शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

''आम्ही दोघे भाऊ, भांडू पण सोबतच राहू''

By यदू जोशी | Updated: October 27, 2018 03:49 IST

‘आम्ही दोघे भाऊ, भांडत राहू पण सोबतच राहू’ असे सांगत मायावती-मुलायम वा लालू-नीतीश एकत्र येऊ शकतात, तर मी आणि उद्धव ठाकरे का नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबई : ‘आम्ही दोघे भाऊ, भांडत राहू पण सोबतच राहू’ असे सांगत मायावती-मुलायम वा लालू-नीतीश एकत्र येऊ शकतात, तर मी आणि उद्धव ठाकरे का नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेनेशी युती करणे ही भाजपाची मजबुरी नाही. आम्हाला आमच्या विचारांच्या मतांचे विभाजन नको आहे एवढेच, असेही ते म्हणाले.भाजपा-शिवसेना युती सरकारला येत्या ३१ आॅक्टोबरला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी निवडक पत्रकारांशी शुक्रवारी संवाद साधला. काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आणि आम्ही वेगळे लढलो, तर नुकसान दोघांचेही होईल. अयोध्येवरून शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आहे. भाजपाही हिंदुत्ववादी पक्षआहे. अशा वेळी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत थोडेच जाणार, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली नाही. ते करतील असेही वाटत नाही, केलीच तर चर्चा करू, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले.सरकारमध्ये राहून शिवसेना सरकारला विरोध करणे अशा दुहेरी भूमिकेने राजकीय नुकसानच होते, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भाजपावर हल्ले करतात. त्यावरून आपल्याला ते जवळचे वाटतात की विरोधी पक्षनेते विखे पाटील? या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, मला उद्धवच जवळचे वाटतात. विखे हे आम्हाला सत्तेतून घालवण्यासाठी बोलतात, तर उद्धव सुधारणेसाठी बोलतात.लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावली. भविष्यात आपण केंद्रात जाणार का? या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, मी कुठेही आनंदी आहे, पण मी सध्या राज्यातच राहणार. मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार, हे मी माझ्या पक्षातील नेत्यांकडे पाहून वा त्यांना उद्देशून बोललो नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना उद्देशून बोललो होतो, असेही ते म्हणाले. स्वतंत्र विदर्भ हा केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे, असेही ते एका उत्तरात म्हणाले.काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संपर्कातराज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे चांगले इलेक्टिव्ह मेरिट असलेले नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. योग्य वेळी ते भाजपात आलेले दिसतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.>विस्तार अधिवेशनापूर्वी करणारराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १९ नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कुणाला काढायचे वा कुणाला घ्यायचे यावरून विस्तार रखडलेला नाही. काही जणांना काढले जाईल, त्याबाबत फारसा वाद नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस