शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

पाण्याचा केमिकल लोचा !

By admin | Updated: October 9, 2014 01:06 IST

बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत नागपूरपासून केवळ २५ कि़मी. अंतरावर असून आर्थिक उपराजधानी अशी ओळख आहे. येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून शरीराला घातक असलेले रसायन

बुटीबोरीचे पाणी पिण्यास अयोग्यविहंग सालगट - नागपूर बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत नागपूरपासून केवळ २५ कि़मी. अंतरावर असून आर्थिक उपराजधानी अशी ओळख आहे. येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून शरीराला घातक असलेले रसायन व कठोर धातूमिश्रित पाणी पित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. हे कटू सत्य जाणून घेण्यासाठी लोकमत चमू बुटीबोरी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचली. येथील लोकांनी सांगितलेली माहिती गंभीर आहे. थेट वेणा नदीत पाईपलाईन टाकून या क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येतो. या नदीत औद्योगिक क्षेत्रातील घाण आणि रसायनयुक्त पाणी सोडले जाते. एकच जलस्रोत असल्याने पाईपलाईनद्वारे आलेले पाणी पिण्याशिवाय गावकऱ्यांसमोर पर्याय नाही. या पाण्याला फिल्टर का करण्यात येत नाही, ही बाब ग्रामपंचायतकडून जाणून घेण्याचा प्रयत्न चमूने केला. पण नाव न सांगण्याच्या अटीवर काहींनी सांगितले की, फिल्ट्रेशनचे काम गेल्या सात वर्षांपासून प्रस्तावित आहे. दोन वर्षांआधी काम सुरू झाले, पण ते कासवगतीने सुरू आहे. या कामावर ७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत सुमारे २३ वर्ग कि.मी.मध्ये आहे. त्यापैकी १४.९५ वर्ग कि़मी. क्षेत्राचा सर्वाधिक विकास झाला आहे. राज्यातील पहिला फूड पार्क या वसाहतीत असल्याचा शासनाचा दावा आहे. ११० कारखान्यांमध्ये उत्पादन सुरू आहे आणि १४ कारखान्यांचे काम प्रगतिपथावर आहे. एवढे सगळे असताना या क्षेत्राच्या विकासात काय उणिवा राहिल्या असतील, हा प्रश्न तारांकित आहे. विकिपीडिया (इनसायक्लोपीडिया) यावर बुटीबोरीसंदर्भात उपलब्ध माहितीनुसार जगाच्या औद्योगिक पटलावर या क्षेत्राची वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज का भासत असेल? बुटीबोरी ग्रामपंचायतची भूमिका काय? येथील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सेवा, सुरक्षा आदी समस्यांवर लोकमत चमूने या क्षेत्राचे अवलोकन केले. त्याची माहिती आम्ही वेगवेगळ्या भागात प्रकाशित करीत आहोत. तपासणीत पाणी रसायन मिश्रितबुटीबोरी ग्रामपंचायत, नागपूरच्या रिजनल पब्लिक हेल्थ लेबॉरेटरीजमध्ये वर्षातून दोनदा पिण्याच्या पाण्याचे केमिकल परीक्षण करते. पाण्यात रसायन आणि कठोर धातूंचे मिश्रण मोठ्या प्रमाणात असल्याचा अहवाल रिसर्च लॅबने ग्रामपंचायतला दिला आहे. हे पाणी पिल्याने किडनी आणि लिव्हरवर विपरीत परिणाम पडू शकतो, असे चिकित्सकांनी सांगितले.