शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल : पालिका

By admin | Updated: May 21, 2016 02:18 IST

पालिका प्रशासनाने मात्र यंदाच्या पावसाळ्यात १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल, असा दावा शुक्रवारी केला़

मुंबई : नालेसफाईवरून राजकीय कलगीतुरा रंगला असताना पालिका प्रशासनाने मात्र यंदाच्या पावसाळ्यात १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल, असा दावा शुक्रवारी केला़ तसेच पाणी तुंबण्याची संवेदनशील ठिकाणेही ४० वरून तीनवर आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़नालेसफाईच्या कामावरून राजकीय चिखलफेक सुरू आहे़ विरोधकांनी पोलखोल करण्याचा इशारा दिल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने पाणी तुंबल्यास पालिका प्रशासनालाच जबाबदार धरून आपला बचाव केला आहे़ नालेसफाईवरून चर्चेचा गाळ उडत असल्याने अखेर पालिका प्रशासनाने आज मौन सोडून आपली बाजू पत्रकार परिषदेतून मांडली़मुंबईत या वर्षी एक महिन्याआधीच म्हणजे १५ मार्च रोजी नाल्यांमधील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे़ त्यानुसार आतापर्यंत मुख्य नाल्यांमधील ६६ टक्के तर वॉर्डमार्फत सुरू असलेल्या छोट्या नाल्यांची सफाई ३५ टक्के झाल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला़ >पाणी तुंबण्याची ठिकाणे अवघी तीनपावसाळ्यात मुंबईत ४० ठिकाणी हमखास पाणी साचत होते़ या ठिकाणांना संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले होते़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे आता केवळ हिंदमाता, सायन रोड क्ऱ २४ आणि नायर रुग्णालयाचे प्रवेशद्वार येथेच पाणी तुंबण्याची शक्यता आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला़हिंदमाता पूरमुक्त करण्यासाठी बांधलेले ब्रिटानिया पंपिंग स्टेशन ३१ मेपासून कार्यान्वित होणार आहे़मुंबईत पावसाचे पाणी उपसण्यासाठी २९३ पंप लावण्यात येणार आहेत़>पाणी तुंबणार, मात्र १५ मिनिटेचताशी २५ मि़मी़ पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मि़मी़पर्यंत वाढविण्यात आली आहे़ त्यापुढे पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढू शकत नाही़ मात्र मोठ्या लाटा आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी तुंबले तरी ते १५ ते २० मिनिटेच तुंबेल, असा दावा देशमुख यांनी केला आहे़>छोट्या नाल्यांच्या सफाईत अडथळाछोट्या नाल्यांच्या सफाईसाठी मागविलेली निविदा ३०० टक्के जादा दराने आल्या होत्या़ दुसऱ्या वेळीच दोनशे आणि त्यानंतर ८० टक्के जादा दराच्या निविदा आल्यामुळे अखेर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी विभागस्तरावरच कामगारांमार्फत छोट्या नाल्यांची सफाई सुरू केली़ यामुळेच आतापर्यंत ३५ टक्केच नाले साफ झाले आहेत़गाळ टाकण्यासाठी पालिकेची जागानाल्यांमधील गाळ टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नसल्याने गेली तीन ते चार वर्षे पालिकेची मोठी अडचण निर्माण झाली होती़ मुंबईशेजारील गावांमध्येही पालिकेने जागा देण्याची विनंती केली़ मात्र अन्य महापालिकांनी नकारघंटाच वाजवली़ त्यामुळे ठेकेदारांनाच गाळ टाकण्याची जागा शोधण्यास बंधनकारक करण्यात आले होते़ यामुळेच घोटाळा करण्याची संधी ठेकेदारांना मिळाली़ बनावट प्रमाणपत्र दाखवून गाळ मुंबईबाहेर नेल्याचे ठेकेदार भासवत होते़ त्यामुळे पालिकेने या वर्षी नाल्यांमधील गाळ टाकण्यासाठी ठाणे जिल्ह्यात नऊ डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था केली आहे़