शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
5
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
6
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
7
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
8
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
9
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
10
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
11
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
12
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
13
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
14
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
15
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
16
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
18
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
19
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
20
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव

नागरिकांना मागणीपेक्षा जास्त पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 02:40 IST

पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नसताना महापालिका प्रशासनाने मात्र मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे.

नवी मुंबई : शहरवासीयांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नसताना महापालिका प्रशासनाने मात्र मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे. पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थापनासाठी १८ ठेकेदारांची नियुक्ती केली असून त्यांनी व्यवस्थित काम केले नाही तर कारवाई करण्याची तरतूद आहे. नागरिकांच्या तक्रारीची २४ तासात दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी धारेवर धरल्यानंतर पालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याविषयी करण्यात आलेल्या व भविष्यातील उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती प्रसारित केली आहे. शहरातील एकूण लोकसंख्या १४ लाख ४७९२ गृहीत धरून पाणीपुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिमाणसी १५० लिटर प्रमाणे २६९ एमएलडी एवढी पाण्याची मागणी आहे. प्रत्यक्षात ३३० एमएलडी पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा व्यवस्थापन करण्यासाठी शहरामध्ये विभागनिहाय १८ ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. या कंत्राटदारांवर पाणीपुरवठा व्यवस्थापन करण्यासाठी पाणीगळती, पंपिंग मशिनरी, दुरूस्ती, ग्राहकांच्या तक्रारी विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर त्या वेळेत सोडविण्याची जबाबदारी ठेकेदारांवरच आहे. पाणी व ऊर्जा लेखा परीक्षण करण्यात येते. जलवितरण व्यवस्था, दैनंदिन सफाई, जलमापक नोंदी घेणे, पाणी नमुने तपासणी, क्लोरीन मात्रा तपासणे, झोनमधील विहिरींची व कूपनलिकांची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. या कामांसाठी सुशिक्षित व अनुभवी कर्मचारी नियुक्ती करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. ठेकेदारांनी नियमाप्रमाणे कामे केली नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनउर्त्थान कार्यक्रम अंतर्गत सर्व ग्राहकांना जलमापक बसविण्यात आले आहेत. १५ मि. मी. व्यासाच्यावरील घरगुती, वाणिज्य वापराच्या नळ जोडण्यांना एएमआर सुविधेसह जलमापक संबंधित ग्राहकांनी स्वत: बसवायचे आहेत. शहरवासीयांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी आतापर्यंत १०२७७ अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या आहेत. याशिवाय १४ उच्चस्तरीय जलकुंभामध्ये पंपिंगद्वारे पाणी न घेता पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली आहे. यामुळे पालिकेचे ४८ लाख रूपये वीज देयकाची बचत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील ५७ टक्के परिसरामध्ये २४ तास पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावाही पालिकेने केला आहे. >जादा पाणी कुठे मुरते? शहरात रोज २६९ एमएलडी एवढी पाण्याची मागणी आहे. परंतु प्रत्यक्षात ३३० एमएलडी पाणी पुरविले जात आहे. मागणीपेक्षा तब्बल ६१ एमएलडी जादा पाणी दिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात नागरिकांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असताना मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे. पालिकेच्या या दाव्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.