शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

नागरिकांना मागणीपेक्षा जास्त पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 02:40 IST

पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नसताना महापालिका प्रशासनाने मात्र मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे.

नवी मुंबई : शहरवासीयांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नसताना महापालिका प्रशासनाने मात्र मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे. पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थापनासाठी १८ ठेकेदारांची नियुक्ती केली असून त्यांनी व्यवस्थित काम केले नाही तर कारवाई करण्याची तरतूद आहे. नागरिकांच्या तक्रारीची २४ तासात दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी धारेवर धरल्यानंतर पालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याविषयी करण्यात आलेल्या व भविष्यातील उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती प्रसारित केली आहे. शहरातील एकूण लोकसंख्या १४ लाख ४७९२ गृहीत धरून पाणीपुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिमाणसी १५० लिटर प्रमाणे २६९ एमएलडी एवढी पाण्याची मागणी आहे. प्रत्यक्षात ३३० एमएलडी पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा व्यवस्थापन करण्यासाठी शहरामध्ये विभागनिहाय १८ ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. या कंत्राटदारांवर पाणीपुरवठा व्यवस्थापन करण्यासाठी पाणीगळती, पंपिंग मशिनरी, दुरूस्ती, ग्राहकांच्या तक्रारी विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर त्या वेळेत सोडविण्याची जबाबदारी ठेकेदारांवरच आहे. पाणी व ऊर्जा लेखा परीक्षण करण्यात येते. जलवितरण व्यवस्था, दैनंदिन सफाई, जलमापक नोंदी घेणे, पाणी नमुने तपासणी, क्लोरीन मात्रा तपासणे, झोनमधील विहिरींची व कूपनलिकांची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. या कामांसाठी सुशिक्षित व अनुभवी कर्मचारी नियुक्ती करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. ठेकेदारांनी नियमाप्रमाणे कामे केली नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनउर्त्थान कार्यक्रम अंतर्गत सर्व ग्राहकांना जलमापक बसविण्यात आले आहेत. १५ मि. मी. व्यासाच्यावरील घरगुती, वाणिज्य वापराच्या नळ जोडण्यांना एएमआर सुविधेसह जलमापक संबंधित ग्राहकांनी स्वत: बसवायचे आहेत. शहरवासीयांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी आतापर्यंत १०२७७ अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या आहेत. याशिवाय १४ उच्चस्तरीय जलकुंभामध्ये पंपिंगद्वारे पाणी न घेता पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली आहे. यामुळे पालिकेचे ४८ लाख रूपये वीज देयकाची बचत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील ५७ टक्के परिसरामध्ये २४ तास पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावाही पालिकेने केला आहे. >जादा पाणी कुठे मुरते? शहरात रोज २६९ एमएलडी एवढी पाण्याची मागणी आहे. परंतु प्रत्यक्षात ३३० एमएलडी पाणी पुरविले जात आहे. मागणीपेक्षा तब्बल ६१ एमएलडी जादा पाणी दिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात नागरिकांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असताना मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे. पालिकेच्या या दाव्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.