शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पाणी प्रश्न सोडवा ; अन्यथा ठाणे शहर बंद पाडू : जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 11:54 IST

सगळ्यात उच्चभ्रू वस्ती म्हणून घोडबंदरला समजले जाते. मात्र त्याच घोडबंदरला ३६५ दिवस पाणी मिळत नाही.

ठाणे - महाराष्ट्रभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठाण्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाण्यातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर ठाणे शहर बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला आहे.

वीस वर्षांपासून धरण बांधण्याची मागणी होत असताना, धरण का बांधले जात नाही. महानगरपालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नयेत व ठाणे शहरात पाण्याची आणीबाणी लागू करावी अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. पाण्याचा प्रश्न महत्वाचा समजला नाही तर, आम्हाला ठाणे शहर बंद पाडावे लागेल असा इशारा आव्हाड यांनी दिला.

सगळ्यात उच्चभ्रू वस्ती म्हणून घोडबंदरला समजले जाते. मात्र त्याच घोडबंदरला ३६५ दिवस पाणी मिळत नाही. एवढच नाही तर संपूर्ण ठाणे शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीही ठाण्यातील लोकप्रतिनिधी एवढे शांत का झाले आहेत. मी एकटाच पाण्यासाठी आवाज उठवत आहे. पक्ष कोणतेही असो आमदारांनी पाण्याच्या प्रश्नासाठी पुढाकर घ्यायला हवे ,असे आव्हाड म्हणाले.

लोकप्रतिनिधी शांत का बसली आहेत, जनता आता असा प्रश्न विचारू लागली आहेत. घोडबंदरमधून आज आवाज उठला आहे. आता तो संपूर्ण ठाण्यात घुमणार आहे. ठाण्यात आज घडीला पाणीच नाही. ठाण्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीला फक्त सेना-भाजप जवाबदार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.