शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ५७0 गावांमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: December 4, 2015 02:36 IST

मराठवाड्यात सर्वाधिक धग; विदर्भात केवळ बुलडाण्यात टँकर.

संतोष वानखडे / वाशिम : यावर्षीच्या अल्पपावसाने हिवाळ्याच्या सुरूवातीलाच राज्यातील ५७0 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण केली. पाणीटंचाईची धग कमी करण्यासाठी शासनाने ७४८ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. यावर्षी राज्यावर पाऊस रूसला. परिणामी, हिवाळ्याच्या सुरूवातीपासूनच पाणीटंचाईचे ढग गडद झाले. अगोदरच विविध संकटांमधून जात असलेल्या सरकारसमोर आता पाणीटंचाईनेही नवे संकट निर्माण केले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजनांची आखणी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आवश्यक तिथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानुसार टंचाईग्रस्त ५७0 गावांमध्ये एकूण ७४८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शासकीय १५३ आणि खासगी ५९५ टँकरचा समावेश आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या लेखी कोकण व नागपूर विभागातील एकाही गावात पाणीटंचाई नाही. अमरावती विभागातील केवळ बुलडाणा जिल्ह्यातील तीन गावांमध्ये १0 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक तिव्रता मराठवाड्यात जाणवत असून, तब्बल ४२२ गावे पाणीटंचाईत होरपळून निघत आहे. ४२२ गावांमध्ये ५६४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५९ गावांत ८0 टँकर, परभणी ३१ गावांत ४२ टँकर, हिंगोली तीन गावांत दोन टँकर, नांदेड ६३ गावांत १0६ टँकर, उस्मानाबाद १0३ गावांत १२0 टँकर, लातूर ३८ गावांत ५३ टँकर, जालना दोन गावांत दोन टँकर आणि बीड १२३ गावांत १५९ टँकर, अशी मराठवाड्यातील हिवाळ्यातच भयावह स्थिती आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व अहमदनगर या चार जिल्ह्यातील ९३ गावांत ११३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या चार जिल्ह्यातील ५२ गावांत ६१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. *ग्रामविकास मंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातच सर्वाधिक टंचाई राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांचा गृह जिल्हा असलेल्या बीडमधील सर्वाधिक अर्थात १२३ गावांत पाणीटंचाई असून येथे तब्बल १५९ टँकर सुरू आहेत. १२३ गावे आणि १0९ वाड्यांमधील पाणीटंचाईची दाहकता कमी करण्यासाठी २४ शासकीय व १३५ खासगी अशा एकूण १५९ टँकरने नागरिकांची तहान भागविली जात आहे.