शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

पाणीवापराला येणार शिस्त, महाराष्ट्र राज्याची जलनीती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 04:32 IST

नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी जलाशयातून बंद नलिकेद्वारे पुरवठा करणेअनिवार्य असेल.

मुंबई : राज्यात पाण्याच्या मनमानी वापराला चाप लावतानाच त्याच्या नियोजनबद्ध वापरासाठीच्या नियमांचा अंतर्भाव असलेली जलनीती जलसंपदा विभागाने आज जाहीर केली. त्यात शहरी भागात ‘रेन हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्याची तरतूद आहे. तसेच शहरी व ग्रामीण पाणी पुरवठ्यातील निकषातील तफावत टप्प्याटप्प्याने दूर करण्यात येणार आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी जलाशयातून बंद नलिकेद्वारे पुरवठा करणेअनिवार्य असेल. सद्यस्थितीत कालवा आणि नदी स्रोतातून पाणीपुरवठा होणाऱ्या योजना टप्प्याटप्प्याने जलनाशयातून बंद नलिकेद्वारे पाणी घेणाºया योजनांमध्ये रुपांतरित करण्यात येतील, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतला दिली. सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सक्षम पायाभूत सुविधा तयार करेल. पहिल्या टप्प्यात ऊस, केळी यासारख्या अधिक पाणी लागणाºया पिकांना सूक्ष्म सिंचनाखाली आणले जाईल. तसेच कमी पाणी लागणाºया पीक पद्धतीस प्रोत्साहन दिले जाईल. जलसाठ्यांमधील पाण्याचे वाटप करताना पिण्याचे पाणी, इतर घरगुती गरजांना पूर्वीसारखेच प्रथम प्राधान्य असेल. त्यानंतर शेती, उद्योग, सांस्कृतिक, धार्मिक समारंभ, करमणूक, क्रीडा असा प्राधान्यक्रम राहील. जलनीतीवरील संशोधनासाठी एक स्वायत्त केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.जलनीतीची वैशिष्ट्येएक दशलक्ष घनमीटर किंवा त्यापेक्षा अधिक वार्षिक पाणीवापर करणाºया कारखान्यांना वार्षिक जल अहवाल प्रसिद्ध करणे अनिवार्य असेल. पाण्याची तूट असलेल्या उपखोºयात कृषी आधारित उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल. लागवडीलायक लाभक्षेत्राच्या प्रत्येक हेक्टरसाठी तीन हजार घनमीटरपेक्षा अधिक सरासरी वार्षिक पाणी उपलब्धता असलल्या उपखोऱ्यांमध्ये अधिक पाणी लागणाºया उद्योगांना परवानगी दिली जाईल. 

टॅग्स :WaterपाणीMumbaiमुंबई