शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

अपुऱ्या कामांमुळे पाणीटंचाई

By admin | Updated: August 25, 2016 01:42 IST

पारवडी (ता. बारामती) येथील परिसरात तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे.

पारवडी : पारवडी (ता. बारामती) येथील परिसरात तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. शासनाने ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली; मात्र पारवडी परिसरातील केवळ एकाच ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले. परिसरातील इतर ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण झाले असते, तर सुरुवातीला पडलेल्या पावसाचे पाणी साठून या भागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असता. मात्र, जलयुक्तच्या अपुऱ्या कामांमुळे परिसरातील पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले आहे. यामध्ये जलसंपदा विभाग, कृषी विभाग तसेच लघु पाटबंधारे विभाग यांनी संयुक्तपणे ओढाखोलीकरण, नवीन बंधारे बांधणी, अशी कामे केलेली आहेत. पारवडीत जलयुक्त शिवार अभियान राबविताना केवळ गावातील एकाच ओढ्याचे खोलीकरण करण्यात आल्याने इतर परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांचेदेखील हाल होत आहेत. पाणीटंचाईमुळे शेती पडीक आहे. खरीप हंगामात थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी तसेच जनावरांची चारापिके घेण्यात आली आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांनी दररोज पाणीउपसा करून बंधारे कोरडे केल्यामुळे गावडे, गवंडवस्ती, दरेवस्ती तसेच सिद्धेश्वर निंबोडी परिसरातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील पिके जळून चालली आहेत. सिद्धेश्वर निंबोडी शेतकरी तसेच गावडेवस्ती येथील ग्रामस्थांनी अपुरे खोलीकरण, नवीन बंधारे बांधणी करण्यात आली असल्याने त्याचा आम्हा शेतकरीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी पारवडीचे ग्रामसेवक शहानूर शेख यांच्याशी संपर्क साधला असता येत्या १५ सप्टेंबरपासून राहिलेली ओढाखोलीकरण नवीन बंधारे बांधणी, अशी कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, जळून चाललेल्या पिकांची माहिती विचारण्यासाठी कृषी सहायक जे. एन. कुंभार यांना संपर्क साधला असता ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे, त्यांना प्रधानमंत्री कृषी पीकविमाअंतर्गत नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले. परंतु, गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पीकविमा काढूनही त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही. (वार्ताहर)>पाणी बंधाऱ्यात : विहिरींनी गाठला तळएक ओढा खोलीकरण व नवीन बंधारे बांधणी करण्यात आलेली असल्यामुळे त्याचा फायदा केवळ गावातील ३० टक्के परिसराला झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच, नवीन बंधारे नसताना ओढ्याचे पाणी प्रवाह सिद्धेश्वर निंबोडी परिसरातील तलावात सहजपणे जात होते. सध्या याच ओढ्याचे खोलीकरण नवीन बंधारे बांधणीमुळे पावसाचे व खडकवासला कालव्यांमधून मिळणाऱ्या आवर्तनातील पाणी बंधाऱ्यात साठते.