शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

पाणीपुरवठा मंत्री लोणीकर गोंधळले

By admin | Updated: December 17, 2014 06:17 IST

उल्हास नदीवरील पाणी नियोजनात करण्यात आलेल्या कपातीच्या प्रश्नावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर चांगलेच गोंधळले.

नागपूर : उल्हास नदीवरील पाणी नियोजनात करण्यात आलेल्या कपातीच्या प्रश्नावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर चांगलेच गोंधळले. मंत्र्यांना सुरुवातीपासूनच एकाही प्रश्नाचे उत्तर देणे जमले नाही. यामुळे सभागृहात सरकारवर नामुष्कीची वेळ आली. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची बाजू सावरली. या प्रश्नावर लोणीकर यांच्या खात्याशी संबंधित सर्व उत्तरे स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रश्नोत्तराच्या तासात आ. रुपेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी पाणी नियोजनात दाखविण्यात आलेल्या १५ टक्के तुटीचा प्रश्न उपस्थित केला. ही कपात करू नये अशी मागणी करीत पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या वाढविणार का, असा प्रश्न त्यांनी केला. यावर उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भंबेरी उडाली. काय बोलावे हे त्यांना सूचतच नव्हते. हे पाहून सभागृहातील सदस्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. यावर अध्यक्षांनी मंत्र्यांना सांभाळून घ्या, अशी सूचना सदस्यांना केली. मंत्री गोंधळल्यामुळे सरकारची होत असलेली नामुष्की पाहून परिस्थिती सावरण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उठले व कपात कालावधी मोठा असल्यामुळे मागणी एवढे टँकर देऊ, असे सांगितले. यानंतर अजित पवार यांनी वरच्या धरणात पाणी कपात करण्यात आल्यामुळे उल्हास नदीत पाणी कपात केली का, अशी विचारणा मंत्र्यांना केली. पवारांची ही गुगली लक्षात येताच पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस लागलीच मंत्र्यांच्या बचावासाठी उठले व उपलब्ध पाण्याचा अंदाज काढून कपात केली जाते, असे स्पष्ट केले. पुढील सर्व प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनीच दिली. मंदा म्हात्रे यांनी उल्हास नदीचे पाणी चोरून एका फार्महाऊसमध्ये वळविण्यात आल्याची तक्रार केली. (प्रतिनिधी)