शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

ओल्या कचऱ्यापासून होणार खतनिर्मिती

By admin | Updated: May 19, 2016 03:57 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वाडेघर परिसरातील आनंदसागर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प राबवला

कल्याण : ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वाडेघर परिसरातील आनंदसागर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प राबवला आहे. सोसायटीच्या विकासकाने खतनिर्मितीचे मशीन खरेदी केली आहे. त्यात निर्माण होणारे खत तेथील उद्यानासाठी वापरले जात आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावर केडीएमसीने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे याबरोबरच ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण करणे यावर प्रामुख्याने भर दिला आहे. याअनुषंगाने कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांनाही आवाहन केले जात आहे. त्यास प्रतिसाद देताना आनंदसागर सोसायटीने ओल्या कच-यातून खतनिर्मितीचा प्रकल्प राबविला आहे. या सोसायटीतील पाच इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यात ७० सदनिका आहेत. सध्या त्यात ५० कुटुंबे वास्तव्याला आले आहेत. प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून १० किलोच्या आसपास ओला कचरा गोळा होत आहे. शनिवार, ७ मे पासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी लागणारे मशीन विकासकाने खरेदी केली आहे. (प्रतिनिधी)।कचऱ्याचे वर्गीकरण काळाची गरजकेडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे सल्लागार श्रीकृष्ण भागवत यांनीही या सोसायटीला भेट देत तेथील सदस्यांना मार्गदर्शन केले. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. सोसायटीचा होणार सत्कारआपला परिसर स्वच्छ ठेवणे, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे असे प्रकल्प राबविणाऱ्या सोसायटींचा महापालिकेतर्फे सत्कार करण्यात येईल, अशी घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर केली होती. त्यानुसार संबंधित सोसायटीतील सदस्यांचा महापौर दालनात सत्कार करण्यात येणार असल्याचे देवळेकरांनी स्पष्ट केले.