शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

राज्यात ५७0 गावांमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: December 4, 2015 02:36 IST

मराठवाड्यात सर्वाधिक धग; विदर्भात केवळ बुलडाण्यात टँकर.

संतोष वानखडे / वाशिम : यावर्षीच्या अल्पपावसाने हिवाळ्याच्या सुरूवातीलाच राज्यातील ५७0 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण केली. पाणीटंचाईची धग कमी करण्यासाठी शासनाने ७४८ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. यावर्षी राज्यावर पाऊस रूसला. परिणामी, हिवाळ्याच्या सुरूवातीपासूनच पाणीटंचाईचे ढग गडद झाले. अगोदरच विविध संकटांमधून जात असलेल्या सरकारसमोर आता पाणीटंचाईनेही नवे संकट निर्माण केले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजनांची आखणी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आवश्यक तिथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानुसार टंचाईग्रस्त ५७0 गावांमध्ये एकूण ७४८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शासकीय १५३ आणि खासगी ५९५ टँकरचा समावेश आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या लेखी कोकण व नागपूर विभागातील एकाही गावात पाणीटंचाई नाही. अमरावती विभागातील केवळ बुलडाणा जिल्ह्यातील तीन गावांमध्ये १0 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक तिव्रता मराठवाड्यात जाणवत असून, तब्बल ४२२ गावे पाणीटंचाईत होरपळून निघत आहे. ४२२ गावांमध्ये ५६४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५९ गावांत ८0 टँकर, परभणी ३१ गावांत ४२ टँकर, हिंगोली तीन गावांत दोन टँकर, नांदेड ६३ गावांत १0६ टँकर, उस्मानाबाद १0३ गावांत १२0 टँकर, लातूर ३८ गावांत ५३ टँकर, जालना दोन गावांत दोन टँकर आणि बीड १२३ गावांत १५९ टँकर, अशी मराठवाड्यातील हिवाळ्यातच भयावह स्थिती आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व अहमदनगर या चार जिल्ह्यातील ९३ गावांत ११३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या चार जिल्ह्यातील ५२ गावांत ६१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. *ग्रामविकास मंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातच सर्वाधिक टंचाई राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांचा गृह जिल्हा असलेल्या बीडमधील सर्वाधिक अर्थात १२३ गावांत पाणीटंचाई असून येथे तब्बल १५९ टँकर सुरू आहेत. १२३ गावे आणि १0९ वाड्यांमधील पाणीटंचाईची दाहकता कमी करण्यासाठी २४ शासकीय व १३५ खासगी अशा एकूण १५९ टँकरने नागरिकांची तहान भागविली जात आहे.