शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
3
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
4
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
5
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
6
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
7
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
8
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
9
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
10
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
11
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
12
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
13
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
14
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
15
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
16
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
17
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
18
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
19
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
20
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

मोठी बातमी! धनगर आरक्षणाचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही; केंद्र सरकारचं लेखी उत्तर

By प्रविण मरगळे | Updated: March 17, 2025 19:46 IST

राज्य शासनाने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा आणि त्वरीत तो केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली.

सांगली - गेल्या अनेक वर्षापासून राज्यात धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. धनगरांचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा या मागणीसाठी बऱ्याचदा मोर्चे काढण्यात येतात. परंतु मागील ४३ वर्षात राज्य शासनाकडून धनगर आरक्षणाबाबत कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला नाही आणि कुठलाही प्रस्ताव प्रलंबित नाही अशी धक्कादायक माहिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारकडून याबाबत लेखी उत्तर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना देण्यात आले आहे. त्यामुळे धनगर आरक्षणावरून सत्ताधारी नेत्यांकडून केवळ आश्वासन मिळत असल्याचं सत्य समोर आले आहे.

याबाबत खासदार विशाल पाटील म्हणाले की, धनगर आरक्षणाबाबत कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडून आलेला नाही. १९७९ साली धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली होती. त्यानंतर १९८१ साली केंद्र सरकारकडून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या यादीत बसू शकत नाही राज्याला कळवण्यात आले. त्यानंतर आजतागायत म्हणजे जवळपास ४३ वर्षात महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षणाबाबतीत कुठलाही प्रस्ताव अथवा पत्र दिले नाही असं लेखी उत्तर केंद्रीय आदिवासी मंत्रालयाकडून मिळालं असल्याचं त्यांनी सांगितले.

धनगर आरक्षणाबाबत विशाल पाटील यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्र्‍यांकडून लेखी उत्तर मागितले होते. त्यावर केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य शासनाने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा आणि त्वरीत तो केंद्र सरकारकडे पाठवावा. धनगर समाजाची मोठी मागणी आहे. त्याची दखल सरकारने घ्यावी. महाराष्ट्राचा खासदार म्हणून सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा म्हणून मी याचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे करू. कुठल्याही समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याची शिफारस राज्य सरकारला करावी लागते त्यामुळे राज्याने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा अशी मागणीही खासदार विशाल पाटील यांनी केली.

एका रात्रीत परिपत्रक बदलण्याची नामुष्की

महाराष्ट्र राज्यातील महसूल व वने विभागाच्या १९९६ च्या अधिसूचनेमध्ये धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आला होता. राज्यात ‘धनगर’ आणि ‘धनगड’ हा वाद सुरू आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी‘धनगर ऐवजी धनगड वाचावे’ असे शुध्दीपत्रक महसूल विभागाने काढले होते. त्यावरून ज्या अधिकाऱ्याने हे शुद्धीपत्रक काढले त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी धनगर नेत्यांनी केली होती. धनगर समाजाच्या विरोधानंतर हे शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द केले होते. राज्यात धनगर समाजाचा अनुसूचित प्रवर्गात समाविष्ट करायला आदिवासी समाजाचा विरोध आहे. त्यात मागील २ निवडणुकीत धनगर समाजाने राज्यात आरक्षणाच्या मागणीचा लढा तीव्र केला होता. त्यावेळी भाजपाने आमचे सरकार आल्यानंतर धनगरांना एसटीतून आरक्षण देऊ असं आश्वासन दिले होते. परंतु गेल्या १० वर्षात भाजपा शासन असतानाही असा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला नसल्याचं केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या उत्तरातून पुढे आले आहे. 

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणvishal patilविशाल पाटीलBJPभाजपा