शहरं
Join us  
Trending Stories
1
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
2
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
3
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
4
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
5
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
6
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
7
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
8
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
9
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
10
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
11
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
12
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
13
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
14
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
15
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
17
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
18
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
19
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
20
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शहापूरवासीयांची दिंडी

By admin | Updated: May 18, 2016 05:02 IST

उभ्या मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील नागरिकांनाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

मुंबई : उभ्या मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील नागरिकांनाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, संतप्त झालेले शहापूरवासीय मंगळवारी जलदिंडी घेऊन आझाद मैदानावर धडकले. मुंबई महानगरपालिकेने शहापूर तालुका दत्तक घेऊन टँकरमुक्त करावा, अशी त्यांची मागणी होती.महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी डोक्यावर कळशी घेऊन पदयात्रा स्वरूपात शनिवारी ही दिंडी शहापूरहून निघाली होती. सोमवारी रात्री मुंबई शहरात पोहचलेली दिंडी मंगळवारी राणीबागहून जे. जे. उड्डाणपुलावरून आझाद मैदानावर धडकली. या ठिकाणी जलदिंडीचे रूपांतर जाहीर सभेत झाले.जलदिंडीचे आयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी सांगितले की, शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा व भातसा या तीन प्रमुख धरणांतून मुंबईकरांना पाणीपुरवठा होतो. तानसा आणि वैतरणा धरणांतून मुंबईकरांना प्रतिदिन प्रत्येकी ४५५ दशलक्ष लीटरप्रमाणे ९१० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. शिवाय एकट्या भातसा धरणातून सर्वाधिक म्हणजे प्रतिदिन २ हजार ५० दशलक्ष लीटर पाणी पुरवले जाते. म्हणजेच मुंबईकरांना प्रतिदिन २ हजार ९६० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. >...तर शहापूरची वर्षभराची तहान भागेलशहापूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या अहवालानुसार, शहापूर तालुक्यातील शहरी भागाला प्रतिदिन ४९ लाख ४९ हजार ७०० लीटर आणि ग्रामीण भागाला ९७ लाख ३५ हजार ७२० लीटर म्हणजेच एकूण १७.६२ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. यानुसार संपूर्ण शहापूरला प्रतिवर्ष ६ हजार ४३१ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. यानुसार मुंबईला लागणाऱ्या एका दिवसाचा पाणीपुरवठा शहापूर तालुक्याला केल्यास शहापूरवासीयांची संपूर्ण वर्षाची तहान भागेल.>मुख्यमंत्री प्रश्न सोडवणारजलदिंडीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी भेट घेतली. त्यानंतर झालेल्या चर्चेत शहापूरचा पाणीप्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती जलदिंडीचे संयोजक संतोश शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.