शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

'स्थगिती अन् चौकशांना आम्ही घाबरत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 04:06 IST

फडणवीस यांचे सरकारला आव्हान

मुंबई : विसंवादी, स्थगिती आणि चौकशी सरकारला घाबरत नाही, खुशाल चौकशी करा, असे आव्हान देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी यावरून सरकारला विधिमंडळ अधिवेशनात विरोधक घेरणार असल्याचा पवित्रा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.‘महाविकास आघाडी सरकारची दिशाही ठरत नाही आणि सरकारला सूरही गवसत नाही. मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांना सुसंवादासाठी बोलावतात, पण सत्तेतील तीन पक्षांमध्येच संवाद नाही, आधी तो साधा, असा सल्ला देत चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत’, असे फडणवीस यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.दिसेल त्या कामाला स्थगिती देणारे हे सरकार आहे. जलयुक्त शिवार योजना सरकार बंद करेल, पण जनता ती बंद होऊ देणार नाही. ही योजना, वृक्षलागवडीची खुशाल चौकशी करा, घाबरतो कोण? दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी 

फसवी आहे. शेडनेट, पशुपालनाचे कर्ज माफ केलेले नाही. आम्ही ते केले होते. महिलांवरील अत्याचार पराकोटीला गेले आहेत. पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. गुन्हेगारी वाढली आहे त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवू. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. 'शिदोरी' मासिकावर कारवाई करावीच लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिकाच काढायची असेल तर १९९९ पासून २०१९ पर्यंतच्या आर्थिक स्थितीवर काढा, कोणी काय केले ते समोर येईल, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यावर सातत्याने काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे. गांधी घराण्यातील कोणावर टीका झाली तर शिवसेनेकडून पाच मिनिटात माफी मागण्यात येते. मात्र सावरकरांबाबत काँग्रेसकडून सातत्याने टीका करण्यात आली तरी शिवसेना त्याबाबत काहीच बोलत नाही, सत्तेसाठी किती दिवस विचारांशी तडजोड करणार असा सवालही फडणवीस यांनी केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आदी उपस्थित होते. रासपचे महादेव जानकर वा रिपाइंकडून कोणीही हजर नव्हते.पवारांवर साधला निशाणाएल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण एकच आहे हे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या वक्तव्यातून बुद्धिभेद आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी यामध्ये हिंदुत्ववाद्यांचा हात असल्याबाबत आरोप केले होते.आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामधून त्यांच्या या विधानाला छेद मिळत आहे.त्यामुळे ते अशी विधाने करून दलित समाजामध्ये गोंधळ निर्माण करू पाहत आहेत असा निशाणा फडणवीस यांनी साधला.मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनसुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय लोकसंख्या सूची कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे फडणवीस यांनी स्वागत केले. एल्गार प्रकरणी तपास एनआयएकडे सोपवण्याच्या निर्णयाचेदेखील फडणवीस यांनी स्वागत केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे