शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

तब्बल ६८ वर्षांनी वापरले विहिरीचे पाणी!

By admin | Updated: May 23, 2016 04:48 IST

निजाम राजवटीतील रझाकाराच्या क्रौर्यकथेतील देवणीच्या ऐतिहासिक गढीतील विहिरीच्या नशिबी गेली ६८ वर्षे असलेला कलंक यंदा पुसला गेला. ‘रक्ताची विहीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

चेतन धनुरे,  उदगीरनिजाम राजवटीतील रझाकाराच्या क्रौर्यकथेतील देवणीच्या ऐतिहासिक गढीतील विहिरीच्या नशिबी गेली ६८ वर्षे असलेला कलंक यंदा पुसला गेला. ‘रक्ताची विहीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विहिरीचे मोल या भीषण दुष्काळात लोकांना कळाले़ देवणीकर आता याच विहिरीतील पाणी पीत आहेत.देवणी शहराच्या जुन्या गावभागात निजाम राजवटीत एक जुनी गढी होती़ या गढीतून काही वर्षे निजामाचा महसुली कारभार हाकला गेला़ परंतु रझाकारांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी गढी ताब्यात घेऊन निजामाविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध चेतविले. ही गढी रझाकारांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या देवणीतील स्वातंत्र्यसैनिकांचे जणू ठाणे बनली. तब्बल २ हजार स्वातंत्र्यसैनिक या गढीत राहायचे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी या राजवटीतून मुक्ती मिळाली़ परंतु तोपर्यंत रझाकारांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी या गढीतील अनेकांचे जीव घेतले. नाकाबंदी झाल्यावर भुकेने व्याकुळ झालेल्या अनेकांनी या विहिरीत उड्या मारुन जीव दिल्याच्या आख्यायिका आहेत. आत घुसलेल्या रझाकारांनीही गढीतील माणसांना मारून मृतदेह गढीतील विहिरीत टाकल्याचे सांगितले जाते.स्वातंत्र्यानंतर काही वर्षे ही गढी पोलीस विभागाच्या वापरात होती.जुने पोलीस ठाणे असेही याला संबोधण्यात यायचे़ विशेष म्हणजे, या जागेचा वापर झाला तरी मात्र येथील विहिरीचा मात्र कधीच वापर झाला नाही. या आठवणी पुसताना ग्रामपंचायतीने बुलडोझर फिरवून गढी भुईसपाट केली. गढी कोसळली, मात्र गढीचा कलंकित इतिहास घेऊन आतील ती पुरातन विहीर मात्र तशीच होती. गेल्या ६८ वर्षांत तिचे पाणी कधीच आटले नाही. परंतु लोकांनी तिचे पाणी साधे ओंजळीतही घेतले नाही. लोक या ‘रक्ताच्या विहिरी’कडे कधी फिरकायचेही नाहीत अन् लेकराबाळांनाही तिकडे जाऊ देत नसत.मात्र, यंदाच्या दुष्काळाने या विहिरीचा कलंक पुसला. देवणीकरांनी या विहिरीचे पाणी उपसायला सुरू केले आहे. या विहिरीवर कधीही गेले तरी पाच पन्नास माणसे पाणी भरतायत. हीच विहीर जलसंजीवनी बनून ३० हजार लोकसंख्येचे शहर असलेल्या अर्ध्या देवणीची तृष्णा भागवत आहे.देवणीतील ज्येष्ठ नागरिक बसवणप्पा लांडगे हे इतिहास चाळताना म्हणाले, ही चांगली गोष्ट झाली. त्यावेळी क्रूरपणे हत्या केल्या जात असल्याने जवळपास २ हजार नागरिकांनी या गढीत आसरा घेतला होता़ मधे गोदाम असल्याने तेथील धान्यावर त्यांची काही काळ गुजराण झाली़ परंतु, धान्य संपले. आत धान्य नाही; बाहेर रझाकार. रोज संघर्ष पाचवीला पुजलेला. काही लोकांनी विहिरीत उड्या टाकून जीवन संपविले़ त्यामुळे अख्खा गाव ‘रक्ताची विहीर’ असेच त्या विहिरीला म्हणायचा. मात्र, त्यास बरीच वर्षे होऊन गेली़ आता हे पाणी स्वच्छ आहे़ त्यामुळे लोक इतिहास विसरून आपली गरज भागवीत आहेत़