शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या कामांमुळे पाणीटंचाई

By admin | Updated: August 25, 2016 01:42 IST

पारवडी (ता. बारामती) येथील परिसरात तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे.

पारवडी : पारवडी (ता. बारामती) येथील परिसरात तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. शासनाने ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली; मात्र पारवडी परिसरातील केवळ एकाच ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले. परिसरातील इतर ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण झाले असते, तर सुरुवातीला पडलेल्या पावसाचे पाणी साठून या भागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असता. मात्र, जलयुक्तच्या अपुऱ्या कामांमुळे परिसरातील पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले आहे. यामध्ये जलसंपदा विभाग, कृषी विभाग तसेच लघु पाटबंधारे विभाग यांनी संयुक्तपणे ओढाखोलीकरण, नवीन बंधारे बांधणी, अशी कामे केलेली आहेत. पारवडीत जलयुक्त शिवार अभियान राबविताना केवळ गावातील एकाच ओढ्याचे खोलीकरण करण्यात आल्याने इतर परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांचेदेखील हाल होत आहेत. पाणीटंचाईमुळे शेती पडीक आहे. खरीप हंगामात थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी तसेच जनावरांची चारापिके घेण्यात आली आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांनी दररोज पाणीउपसा करून बंधारे कोरडे केल्यामुळे गावडे, गवंडवस्ती, दरेवस्ती तसेच सिद्धेश्वर निंबोडी परिसरातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील पिके जळून चालली आहेत. सिद्धेश्वर निंबोडी शेतकरी तसेच गावडेवस्ती येथील ग्रामस्थांनी अपुरे खोलीकरण, नवीन बंधारे बांधणी करण्यात आली असल्याने त्याचा आम्हा शेतकरीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी पारवडीचे ग्रामसेवक शहानूर शेख यांच्याशी संपर्क साधला असता येत्या १५ सप्टेंबरपासून राहिलेली ओढाखोलीकरण नवीन बंधारे बांधणी, अशी कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, जळून चाललेल्या पिकांची माहिती विचारण्यासाठी कृषी सहायक जे. एन. कुंभार यांना संपर्क साधला असता ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे, त्यांना प्रधानमंत्री कृषी पीकविमाअंतर्गत नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले. परंतु, गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पीकविमा काढूनही त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही. (वार्ताहर)>पाणी बंधाऱ्यात : विहिरींनी गाठला तळएक ओढा खोलीकरण व नवीन बंधारे बांधणी करण्यात आलेली असल्यामुळे त्याचा फायदा केवळ गावातील ३० टक्के परिसराला झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच, नवीन बंधारे नसताना ओढ्याचे पाणी प्रवाह सिद्धेश्वर निंबोडी परिसरातील तलावात सहजपणे जात होते. सध्या याच ओढ्याचे खोलीकरण नवीन बंधारे बांधणीमुळे पावसाचे व खडकवासला कालव्यांमधून मिळणाऱ्या आवर्तनातील पाणी बंधाऱ्यात साठते.