शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाणीबाणी ! लोणावळ्यात 24 तासात 221 मिमी पावसाची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 10:46 IST

लोणावळा शहर व परिसरात मंगळवारी (29 ऑगस्ट) धुव्वाधार पाऊस झाला. 24 तासांत शहरात 221 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले.

लोणावळा, दि. 30 - लोणावळा शहर व परिसरात मंगळवारी (29 ऑगस्ट) धुव्वाधार पाऊस झाला. 24 तासांत शहरात 221 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले. पाऊस थांबल्याने परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला असून नागरिकांना काहिसा सुटकेचा निश्वास टाकला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टाटा कंपनीच्या वळवण धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे ऐन गणेशोत्सवात वळवण, वरसोली, मळवली, जवळकरवस्ती, खत्री फार्म या भागासह मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुराचा तडाखा बसणार अशी साधारण शक्यता निर्माण झालेली असताना पावसाने घेतलेली विश्रांती सर्वांकरिता दिलासादायक ठरली आहे.मुसळधार पावसाने मुंबईतील रस्ते बंद झाल्याने मुंबई पुणे द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक मंगळवारी सायंकाळ बंद करण्यात आली होती. ती रात्री उशिरा पुन्हा सुरू करण्यात आली. वलवण धरणातून डक्ट लाईनच्या माध्यमातून शक्य तेवढे पाणी खोपोली भागात सोडत धरणाची पातळी कमी करण्याचे प्रयत्न टाटा कंपनी प्रशासनाकडून सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्यास शहराच्या काही भागाला पूर्ण विळखा बसू शकतो, असे असले तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण मात्र सतर्क रहावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे.

मावळात ढगफुटी होण्याची अफवा मुंबईमध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मावळ तालुक्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे संदेश मंगळवारी रात्रभर सोशल मीडियावरुन वायरल झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

पवना धरणाचा विसर्ग वाढविला पवन मावळातील पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यातच पावसाचा जोर वाढत राहिल्याने मंगळवारी रात्री अकरा वाजता धरणातून 7 हजार 500 क्युसेक्सने पाणी पवना नदीत सोडण्यात आल्याने शिवली पूल पाण्याखाली गेला तर बेबेडोअळ पुलाला पाणी लागले आहे. मावळातील वाडीवळे धरणातून 4 हजार 600, कासारसाई धरणातून 300 तर आंद्रा धरणातून 1 हजार 150 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने ग्रामीण भागातील व विशेषतः नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा मावळचे तहसिलदार रणजित देसाई यांनी दिला आहे. तसेच आपतकालिन स्थितीत मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.