शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीच उठले गावकऱ्यांच्या ‘जीवना’वर

By admin | Updated: January 11, 2015 00:45 IST

पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे,

फ्लोराईडयुक्त पाणी : लिंगटीतील अनेकांना ‘फ्लोरोसिस’ने जखडले!प्रवीण पिन्नमवार - पांढरकवडा (यवतमाळ) पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे, कुणाचे दात लाल-काळे तर कुणाला सरळ चालता येत नाही. फ्लोरोसिसने जखडलेले हे गाव आहे, पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी (भाडउमरी).पांढरकवडापासून २० किलोमीटर अंतरावर लिंगटी आहे. ४०० ते ५०० लोकवस्तीचे गाव आदिवासीबहुल आहे. मात्र अज्ञान आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना उपलब्ध साधनसामग्रीवर चरितार्थ चालवावा लागतो. या गावाची मुख्य समस्या म्हणजे फ्लोराईडयुक्त पाणी आणि हेच पाणी आता नागरिकांना मरणाच्या दाढेत ढकलत आहे. गावात प्रवेश करताच ४० वर्षीय श्रावण पेंदोर भेटला. कमरेतून वाकलेला आणि मान हलवता न येण्याच्या स्थितीत तो जगत आहे. अशा स्थितीत तो आपले काम कसेबसे करीत होता. त्याची संपूर्ण पाठही अकडल्याचे दिसत होते. याबाबत विचारले असता श्रावण म्हणाला, ‘हा त्रास पाच ते सहा वर्षांपासून आहे. नागपूरला रुग्णालयातही जाऊन आलो. त्याठिकाणी ५० ते ६० हजार खर्च येईल, असे सांगितले. आर्थिक परिस्थिती नसल्याने उपचार न घेताच गावी परत आलो आणि आज अशा स्थितीत तुमच्यासमोर उभा आहे’. तानाबाई नैताम या ५० वर्षीय महिलेच्या हाताची सर्व बोटे लुळी पडली होती. त्याही कमरेतून वाकून चालत होत्या. तानाबाईशी संवाद सुरू असतानाच एक २० वर्षीय तरूण अडखळत चालत आला. त्याला विचारले तर तोही चार ते पाच वर्षांपासून हाडाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे समजले. बघता-बघता कमलाबाई पेंदोर, जंगोबाई सुरपाम, भीमराव आत्राम, परशराम आत्राम असे अनेक स्त्री-पुरूष तेथे गोळा झाले. प्रत्येकाला हाडाशी संबंधित कोणता ना कोणता जडलेला होता. या भागात जमिनीतील पाण्यात फ्लोराईड हा क्षार अधिक प्रमाणात आहे. गावात असलेली विहीर ही गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. याच विहिरीतून मिळणारे फ्लोराईडयुक्त पाणी गावकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. काय आहे फ्लोराईड ? फ्लोराईड हा क्षार असून पाण्याच्या माध्यमातून तो शरीरात जातो. फ्लोराईडचे शरीरातील प्रमाण वाढल्याने फ्लोरोसिस हा आजार होतो. यात हाडांवर परिणाम होऊन ती वाकतात तसेच हाडे ठिसूळ होतात व सहज तुटतात, दातही वाकडे तिकडे होतात. त्याला डेन्टल फ्लोरोसिस म्हणतात. हा आजार टाळण्यासाठी फ्लोराईडयुक्त पाणी पिण्यासाठी वापरू नये, हाच उपाय असल्याचे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके यांनी सांगितले.