शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ; राजू शेट्टी शेट्टींची घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:17 IST

बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

ठळक मुद्देबाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरणे, हे काम आपलं आहे, या भावनेने स्वाभीमानीची वाटचाल सुरु आहे.

इस्लामपूर, दि. 26- स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पॅसेंजर रेल्वे आहे. या पॅसेंजरमध्ये अनेकजण चढले, अनेकजण उतरले. मात्र रेल्वे ही पुढेच जात आहे. या गाडीचा मी ड्रायव्हर असून ज्यांनी आमचा विचार सोडला ती एकाकी पडली आहेत, स्वाभिमानीचा अजेंडा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राखणे हा नसून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास भाग पाडणे हा आहे, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता लगावला. 

इस्लामपूर येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, "राजकारणातील उंची वाढावी, काही मिळावं, बदल्यांची दुकानदारी चालावी, ठेका मिळावा म्हणून राजकरणात उतरलेलो नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरणे, हे काम आपलं आहे, या भावनेने स्वाभीमानीची वाटचाल सुरु आहे. प्रसंगी शेतकऱ्याचे हित साध्य होत नसेल तर हातात उसाचा बुडखा घेणं हे काम आमचे आहे. 

सदाभाऊंचे नाव न घेता ते म्हणाले, "चांगले दिवस आले आहेत असे समजून आम्ही आमच्यातील एकाला दिवाळीच्या मालाची यादी काढून बाजारात पाठवला. तो बहाद्दर बाजार करण्यासाठी म्हणून आमच्या घरातून बाहेर पडला, गेला तो तिकडेच गेला. परत आला नाही. तेथूनच फोन करुन आम्हाला सांगत आहे, मी आता बाजारातच राहणार आहे, एवढ्यावर न थांबता, आमच्यातीलच काही लोकांना पैसे देतो, माझ्याकडे या असे म्हणून बोलवू लागलाय. मात्र त्याने लक्षात ठेवावे, एक दिवाळी वाया गेली म्हणून काय, पुढच्या दिवाळीला बघून घेऊ. मात्र आता तुमचे पुढे काय? याचा विचार करावा.'' 

केंद्र सरकार बाबत ते म्हणाले," भाजपवाले स्वतःला रामाचे अनुयायी म्हणून सांगतात. त्यांनी रामाचा एक तरी गुण घ्यावा. आम्हाला निवडून आल्यावर उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देतो असे आश्‍वासन दिलं होतं, ते कसं काय विसरताय. मोदींनी आम्हाला खोटं आश्‍वासन दिलं असे तरी सांगावे किंवा मोदींना शेतीतील काही कळत नसल्यामुळे त्यांनी असे आश्‍वासन दिले असे तरी सांगावे. 20 नोव्हेंबरला सातबारा कोरा करा नाही तर लाल किल्ल्यावरुन भाषण द्यायचे बंद करा हे सांगण्यासाठी देशातील 10 लाख शेतकरी दिल्लीला जाणार आहेत. सर्वांनी दिल्लील जायचय हे लक्षात ठेवावे आणि देत नसले तर नरड्यावर पाय ठेवून घ्यायचे आहे अशी मानसिकता ठेवावी. मी आता खासदार राहिलो नाही तरी काही फरक पडत नाही. मात्र शेतकऱ्यांचा घेतलेला वसा टाकणार नाही.'' 

शिवसेनेतून स्वगृही परतलेले सयाजी मोरे म्हणाले, " माझा वाद खासदार राजू शेट्टींच्या बरोबर नव्हता तर त्यांच्या बडव्याबरोबर होता. तो बडवा अडचणीत असताना राजू शेट्टींनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. ताटातील घास भरवला. त्याला आमदार केले, त्याला मंत्री केले, त्याने आता राजू शेट्टींच्या विरोधात जातीयवादी खासदार म्हणून प्रचार सुरु केला आहे. आज तुम्ही मराठा समाजाचे नाव घेवून बदनाम करता तर सदाभाऊ खोत तुम्हीच हातकणंगले मतदारसंघात निवडणूक लढवून दाखवा.'' 

स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, वाळवा तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, भागवत जाधव, आप्पासाहेब पाटील, मकरंद करळे, ऍड्‌. शमशुद्दीन संदे, संदीप राजोबा, शहाजी पाटील, महेश खराडे, तानाजी साठे, ऍड्‌. एच. आर. पाटील, संदीप नलवडे, प्रमुख उपस्थित होते.