शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कसा पाहता येईल जेतेपदासाठीचा ऐतिहासिक सामना?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

आम्ही निष्पाप आहोत - भुजबळ

By admin | Updated: February 10, 2016 04:42 IST

‘आम्ही निष्पाप आहोत... पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही... आम्ही चौकशीत पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. मात्र, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला क्लीन चिट दिली

मुंबई : ‘आम्ही निष्पाप आहोत... पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही... आम्ही चौकशीत पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. मात्र, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला क्लीन चिट दिली, म्हणून त्यांच्या बदल्या करणे, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे अशा गोष्टी चालू आहेत. अधिकाऱ्यांना माफीचा साक्षीदार करतो, म्हणून घाबरवले जात आहे. मीसुद्धा चौकशी समितीला हव्या त्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे,’ अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या भुजबळ यांचे दुपारी मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तेथून गाड्यांचा ताफा नरिमन पॉइंट येथील राष्ट्रवादी भवन येथे आला. तेथे अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त होता. पूर्ण तयारीनिशी पत्रकार परिषदेत आलेल्या भुजबळांंनी एकाही राजकीय प्रश्नाला उत्तर दिले नाही. आपण निष्पाप आहोत, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत, यापलीकडे ते काहीही बोलण्याच्या तयारीत नव्हते. आपल्यामागे भाजपाचे केंद्रातील नेते लागले आहेत की राज्यातील, या प्रश्नावरही माझ्यामागे कोणीही लागले नाही, सगळे माझ्या पाठीशी आहेत, असे तिरकस उत्तर त्यांनी दिले. ‘राज्यात १ फेब्रुवारीपासून बऱ्याच गोष्टी घडू लागल्या. मी ३१ जानेवारीच्या रात्री वॉशिंग्टनला रवाना होताच, मी ऐन वेळी निघून गेलो, पळून गेलो, अशा चर्चा झाल्या. मी परतणारच नाही, असेही सांगितले गेले. मला २५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या मेंबर्स आॅफ कॉमर्सने तेथे येण्याचे निमंत्रण दिले होते. तेथे ३ दिवसांचे अधिवेशन होते. त्यासाठी १४० देशांचे प्रतिनिधी येणार होते आणि ४ फेब्रुवारी रोजी तेथे बराक ओबामा येणार असल्याचेही पत्र मला आले. खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी असा सगळ्यांचा त्यात सहभाग होता. मीही सहभागी झालो होतो,’ असे सांगत त्यांनी कार्यक्रम पत्रिकाच दाखवली.अतिरिक्त मुख्य सचिवांनी क्लीन चिट दिली!‘सरकारने घेतलेले निर्णय तुमच्यासमोर आहेत. सगळ्या फायली तुमच्याकडे आहेत. कलिना आणि महाराष्ट्र सदन प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिवांसह अनेक अधिकारी व खुद्द बांधकाममंत्र्यांनी मला क्लीन चिट दिली. यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी सहा महिने चौकशी केली, नंतर ही क्लीन चिट दिली. तरीही एका रात्रीत नागपुरात बसून हा अहवाल बदलला गेला आणि ती क्लीन चिट नाही असे सांगण्यात आले. त्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या, तर काहींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. काहींना माफीचा साक्षीदार व्हा, पण आम्ही सांगतो ते कबूल करा, असा दम दिला गेला. अधिकारीदेखील अटकेला घाबरतात, म्हणून हे चालू आहे,’ असा जोरदार आरोप भुजबळ यांनी केला....तर तेव्हाच पळून गेलो असतो!‘मी या अधिवेशनाविषयी शरद पवार यांच्याशीही चर्चा केली होती. मी अशा कार्यक्रमांना जायला पाहिजे, असे त्यांनी सांगितल्याने मी गेलो. जूनमध्येच एफआयआर दाखल झाला होता. आता फेब्रुवारी आहे. पळून जायचे असते, तर तेव्हाच गेलो असतो. एसीबीकडे चौकशी चालू असताना मी तीन वेळा पाच-सहा तास चौकशीस गेलो. अधिकारी, पंकज, समीरही गेले. चौकशीत पूर्ण सहकार्य करत होतो. दरम्यान, ईडीने ईसीआर नोंदवला. महाराष्ट्र सदन, कलिनाप्रकरणी एफआयआर दाखल झाले, असे भुजबळ म्हणाले.