शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ; राजू शेट्टी शेट्टींची घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:17 IST

बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

ठळक मुद्देबाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरणे, हे काम आपलं आहे, या भावनेने स्वाभीमानीची वाटचाल सुरु आहे.

इस्लामपूर, दि. 26- स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पॅसेंजर रेल्वे आहे. या पॅसेंजरमध्ये अनेकजण चढले, अनेकजण उतरले. मात्र रेल्वे ही पुढेच जात आहे. या गाडीचा मी ड्रायव्हर असून ज्यांनी आमचा विचार सोडला ती एकाकी पडली आहेत, स्वाभिमानीचा अजेंडा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राखणे हा नसून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास भाग पाडणे हा आहे, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता लगावला. 

इस्लामपूर येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, "राजकारणातील उंची वाढावी, काही मिळावं, बदल्यांची दुकानदारी चालावी, ठेका मिळावा म्हणून राजकरणात उतरलेलो नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरणे, हे काम आपलं आहे, या भावनेने स्वाभीमानीची वाटचाल सुरु आहे. प्रसंगी शेतकऱ्याचे हित साध्य होत नसेल तर हातात उसाचा बुडखा घेणं हे काम आमचे आहे. 

सदाभाऊंचे नाव न घेता ते म्हणाले, "चांगले दिवस आले आहेत असे समजून आम्ही आमच्यातील एकाला दिवाळीच्या मालाची यादी काढून बाजारात पाठवला. तो बहाद्दर बाजार करण्यासाठी म्हणून आमच्या घरातून बाहेर पडला, गेला तो तिकडेच गेला. परत आला नाही. तेथूनच फोन करुन आम्हाला सांगत आहे, मी आता बाजारातच राहणार आहे, एवढ्यावर न थांबता, आमच्यातीलच काही लोकांना पैसे देतो, माझ्याकडे या असे म्हणून बोलवू लागलाय. मात्र त्याने लक्षात ठेवावे, एक दिवाळी वाया गेली म्हणून काय, पुढच्या दिवाळीला बघून घेऊ. मात्र आता तुमचे पुढे काय? याचा विचार करावा.'' 

केंद्र सरकार बाबत ते म्हणाले," भाजपवाले स्वतःला रामाचे अनुयायी म्हणून सांगतात. त्यांनी रामाचा एक तरी गुण घ्यावा. आम्हाला निवडून आल्यावर उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देतो असे आश्‍वासन दिलं होतं, ते कसं काय विसरताय. मोदींनी आम्हाला खोटं आश्‍वासन दिलं असे तरी सांगावे किंवा मोदींना शेतीतील काही कळत नसल्यामुळे त्यांनी असे आश्‍वासन दिले असे तरी सांगावे. 20 नोव्हेंबरला सातबारा कोरा करा नाही तर लाल किल्ल्यावरुन भाषण द्यायचे बंद करा हे सांगण्यासाठी देशातील 10 लाख शेतकरी दिल्लीला जाणार आहेत. सर्वांनी दिल्लील जायचय हे लक्षात ठेवावे आणि देत नसले तर नरड्यावर पाय ठेवून घ्यायचे आहे अशी मानसिकता ठेवावी. मी आता खासदार राहिलो नाही तरी काही फरक पडत नाही. मात्र शेतकऱ्यांचा घेतलेला वसा टाकणार नाही.'' 

शिवसेनेतून स्वगृही परतलेले सयाजी मोरे म्हणाले, " माझा वाद खासदार राजू शेट्टींच्या बरोबर नव्हता तर त्यांच्या बडव्याबरोबर होता. तो बडवा अडचणीत असताना राजू शेट्टींनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. ताटातील घास भरवला. त्याला आमदार केले, त्याला मंत्री केले, त्याने आता राजू शेट्टींच्या विरोधात जातीयवादी खासदार म्हणून प्रचार सुरु केला आहे. आज तुम्ही मराठा समाजाचे नाव घेवून बदनाम करता तर सदाभाऊ खोत तुम्हीच हातकणंगले मतदारसंघात निवडणूक लढवून दाखवा.'' 

स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, वाळवा तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, भागवत जाधव, आप्पासाहेब पाटील, मकरंद करळे, ऍड्‌. शमशुद्दीन संदे, संदीप राजोबा, शहाजी पाटील, महेश खराडे, तानाजी साठे, ऍड्‌. एच. आर. पाटील, संदीप नलवडे, प्रमुख उपस्थित होते.