.

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. त्यावरून, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर बाण सोडत आहेत. कोरोना संकटात हे भूमिपूजन करावं का, यावरून मतमतांतरं आहेत. राम मंदिरामुळे कोरोना बरा होणार आहे का?, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलीय; तर कोरोना संकट लक्षात घेऊन या राम मंदिराचं ई-भूमिपूजन करावं, अशी सूचना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. त्यावरून, भाजपाने  त्यांना लक्ष्य केलं आहे.

राम मंदिर भूमिपूजनावरून हे राजकारण तापलं असतानाच, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी महाबुद्धविहाराचा विषय पुढे आणला आहे. अयोध्येतील उत्खननात बुद्धाच्या मूर्ती आणि बौद्ध परंपरेशी नातं सांगणारं अवशेष सापडले आहेत. ऑल इंडिया मिली कौन्सिलनेही त्या ठिकाणी साकेत नगरी असल्याचं मान्य केलं आहे. उत्खननामध्ये सापडलेल्या प्राचीन अवशेषांचे जतन करण्यासाठी अयोध्येत मोठं संग्रहालय आणि महाबुद्धविहार झालं पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी सर्व बौद्ध नेत्यांनी गटतट विसरून एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.

या संदर्भात बोलताना रामदास आठवले म्हणाले की, अयोध्येत बुद्ध विहार उभारावे, ही आमची गेल्या १० वर्षांपासूनची मागणी आहे. अयोध्येत आता राम मंदिर उभं राहणार आहे आणि मशिदीलाही स्वतंत्र जागा देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाचं आम्ही स्वागत केलं आहे. आता अयोध्येत भव्य बुद्धविहारासाठी जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी योगी आदित्यनाथ यांची भेटही आपण घेणार आहोत. देशभरातील बौद्ध जनतेचे सहकार्य घेऊन एक ट्रस्ट तयार करून अयोध्येत भव्य बुद्ध विहार उभारण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्याः

राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका

तब्बल २९ वर्ष ११ महिन्यांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते अन् अखेर तो क्षण आलाच

सुन्नी वक्फ बोर्डाकडून ट्रस्टची घोषणा, अयोध्येत मशीद बांधणार

राम मंदिर भूमिपूजनाबाबत MIM सारखंच मत मुख्यमंत्र्यांनी मांडणं आश्चर्यकारक; देवेंद्र फडणवीसांचा चिमटा

'मोदींनी राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभाला जाणं संविधानाच्या शपथेचं उल्लंघन'

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरRamdas Athawaleरामदास आठवलेAyodhyaअयोध्या