शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबाणी ! लोणावळ्यात 24 तासात 221 मिमी पावसाची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 10:46 IST

लोणावळा शहर व परिसरात मंगळवारी (29 ऑगस्ट) धुव्वाधार पाऊस झाला. 24 तासांत शहरात 221 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले.

लोणावळा, दि. 30 - लोणावळा शहर व परिसरात मंगळवारी (29 ऑगस्ट) धुव्वाधार पाऊस झाला. 24 तासांत शहरात 221 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले. पाऊस थांबल्याने परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला असून नागरिकांना काहिसा सुटकेचा निश्वास टाकला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टाटा कंपनीच्या वळवण धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे ऐन गणेशोत्सवात वळवण, वरसोली, मळवली, जवळकरवस्ती, खत्री फार्म या भागासह मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुराचा तडाखा बसणार अशी साधारण शक्यता निर्माण झालेली असताना पावसाने घेतलेली विश्रांती सर्वांकरिता दिलासादायक ठरली आहे.मुसळधार पावसाने मुंबईतील रस्ते बंद झाल्याने मुंबई पुणे द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक मंगळवारी सायंकाळ बंद करण्यात आली होती. ती रात्री उशिरा पुन्हा सुरू करण्यात आली. वलवण धरणातून डक्ट लाईनच्या माध्यमातून शक्य तेवढे पाणी खोपोली भागात सोडत धरणाची पातळी कमी करण्याचे प्रयत्न टाटा कंपनी प्रशासनाकडून सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्यास शहराच्या काही भागाला पूर्ण विळखा बसू शकतो, असे असले तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण मात्र सतर्क रहावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे.

मावळात ढगफुटी होण्याची अफवा मुंबईमध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मावळ तालुक्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे संदेश मंगळवारी रात्रभर सोशल मीडियावरुन वायरल झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

पवना धरणाचा विसर्ग वाढविला पवन मावळातील पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यातच पावसाचा जोर वाढत राहिल्याने मंगळवारी रात्री अकरा वाजता धरणातून 7 हजार 500 क्युसेक्सने पाणी पवना नदीत सोडण्यात आल्याने शिवली पूल पाण्याखाली गेला तर बेबेडोअळ पुलाला पाणी लागले आहे. मावळातील वाडीवळे धरणातून 4 हजार 600, कासारसाई धरणातून 300 तर आंद्रा धरणातून 1 हजार 150 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने ग्रामीण भागातील व विशेषतः नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा मावळचे तहसिलदार रणजित देसाई यांनी दिला आहे. तसेच आपतकालिन स्थितीत मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.