शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आपले ३०-४० आमदार विधानसभेत द्यायचेत; जरांगे यांचे उपोषण स्थगित, फडणवीसांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 07:00 IST

मी आता रॅलींची तयारी करणार आहे. ७ ते १३ ऑगस्टपर्यंत ज्या ज्या ठिकाणी वेळ दिला तेथे रॅली होणार आहे १३ ऑगस्टला नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क वडीगोद्री (जि. जालना)/मुंबई: मला जेलमध्ये टाकून मारायचे ठरवले असल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत वॉरंट ही न्यायिक प्रक्रिया असून, त्यात कोणताही डाव नाही असे स्पष्ट केले.

येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ मिळावा, या कारणास्तव मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. बुधवारी दुपारी १:३० वाजता अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हाताने ज्यूस व पाणी पिऊन त्यांनी आपल्या पाचव्या उपोषणाची सांगता केली. इथे सलाईनवर पडून राहण्यात उपयोग नाही. त्यापेक्षा मी मतदारसंघांची तयारी करतो. मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या आमदारांचा बंदोबस्त करायचा आहे, असा इशारा जरांगे यांनी दिला.

मी आता रॅलींची तयारी करणार आहे. ७ ते १३ ऑगस्टपर्यंत ज्या ज्या ठिकाणी वेळ दिला तेथे रॅली होणार आहे १३ ऑगस्टला नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली.

२ ऑगस्टला जरांगे न्यायालयात हजर होणारपुणे : नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मागील सुनावणीला हजर न राहिल्याने न्यायालयाने मंगळवारी अटक वॉरंट जारी केले होते. त्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील २ ऑगस्ट रोजी पुढील तारखेला न्यायालयात हजर राहतील, अशी माहिती त्यांचे वकील संतोष खामकर यांनी बुधवारी न्यायालयास दिली, हे वॉरंट रद्द करण्याची विनंती त्यांनी केली.

आम्ही शंभूराजे नाटक बसवले त्याच्यात तोटा आला. आता काय करता डोक्यात दगड घालता का? त्यात आम्ही तिघे होतो. तिघांनी तोटा वाटून घेतला. हे जुने प्रकरण त्यांनी आमच्या गळ्यात गुंतवून दिले.- मनोज जरांगे पाटील

आपल्याला किमान ३०-४० आमदार द्यायचेमी ४० आमदार पाडायची तयारी करतो. विधानसभेत आपले बोलायला कोणी नाही, पिकांना भाव मिळावा यासह आपले प्रश्न मांडायला कोणी नाही. त्यामुळे बारा बलुतेदारांना निवडणुकीत उभे करणार, आमच्या विचारांचे ओबीसी निवडून आणणार, असेही ते म्हणाले. २९ ऑगस्टला आम्ही ठरवणार २८८ पाडायचे की उभे करायचे. आपल्याला किमान ३०-४० आमदार द्यायचे आहेत, असेही जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांची कोर्टात जी केस आहे, ती २०१३ ची आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गैरजमानती वॉरन्ट निघालेला होता, कोर्टात हजर राहून त्यांनी तो रद्द करविला होता. एखादी व्यक्ती तारखेवर कोर्टात हजर झाली नाही, तर असा वॉरन्ट निघतो आणि ती हजर झाली की वॉरन्ट रद्द होतो, ही न्यायिक प्रक्रिया आहे. राजकीय आंदोलनांमध्ये आमच्यावर केसेस झाल्या तेव्हाही असेच व्हायचे. त्यामुळे जरांगेंना तुरुंगात टाकण्याचा डाव वगैरे काहीही नाही. तरीही ते माझ्यावर आरोप करीत आहेत. मला टार्गेट करून कोणाला फायदा होतो, माझी शक्ती, माझ्यावरील लोकांचे प्रेम कोणासाठी घातक आहे, कोणाला माझ्यापासून धोका वाटतो, माझ्याविरुद्ध कोण इको सिस्टीम चालवितो हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण