शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही मिळेना पिण्यासाठी पाणी

By admin | Updated: August 5, 2016 02:10 IST

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना स्वत:च्या मालकीचे धरण असणाऱ्या नवी मुंबईकरांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळेनासे झाले

नवी मुंबई : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना स्वत:च्या मालकीचे धरण असणाऱ्या नवी मुंबईकरांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळेनासे झाले आहे. ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर व २४ तास पाणीपुरवठा करण्याचे धोरण पालिकेने यापूर्वीच मंजूर केले आहे. परंतु प्रत्यक्षात शहरवासीयांना गरजेपुरतेही पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याच्या वेळाही वारंवार बदलल्या जात असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने पुढील ५० वर्षे कधीच पाणीटंचाई भासणार नाही अशा घोषणा यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केल्या होत्या. परंतु पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात अचानक पाणीकपात सुरू केली आहे. राष्ट्रीय मानांकनाप्रमाणे प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणी पुरविण्यात येणार असल्याची घोषणा आयुक्तांनी केली आहे. आयुक्तांच्या आदेशाचे पालन करता यावे यासाठी प्रत्येक सोसायटीमध्ये कमी दाबाने पाणी सोडले जात आहे. नागरिकांना दिवसभर पुरेल एवढेही पाणी उपलब्ध होत नाही. काही सोसायट्यांमध्ये दिवसामधून अर्धा ते एक तासच पाणी मिळत आहे. नेरूळ सेक्टर २०, नेरूळ गाव, सेक्टर १६, २४, ६ व इतर अनेक ठिकाणी वेळेत व पुरेसे पाणी मिळत नाही. सीवूडमध्येही पाणीपुरवठा वेळेत होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. पाणी येत नसल्याने नागरिक पालिका अधिकारी,नगरसेवक, साठवण टाकी येथे जावूनही विचारणा करत आहेत. परंतु सर्वच ठिकाणी आयुक्तांचे आदेश असल्याचे उत्तर दिले जात आहे. पूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू असताना शहरवासीयांना मात्र पिण्यासाठीही पाणी मिळत नाही ही शोकांतिका असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे धोरण मंजूर केले असताना रोज अर्धा ते एक तास पाणी देण्याचा निर्णय प्रशासनाने परस्पर कसा घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुष्काळाची स्थिती असल्यामुळे डिसेंबर ते मे दरम्यान नागरिकांनी पाणी पुरेसे मिळत नसतानाही कधीच नाराजी व्यक्त केली नाही. प्रशासनाला सहकार्य केले. परंतु धरणामध्ये मुबलक पाणी असतानाही पाणीकपात करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाची मनमानी सुरू झाली आहे. लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेल्या प्रस्तावांची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. नागरिकांना २४ तास नाहीच परंतु गरजेएवढेही पाणी मिळत नाही. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई केली आहे. अनेक भागात २४ तास पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून अशीच स्थिती राहिली तर आंदोलन करावे लागेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. >प्रशासनाची हुकूमशाही सुरू महापालिकेमध्ये प्रशासनाची हुकूमशाही सुरू झाली असल्याची टीका नागरिक व लोकप्रतिनिधी करू लागले आहेत. महासभेने ५० रुपयांमध्ये ४० हजार लिटर पाणी देण्याचा ठराव मंजूर केला आहे. यापूर्वी जवळपास ६० टक्के परिसरामध्ये चोवीस तास पाणीपुरवठा केला जात होता. उर्वरित परिसरामध्ये ५ ते ६ तास पाणी दिले जात होते. परंतु आता अर्धा तासही पाणी दिले जात नाही. नागरिकांनी तक्रारी केल्या तर त्यांनाच उपदेशाचे डोस दिले जात आहेत. प्रशासनाची हुकूमशाही सुरू असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होवू लागली आहे. नगरसेवकांची डोकेदुखी वाढली महापालिका प्रशासन पिण्यासाठीही पुरेसे पाणी देत नाही. तक्रार केल्यास आम्ही पाणी देत आहोत, तुम्ही त्याचे नीट नियोजन करा अशा सूचना दिल्या जात आहेत. यामुळे त्रस्त झालेले नागरिक रोज नगरसेवक व इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडे तक्रारी करत आहेत. पहाटेपासून रात्रीपर्यंत सर्वाधिक फोन पाण्यासाठीच येवू लागले असून प्रशासनाच्या मनमानीमुळे निर्माण झालेल्या रोषास लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. >नेरूळवासीयांनी दिले निवेदनसेक्टर २०, नेरूळ गाव, सेक्टर १० परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. याविषयी नागरिकांनी स्थानिक नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्याकडे तक्रार केली आहे. म्हात्रे यांनी याविषयी आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाणीपुरवठा पत्र देवून नागरिकांच्या भावना कळविल्या आहेत. येथील अरुणोदय सोसायटीसह सर्वच ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा सुरू असून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली जात आहे.