शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

''आम्ही दोघे भाऊ, भांडू पण सोबतच राहू''

By यदू जोशी | Updated: October 27, 2018 03:49 IST

‘आम्ही दोघे भाऊ, भांडत राहू पण सोबतच राहू’ असे सांगत मायावती-मुलायम वा लालू-नीतीश एकत्र येऊ शकतात, तर मी आणि उद्धव ठाकरे का नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबई : ‘आम्ही दोघे भाऊ, भांडत राहू पण सोबतच राहू’ असे सांगत मायावती-मुलायम वा लालू-नीतीश एकत्र येऊ शकतात, तर मी आणि उद्धव ठाकरे का नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेनेशी युती करणे ही भाजपाची मजबुरी नाही. आम्हाला आमच्या विचारांच्या मतांचे विभाजन नको आहे एवढेच, असेही ते म्हणाले.भाजपा-शिवसेना युती सरकारला येत्या ३१ आॅक्टोबरला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी निवडक पत्रकारांशी शुक्रवारी संवाद साधला. काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आणि आम्ही वेगळे लढलो, तर नुकसान दोघांचेही होईल. अयोध्येवरून शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आहे. भाजपाही हिंदुत्ववादी पक्षआहे. अशा वेळी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत थोडेच जाणार, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली नाही. ते करतील असेही वाटत नाही, केलीच तर चर्चा करू, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले.सरकारमध्ये राहून शिवसेना सरकारला विरोध करणे अशा दुहेरी भूमिकेने राजकीय नुकसानच होते, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भाजपावर हल्ले करतात. त्यावरून आपल्याला ते जवळचे वाटतात की विरोधी पक्षनेते विखे पाटील? या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, मला उद्धवच जवळचे वाटतात. विखे हे आम्हाला सत्तेतून घालवण्यासाठी बोलतात, तर उद्धव सुधारणेसाठी बोलतात.लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावली. भविष्यात आपण केंद्रात जाणार का? या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, मी कुठेही आनंदी आहे, पण मी सध्या राज्यातच राहणार. मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार, हे मी माझ्या पक्षातील नेत्यांकडे पाहून वा त्यांना उद्देशून बोललो नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना उद्देशून बोललो होतो, असेही ते म्हणाले. स्वतंत्र विदर्भ हा केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे, असेही ते एका उत्तरात म्हणाले.काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संपर्कातराज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे चांगले इलेक्टिव्ह मेरिट असलेले नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. योग्य वेळी ते भाजपात आलेले दिसतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.>विस्तार अधिवेशनापूर्वी करणारराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १९ नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कुणाला काढायचे वा कुणाला घ्यायचे यावरून विस्तार रखडलेला नाही. काही जणांना काढले जाईल, त्याबाबत फारसा वाद नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस