शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पश्चिम विदर्भातील ८५० गावांत पाणीटंचाई; कमी पावसाचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 16:45 IST

यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे परिणाम आता जानवायला लागले आहेत. गावागावांतील पाणीपुरवठा योजनांचे पाणीस्त्रोत आटू लागल्याने ८५० गावांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.

अमरावती : यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे परिणाम आता जानवायला लागले आहेत. गावागावांतील पाणीपुरवठा योजनांचे पाणीस्त्रोत आटू लागल्याने ८५० गावांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. यासाठी एक हजार ३९३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर किमान ३० कोटी ४६ लाखांचा खर्च केल्या जाणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितले.शासनाद्वारा दुष्काळी तालुक्याची घोषणा केल्यानंतर या गावांत पाणीटंचाईच्या उपाययोजनांसंदर्भात शासनस्तरावर नियोजन सुरू आहे. यामध्ये पाणीटंचार्ईच्या पहिल्या टप्प्यातील संयुक्त कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात डिसेंबरपर्यत २९३ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवणार आहे. यासाठी तीन कोटी ९७ लाख रूपये खर्चाच्या ३७५ उपाययोजना केल्या जाणार आहेत. अकोला जिल्ह्यात याच कालावधीत १३६ गावांमध्ये ४ कोटी ७० लाख रूपये खर्च करून २०१ उपाययोजना केल्या जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात ४२१ गावांमध्ये पाणीटंचाई राहणार आहे. यासाठी ८९७ उपाययोजना केल्या जाणार आहे. यावर किमान २१ कोटी ९० लाख ५७ हजारांचा खर्च केल्या जाणार आहे. विभागात यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात मात्र, डिसेंबरपर्यंत पाणीटंचाईची धग नाही. मात्र, जानेवारी पश्चात उंच भागावरील काही गावांमध्ये पाणीटंचाई जानवणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.विभागात ३५ तालुक्यांतील भूजलात घटअमरावती विभागात सरासरीपेक्षा १५ टक्कयांनी पाऊस कमी झाला. मात्र, अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरी २५ टक्क्यांपेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे विभागातील ५६ पैकी ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत कमी आलेली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १२ तालुके, अकोला ७, वाशिम १, बुलडाणा १३ व यवतमाळ जिल्ह्यात २ तालुक्यांचा समावेश आहे. याउलट यवतमाळ जिल्ह्यातील १४ व वाशिम जिल्ह्यातील ५ तालुक्यातील भूजलाची पातळी वाढली आहे.रबी हंगामालाही फटकासरासरीपेक्षा कमी पाऊस व परतीचा पाऊस नसल्यामुळे जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. त्यामुळे विभागातील अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील रबी हंगाम धोक्यात आलेला आहे. प्रकल्प साठा निम्म्यावर आला असल्याने रबीला सिंचनासाठी पाण्याची पाळी मिळण्याची शक्यता कमी आहे. यंदा सहा लाख ४६ हजार ७०० हेक्टरमध्ये रबी प्रस्तावित असला तरी किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगीतले.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती