शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

पाणीच उठले गावकऱ्यांच्या ‘जीवना’वर

By admin | Updated: January 11, 2015 00:45 IST

पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे,

फ्लोराईडयुक्त पाणी : लिंगटीतील अनेकांना ‘फ्लोरोसिस’ने जखडले!प्रवीण पिन्नमवार - पांढरकवडा (यवतमाळ) पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे, कुणाचे दात लाल-काळे तर कुणाला सरळ चालता येत नाही. फ्लोरोसिसने जखडलेले हे गाव आहे, पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी (भाडउमरी).पांढरकवडापासून २० किलोमीटर अंतरावर लिंगटी आहे. ४०० ते ५०० लोकवस्तीचे गाव आदिवासीबहुल आहे. मात्र अज्ञान आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना उपलब्ध साधनसामग्रीवर चरितार्थ चालवावा लागतो. या गावाची मुख्य समस्या म्हणजे फ्लोराईडयुक्त पाणी आणि हेच पाणी आता नागरिकांना मरणाच्या दाढेत ढकलत आहे. गावात प्रवेश करताच ४० वर्षीय श्रावण पेंदोर भेटला. कमरेतून वाकलेला आणि मान हलवता न येण्याच्या स्थितीत तो जगत आहे. अशा स्थितीत तो आपले काम कसेबसे करीत होता. त्याची संपूर्ण पाठही अकडल्याचे दिसत होते. याबाबत विचारले असता श्रावण म्हणाला, ‘हा त्रास पाच ते सहा वर्षांपासून आहे. नागपूरला रुग्णालयातही जाऊन आलो. त्याठिकाणी ५० ते ६० हजार खर्च येईल, असे सांगितले. आर्थिक परिस्थिती नसल्याने उपचार न घेताच गावी परत आलो आणि आज अशा स्थितीत तुमच्यासमोर उभा आहे’. तानाबाई नैताम या ५० वर्षीय महिलेच्या हाताची सर्व बोटे लुळी पडली होती. त्याही कमरेतून वाकून चालत होत्या. तानाबाईशी संवाद सुरू असतानाच एक २० वर्षीय तरूण अडखळत चालत आला. त्याला विचारले तर तोही चार ते पाच वर्षांपासून हाडाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे समजले. बघता-बघता कमलाबाई पेंदोर, जंगोबाई सुरपाम, भीमराव आत्राम, परशराम आत्राम असे अनेक स्त्री-पुरूष तेथे गोळा झाले. प्रत्येकाला हाडाशी संबंधित कोणता ना कोणता जडलेला होता. या भागात जमिनीतील पाण्यात फ्लोराईड हा क्षार अधिक प्रमाणात आहे. गावात असलेली विहीर ही गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. याच विहिरीतून मिळणारे फ्लोराईडयुक्त पाणी गावकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. काय आहे फ्लोराईड ? फ्लोराईड हा क्षार असून पाण्याच्या माध्यमातून तो शरीरात जातो. फ्लोराईडचे शरीरातील प्रमाण वाढल्याने फ्लोरोसिस हा आजार होतो. यात हाडांवर परिणाम होऊन ती वाकतात तसेच हाडे ठिसूळ होतात व सहज तुटतात, दातही वाकडे तिकडे होतात. त्याला डेन्टल फ्लोरोसिस म्हणतात. हा आजार टाळण्यासाठी फ्लोराईडयुक्त पाणी पिण्यासाठी वापरू नये, हाच उपाय असल्याचे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके यांनी सांगितले.