शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

पश्चिम विदर्भातील ८५० गावांत पाणीटंचाई; कमी पावसाचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 16:45 IST

यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे परिणाम आता जानवायला लागले आहेत. गावागावांतील पाणीपुरवठा योजनांचे पाणीस्त्रोत आटू लागल्याने ८५० गावांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.

अमरावती : यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे परिणाम आता जानवायला लागले आहेत. गावागावांतील पाणीपुरवठा योजनांचे पाणीस्त्रोत आटू लागल्याने ८५० गावांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. यासाठी एक हजार ३९३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर किमान ३० कोटी ४६ लाखांचा खर्च केल्या जाणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितले.शासनाद्वारा दुष्काळी तालुक्याची घोषणा केल्यानंतर या गावांत पाणीटंचाईच्या उपाययोजनांसंदर्भात शासनस्तरावर नियोजन सुरू आहे. यामध्ये पाणीटंचार्ईच्या पहिल्या टप्प्यातील संयुक्त कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात डिसेंबरपर्यत २९३ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवणार आहे. यासाठी तीन कोटी ९७ लाख रूपये खर्चाच्या ३७५ उपाययोजना केल्या जाणार आहेत. अकोला जिल्ह्यात याच कालावधीत १३६ गावांमध्ये ४ कोटी ७० लाख रूपये खर्च करून २०१ उपाययोजना केल्या जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात ४२१ गावांमध्ये पाणीटंचाई राहणार आहे. यासाठी ८९७ उपाययोजना केल्या जाणार आहे. यावर किमान २१ कोटी ९० लाख ५७ हजारांचा खर्च केल्या जाणार आहे. विभागात यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात मात्र, डिसेंबरपर्यंत पाणीटंचाईची धग नाही. मात्र, जानेवारी पश्चात उंच भागावरील काही गावांमध्ये पाणीटंचाई जानवणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.विभागात ३५ तालुक्यांतील भूजलात घटअमरावती विभागात सरासरीपेक्षा १५ टक्कयांनी पाऊस कमी झाला. मात्र, अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरी २५ टक्क्यांपेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे विभागातील ५६ पैकी ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत कमी आलेली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १२ तालुके, अकोला ७, वाशिम १, बुलडाणा १३ व यवतमाळ जिल्ह्यात २ तालुक्यांचा समावेश आहे. याउलट यवतमाळ जिल्ह्यातील १४ व वाशिम जिल्ह्यातील ५ तालुक्यातील भूजलाची पातळी वाढली आहे.रबी हंगामालाही फटकासरासरीपेक्षा कमी पाऊस व परतीचा पाऊस नसल्यामुळे जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. त्यामुळे विभागातील अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील रबी हंगाम धोक्यात आलेला आहे. प्रकल्प साठा निम्म्यावर आला असल्याने रबीला सिंचनासाठी पाण्याची पाळी मिळण्याची शक्यता कमी आहे. यंदा सहा लाख ४६ हजार ७०० हेक्टरमध्ये रबी प्रस्तावित असला तरी किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगीतले.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती