शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

पाणीपुरवठा मंत्री लोणीकर गोंधळले

By admin | Updated: December 17, 2014 06:17 IST

उल्हास नदीवरील पाणी नियोजनात करण्यात आलेल्या कपातीच्या प्रश्नावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर चांगलेच गोंधळले.

नागपूर : उल्हास नदीवरील पाणी नियोजनात करण्यात आलेल्या कपातीच्या प्रश्नावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर चांगलेच गोंधळले. मंत्र्यांना सुरुवातीपासूनच एकाही प्रश्नाचे उत्तर देणे जमले नाही. यामुळे सभागृहात सरकारवर नामुष्कीची वेळ आली. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची बाजू सावरली. या प्रश्नावर लोणीकर यांच्या खात्याशी संबंधित सर्व उत्तरे स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रश्नोत्तराच्या तासात आ. रुपेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी पाणी नियोजनात दाखविण्यात आलेल्या १५ टक्के तुटीचा प्रश्न उपस्थित केला. ही कपात करू नये अशी मागणी करीत पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या वाढविणार का, असा प्रश्न त्यांनी केला. यावर उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भंबेरी उडाली. काय बोलावे हे त्यांना सूचतच नव्हते. हे पाहून सभागृहातील सदस्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. यावर अध्यक्षांनी मंत्र्यांना सांभाळून घ्या, अशी सूचना सदस्यांना केली. मंत्री गोंधळल्यामुळे सरकारची होत असलेली नामुष्की पाहून परिस्थिती सावरण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उठले व कपात कालावधी मोठा असल्यामुळे मागणी एवढे टँकर देऊ, असे सांगितले. यानंतर अजित पवार यांनी वरच्या धरणात पाणी कपात करण्यात आल्यामुळे उल्हास नदीत पाणी कपात केली का, अशी विचारणा मंत्र्यांना केली. पवारांची ही गुगली लक्षात येताच पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस लागलीच मंत्र्यांच्या बचावासाठी उठले व उपलब्ध पाण्याचा अंदाज काढून कपात केली जाते, असे स्पष्ट केले. पुढील सर्व प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनीच दिली. मंदा म्हात्रे यांनी उल्हास नदीचे पाणी चोरून एका फार्महाऊसमध्ये वळविण्यात आल्याची तक्रार केली. (प्रतिनिधी)