शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ; राजू शेट्टी शेट्टींची घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:17 IST

बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

ठळक मुद्देबाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरणे, हे काम आपलं आहे, या भावनेने स्वाभीमानीची वाटचाल सुरु आहे.

इस्लामपूर, दि. 26- स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पॅसेंजर रेल्वे आहे. या पॅसेंजरमध्ये अनेकजण चढले, अनेकजण उतरले. मात्र रेल्वे ही पुढेच जात आहे. या गाडीचा मी ड्रायव्हर असून ज्यांनी आमचा विचार सोडला ती एकाकी पडली आहेत, स्वाभिमानीचा अजेंडा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राखणे हा नसून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास भाग पाडणे हा आहे, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता लगावला. 

इस्लामपूर येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, "राजकारणातील उंची वाढावी, काही मिळावं, बदल्यांची दुकानदारी चालावी, ठेका मिळावा म्हणून राजकरणात उतरलेलो नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरणे, हे काम आपलं आहे, या भावनेने स्वाभीमानीची वाटचाल सुरु आहे. प्रसंगी शेतकऱ्याचे हित साध्य होत नसेल तर हातात उसाचा बुडखा घेणं हे काम आमचे आहे. 

सदाभाऊंचे नाव न घेता ते म्हणाले, "चांगले दिवस आले आहेत असे समजून आम्ही आमच्यातील एकाला दिवाळीच्या मालाची यादी काढून बाजारात पाठवला. तो बहाद्दर बाजार करण्यासाठी म्हणून आमच्या घरातून बाहेर पडला, गेला तो तिकडेच गेला. परत आला नाही. तेथूनच फोन करुन आम्हाला सांगत आहे, मी आता बाजारातच राहणार आहे, एवढ्यावर न थांबता, आमच्यातीलच काही लोकांना पैसे देतो, माझ्याकडे या असे म्हणून बोलवू लागलाय. मात्र त्याने लक्षात ठेवावे, एक दिवाळी वाया गेली म्हणून काय, पुढच्या दिवाळीला बघून घेऊ. मात्र आता तुमचे पुढे काय? याचा विचार करावा.'' 

केंद्र सरकार बाबत ते म्हणाले," भाजपवाले स्वतःला रामाचे अनुयायी म्हणून सांगतात. त्यांनी रामाचा एक तरी गुण घ्यावा. आम्हाला निवडून आल्यावर उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देतो असे आश्‍वासन दिलं होतं, ते कसं काय विसरताय. मोदींनी आम्हाला खोटं आश्‍वासन दिलं असे तरी सांगावे किंवा मोदींना शेतीतील काही कळत नसल्यामुळे त्यांनी असे आश्‍वासन दिले असे तरी सांगावे. 20 नोव्हेंबरला सातबारा कोरा करा नाही तर लाल किल्ल्यावरुन भाषण द्यायचे बंद करा हे सांगण्यासाठी देशातील 10 लाख शेतकरी दिल्लीला जाणार आहेत. सर्वांनी दिल्लील जायचय हे लक्षात ठेवावे आणि देत नसले तर नरड्यावर पाय ठेवून घ्यायचे आहे अशी मानसिकता ठेवावी. मी आता खासदार राहिलो नाही तरी काही फरक पडत नाही. मात्र शेतकऱ्यांचा घेतलेला वसा टाकणार नाही.'' 

शिवसेनेतून स्वगृही परतलेले सयाजी मोरे म्हणाले, " माझा वाद खासदार राजू शेट्टींच्या बरोबर नव्हता तर त्यांच्या बडव्याबरोबर होता. तो बडवा अडचणीत असताना राजू शेट्टींनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. ताटातील घास भरवला. त्याला आमदार केले, त्याला मंत्री केले, त्याने आता राजू शेट्टींच्या विरोधात जातीयवादी खासदार म्हणून प्रचार सुरु केला आहे. आज तुम्ही मराठा समाजाचे नाव घेवून बदनाम करता तर सदाभाऊ खोत तुम्हीच हातकणंगले मतदारसंघात निवडणूक लढवून दाखवा.'' 

स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, वाळवा तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, भागवत जाधव, आप्पासाहेब पाटील, मकरंद करळे, ऍड्‌. शमशुद्दीन संदे, संदीप राजोबा, शहाजी पाटील, महेश खराडे, तानाजी साठे, ऍड्‌. एच. आर. पाटील, संदीप नलवडे, प्रमुख उपस्थित होते.