शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

तब्बल ६८ वर्षांनी वापरले विहिरीचे पाणी!

By admin | Updated: May 23, 2016 04:48 IST

निजाम राजवटीतील रझाकाराच्या क्रौर्यकथेतील देवणीच्या ऐतिहासिक गढीतील विहिरीच्या नशिबी गेली ६८ वर्षे असलेला कलंक यंदा पुसला गेला. ‘रक्ताची विहीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

चेतन धनुरे,  उदगीरनिजाम राजवटीतील रझाकाराच्या क्रौर्यकथेतील देवणीच्या ऐतिहासिक गढीतील विहिरीच्या नशिबी गेली ६८ वर्षे असलेला कलंक यंदा पुसला गेला. ‘रक्ताची विहीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विहिरीचे मोल या भीषण दुष्काळात लोकांना कळाले़ देवणीकर आता याच विहिरीतील पाणी पीत आहेत.देवणी शहराच्या जुन्या गावभागात निजाम राजवटीत एक जुनी गढी होती़ या गढीतून काही वर्षे निजामाचा महसुली कारभार हाकला गेला़ परंतु रझाकारांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी गढी ताब्यात घेऊन निजामाविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध चेतविले. ही गढी रझाकारांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या देवणीतील स्वातंत्र्यसैनिकांचे जणू ठाणे बनली. तब्बल २ हजार स्वातंत्र्यसैनिक या गढीत राहायचे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी या राजवटीतून मुक्ती मिळाली़ परंतु तोपर्यंत रझाकारांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी या गढीतील अनेकांचे जीव घेतले. नाकाबंदी झाल्यावर भुकेने व्याकुळ झालेल्या अनेकांनी या विहिरीत उड्या मारुन जीव दिल्याच्या आख्यायिका आहेत. आत घुसलेल्या रझाकारांनीही गढीतील माणसांना मारून मृतदेह गढीतील विहिरीत टाकल्याचे सांगितले जाते.स्वातंत्र्यानंतर काही वर्षे ही गढी पोलीस विभागाच्या वापरात होती.जुने पोलीस ठाणे असेही याला संबोधण्यात यायचे़ विशेष म्हणजे, या जागेचा वापर झाला तरी मात्र येथील विहिरीचा मात्र कधीच वापर झाला नाही. या आठवणी पुसताना ग्रामपंचायतीने बुलडोझर फिरवून गढी भुईसपाट केली. गढी कोसळली, मात्र गढीचा कलंकित इतिहास घेऊन आतील ती पुरातन विहीर मात्र तशीच होती. गेल्या ६८ वर्षांत तिचे पाणी कधीच आटले नाही. परंतु लोकांनी तिचे पाणी साधे ओंजळीतही घेतले नाही. लोक या ‘रक्ताच्या विहिरी’कडे कधी फिरकायचेही नाहीत अन् लेकराबाळांनाही तिकडे जाऊ देत नसत.मात्र, यंदाच्या दुष्काळाने या विहिरीचा कलंक पुसला. देवणीकरांनी या विहिरीचे पाणी उपसायला सुरू केले आहे. या विहिरीवर कधीही गेले तरी पाच पन्नास माणसे पाणी भरतायत. हीच विहीर जलसंजीवनी बनून ३० हजार लोकसंख्येचे शहर असलेल्या अर्ध्या देवणीची तृष्णा भागवत आहे.देवणीतील ज्येष्ठ नागरिक बसवणप्पा लांडगे हे इतिहास चाळताना म्हणाले, ही चांगली गोष्ट झाली. त्यावेळी क्रूरपणे हत्या केल्या जात असल्याने जवळपास २ हजार नागरिकांनी या गढीत आसरा घेतला होता़ मधे गोदाम असल्याने तेथील धान्यावर त्यांची काही काळ गुजराण झाली़ परंतु, धान्य संपले. आत धान्य नाही; बाहेर रझाकार. रोज संघर्ष पाचवीला पुजलेला. काही लोकांनी विहिरीत उड्या टाकून जीवन संपविले़ त्यामुळे अख्खा गाव ‘रक्ताची विहीर’ असेच त्या विहिरीला म्हणायचा. मात्र, त्यास बरीच वर्षे होऊन गेली़ आता हे पाणी स्वच्छ आहे़ त्यामुळे लोक इतिहास विसरून आपली गरज भागवीत आहेत़