शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

पाण्यासाठी शहापूरवासीयांची दिंडी

By admin | Updated: May 18, 2016 05:02 IST

उभ्या मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील नागरिकांनाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

मुंबई : उभ्या मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील नागरिकांनाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, संतप्त झालेले शहापूरवासीय मंगळवारी जलदिंडी घेऊन आझाद मैदानावर धडकले. मुंबई महानगरपालिकेने शहापूर तालुका दत्तक घेऊन टँकरमुक्त करावा, अशी त्यांची मागणी होती.महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी डोक्यावर कळशी घेऊन पदयात्रा स्वरूपात शनिवारी ही दिंडी शहापूरहून निघाली होती. सोमवारी रात्री मुंबई शहरात पोहचलेली दिंडी मंगळवारी राणीबागहून जे. जे. उड्डाणपुलावरून आझाद मैदानावर धडकली. या ठिकाणी जलदिंडीचे रूपांतर जाहीर सभेत झाले.जलदिंडीचे आयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी सांगितले की, शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा व भातसा या तीन प्रमुख धरणांतून मुंबईकरांना पाणीपुरवठा होतो. तानसा आणि वैतरणा धरणांतून मुंबईकरांना प्रतिदिन प्रत्येकी ४५५ दशलक्ष लीटरप्रमाणे ९१० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. शिवाय एकट्या भातसा धरणातून सर्वाधिक म्हणजे प्रतिदिन २ हजार ५० दशलक्ष लीटर पाणी पुरवले जाते. म्हणजेच मुंबईकरांना प्रतिदिन २ हजार ९६० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. >...तर शहापूरची वर्षभराची तहान भागेलशहापूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या अहवालानुसार, शहापूर तालुक्यातील शहरी भागाला प्रतिदिन ४९ लाख ४९ हजार ७०० लीटर आणि ग्रामीण भागाला ९७ लाख ३५ हजार ७२० लीटर म्हणजेच एकूण १७.६२ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. यानुसार संपूर्ण शहापूरला प्रतिवर्ष ६ हजार ४३१ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. यानुसार मुंबईला लागणाऱ्या एका दिवसाचा पाणीपुरवठा शहापूर तालुक्याला केल्यास शहापूरवासीयांची संपूर्ण वर्षाची तहान भागेल.>मुख्यमंत्री प्रश्न सोडवणारजलदिंडीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी भेट घेतली. त्यानंतर झालेल्या चर्चेत शहापूरचा पाणीप्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती जलदिंडीचे संयोजक संतोश शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.