शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Devendra Fadnavis : आमच्यात खात्यांसंदर्भात वाद नाही; पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 18:37 IST

आमच्यात खात्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा वाद नाही. खाते कोणते ते महत्वाचे नाही, तर ते चालवणारे योग्य व्यक्ती असायला हवेत.

राज्यातील एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप आज पार पडले. यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, आमच्यात खात्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा वाद नाही. त्यामुळे त्यांना वाटले आमच्याकडे एखादे खाते त्यांना हवे आहे, तर आम्ही देऊ आणि आम्हाला वाटले, की त्यांच्याकडे एखादे खाते आम्हाला हवे आहे, तर आम्ही ते घेऊ. तसेच, पुढचा विस्तार केव्हा करायचा, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. ते योग्य वेळ पाहून ठरवतील, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप केले आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंत्री मिळालेल्या खात्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू. सध्या आमचे मंत्रीमंडळ अर्ध्यापेक्षाही छोटे आहे. यामुळे अधिक भार आमच्यावर आहे. लवकरच पुन्हा आमचा विस्तार होईल. तेव्हा यातील काही खाती आमच्या सहकाऱ्यांकडे जातील. तोवर, ज्यांच्याकडे जी खाती आली आहेत त्यांना संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते."

तसेच, "सध्या जी अधिकची खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत आणि जी आमच्याकडे आहेत. ती साधारणपणे त्यात्या पक्षांकडेच असतात. पण, अगदीच तसेच नाही, त्यांना वाटले आमच्याकडे एखादे खाते त्यांना हवे आहे, तर आम्ही देऊ आणि आम्हाला वाटले, की त्यांच्याकडे एखादे खाते आम्हाला हवे आहे, तर आम्ही ते घेऊ. आमच्यात खात्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा वाद नाही. खाते कोणते ते महत्वाचे नाही, तर ते चालवणारे योग्य व्यक्ती असायला हवेत. त्या दृष्टीने, सध्या तरी असे वाटते, की पुढील विस्तारात त्यांच्याकडची खाती ते त्यांच्या लोकांना देतील आणि आमच्याकडची खाती आम्ही आमच्या लोकांना मिळतील. मात्र, त्यात काही बदल करायचा असेल, तर तसे आम्ही बसून करू शकतो."

यावेळी, पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार? असे विचारले असता, फडणवीस म्हणाले, पुढचा विस्तार केव्हा करायचा, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. ते योग्यवेळ पाहून ठरवतील.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारEknath Shindeएकनाथ शिंदे