शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

अपुऱ्या कामांमुळे पाणीटंचाई

By admin | Updated: August 25, 2016 01:42 IST

पारवडी (ता. बारामती) येथील परिसरात तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे.

पारवडी : पारवडी (ता. बारामती) येथील परिसरात तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. शासनाने ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली; मात्र पारवडी परिसरातील केवळ एकाच ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले. परिसरातील इतर ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण झाले असते, तर सुरुवातीला पडलेल्या पावसाचे पाणी साठून या भागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असता. मात्र, जलयुक्तच्या अपुऱ्या कामांमुळे परिसरातील पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले आहे. यामध्ये जलसंपदा विभाग, कृषी विभाग तसेच लघु पाटबंधारे विभाग यांनी संयुक्तपणे ओढाखोलीकरण, नवीन बंधारे बांधणी, अशी कामे केलेली आहेत. पारवडीत जलयुक्त शिवार अभियान राबविताना केवळ गावातील एकाच ओढ्याचे खोलीकरण करण्यात आल्याने इतर परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांचेदेखील हाल होत आहेत. पाणीटंचाईमुळे शेती पडीक आहे. खरीप हंगामात थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी तसेच जनावरांची चारापिके घेण्यात आली आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांनी दररोज पाणीउपसा करून बंधारे कोरडे केल्यामुळे गावडे, गवंडवस्ती, दरेवस्ती तसेच सिद्धेश्वर निंबोडी परिसरातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील पिके जळून चालली आहेत. सिद्धेश्वर निंबोडी शेतकरी तसेच गावडेवस्ती येथील ग्रामस्थांनी अपुरे खोलीकरण, नवीन बंधारे बांधणी करण्यात आली असल्याने त्याचा आम्हा शेतकरीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी पारवडीचे ग्रामसेवक शहानूर शेख यांच्याशी संपर्क साधला असता येत्या १५ सप्टेंबरपासून राहिलेली ओढाखोलीकरण नवीन बंधारे बांधणी, अशी कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, जळून चाललेल्या पिकांची माहिती विचारण्यासाठी कृषी सहायक जे. एन. कुंभार यांना संपर्क साधला असता ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे, त्यांना प्रधानमंत्री कृषी पीकविमाअंतर्गत नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले. परंतु, गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पीकविमा काढूनही त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही. (वार्ताहर)>पाणी बंधाऱ्यात : विहिरींनी गाठला तळएक ओढा खोलीकरण व नवीन बंधारे बांधणी करण्यात आलेली असल्यामुळे त्याचा फायदा केवळ गावातील ३० टक्के परिसराला झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच, नवीन बंधारे नसताना ओढ्याचे पाणी प्रवाह सिद्धेश्वर निंबोडी परिसरातील तलावात सहजपणे जात होते. सध्या याच ओढ्याचे खोलीकरण नवीन बंधारे बांधणीमुळे पावसाचे व खडकवासला कालव्यांमधून मिळणाऱ्या आवर्तनातील पाणी बंधाऱ्यात साठते.