शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ६८ वर्षांनी वापरले विहिरीचे पाणी!

By admin | Updated: May 23, 2016 04:48 IST

निजाम राजवटीतील रझाकाराच्या क्रौर्यकथेतील देवणीच्या ऐतिहासिक गढीतील विहिरीच्या नशिबी गेली ६८ वर्षे असलेला कलंक यंदा पुसला गेला. ‘रक्ताची विहीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

चेतन धनुरे,  उदगीरनिजाम राजवटीतील रझाकाराच्या क्रौर्यकथेतील देवणीच्या ऐतिहासिक गढीतील विहिरीच्या नशिबी गेली ६८ वर्षे असलेला कलंक यंदा पुसला गेला. ‘रक्ताची विहीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विहिरीचे मोल या भीषण दुष्काळात लोकांना कळाले़ देवणीकर आता याच विहिरीतील पाणी पीत आहेत.देवणी शहराच्या जुन्या गावभागात निजाम राजवटीत एक जुनी गढी होती़ या गढीतून काही वर्षे निजामाचा महसुली कारभार हाकला गेला़ परंतु रझाकारांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी गढी ताब्यात घेऊन निजामाविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध चेतविले. ही गढी रझाकारांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या देवणीतील स्वातंत्र्यसैनिकांचे जणू ठाणे बनली. तब्बल २ हजार स्वातंत्र्यसैनिक या गढीत राहायचे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी या राजवटीतून मुक्ती मिळाली़ परंतु तोपर्यंत रझाकारांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी या गढीतील अनेकांचे जीव घेतले. नाकाबंदी झाल्यावर भुकेने व्याकुळ झालेल्या अनेकांनी या विहिरीत उड्या मारुन जीव दिल्याच्या आख्यायिका आहेत. आत घुसलेल्या रझाकारांनीही गढीतील माणसांना मारून मृतदेह गढीतील विहिरीत टाकल्याचे सांगितले जाते.स्वातंत्र्यानंतर काही वर्षे ही गढी पोलीस विभागाच्या वापरात होती.जुने पोलीस ठाणे असेही याला संबोधण्यात यायचे़ विशेष म्हणजे, या जागेचा वापर झाला तरी मात्र येथील विहिरीचा मात्र कधीच वापर झाला नाही. या आठवणी पुसताना ग्रामपंचायतीने बुलडोझर फिरवून गढी भुईसपाट केली. गढी कोसळली, मात्र गढीचा कलंकित इतिहास घेऊन आतील ती पुरातन विहीर मात्र तशीच होती. गेल्या ६८ वर्षांत तिचे पाणी कधीच आटले नाही. परंतु लोकांनी तिचे पाणी साधे ओंजळीतही घेतले नाही. लोक या ‘रक्ताच्या विहिरी’कडे कधी फिरकायचेही नाहीत अन् लेकराबाळांनाही तिकडे जाऊ देत नसत.मात्र, यंदाच्या दुष्काळाने या विहिरीचा कलंक पुसला. देवणीकरांनी या विहिरीचे पाणी उपसायला सुरू केले आहे. या विहिरीवर कधीही गेले तरी पाच पन्नास माणसे पाणी भरतायत. हीच विहीर जलसंजीवनी बनून ३० हजार लोकसंख्येचे शहर असलेल्या अर्ध्या देवणीची तृष्णा भागवत आहे.देवणीतील ज्येष्ठ नागरिक बसवणप्पा लांडगे हे इतिहास चाळताना म्हणाले, ही चांगली गोष्ट झाली. त्यावेळी क्रूरपणे हत्या केल्या जात असल्याने जवळपास २ हजार नागरिकांनी या गढीत आसरा घेतला होता़ मधे गोदाम असल्याने तेथील धान्यावर त्यांची काही काळ गुजराण झाली़ परंतु, धान्य संपले. आत धान्य नाही; बाहेर रझाकार. रोज संघर्ष पाचवीला पुजलेला. काही लोकांनी विहिरीत उड्या टाकून जीवन संपविले़ त्यामुळे अख्खा गाव ‘रक्ताची विहीर’ असेच त्या विहिरीला म्हणायचा. मात्र, त्यास बरीच वर्षे होऊन गेली़ आता हे पाणी स्वच्छ आहे़ त्यामुळे लोक इतिहास विसरून आपली गरज भागवीत आहेत़