शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
3
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
4
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
5
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
6
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
7
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
8
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
9
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
10
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
11
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
12
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
13
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
14
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
15
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
16
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
17
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
18
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
19
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
20
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाची निधी अभावी कासवगती

By admin | Updated: February 25, 2016 15:58 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाचा मानबिंदू ठरणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग सध्या निधीअभावी रखडला आहे.

यवतमाळ :  जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे सेवाग्राम आणि शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र नांदेडला जोडणारा बहुप्रतीक्षित आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाचा मानबिंदू ठरणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग सध्या निधीअभावी रखडला आहे. फेब्रुवारी 2008 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. या प्रकल्पाचे आठ वर्षात केवळ 3.7 टक्केच काम झाले आहे. हा प्रकल्प अद्यापही भूसंपादनातच अडकला आहे. 
महत्वाकांक्षी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली त्यावेळी या प्रकल्पाची मुळ किंमत 274 कोटी 55 लाख होती. सध्या या प्रकल्पाची किंमत 1600 कोटी पेक्षा अधिक असून, आतार्पयत या प्रकल्पावर 184 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. अपु:या निधीमुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. 2008-09 च्या अर्थसंकल्पात एक लाख रुपये, 2009-10 मध्ये 15 कोटी रुपये, 2010-11 मध्ये 40 कोटी रुपये, 2011-12 मध्ये 40 कोटी रुपये आणि 2012-13 मध्ये 15 कोटी रुपये निधी मिळाला आहे. निधी मिळण्याची हीच गती कायम राहिल्यास हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी 100 वर्ष लागतील. लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या पुढाकाराने 11 फेब्रुवारी 2009 रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते यवतमाळात या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. 270 किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग केंद्र सरकारचा 60 टक्के आणि राज्य शासनाचा 40 टक्के खर्चातून उभारला जाणार आहे. 
यवतमाळ हा आदिवासीबहूल मागास जिल्हा आहे. येथे कजर्बाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. अशा या मागास भागाचा विकास करण्यासाठी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग हाच एकमेव पर्याय आहे. विशेष म्हणजे या रेल्वेमार्गातील सर्वाधिक म्हणजे 180 किलोमीटर भाग एकटय़ा यवतमाळ जिल्ह्यात येतो. परंतु भरीव निधी मिळत नसल्याने या प्रकल्पाचे काम भूसंपादनावरच थांबले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास विदर्भ आणि मराठवाडय़ातील अर्थकारणाला चालणा मिळेल. यवतमाळ जिल्ह्यात उद्योगाचे नवे दालन सुरू होईल. येथील शेतक:यांचा थेट बाजारपेठेशी संपर्क येईल. माल वाहतूक स्वस्त होईल, मोठे उद्योजकही याठिकाणी उद्योग उभारतील, त्यातून बेरोजगारीची समस्या सुटेल. यासाठी रेल्वेच्या चालू अर्थसंकल्पात या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देऊन भरीव निधीची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
 
संक्षिप्त टिप्पणी
- प्रकल्प जाहीर - फेब्रुवारी 2008 
- उद्घाटन - 11 फेब्रुवारी 2009 
(तत्कालीन रेल्वेमंत्री श्री लालूप्रसादजी यादव यांच्या हस्ते )
- लांबी - 270 किलोमीटर 
- रेल्वे स्टेशन -  27 (तीन जुने, 24 नवीन) देवळी, भिडी, कळंब, तळेगाव, यवतमाळ (लासीना), लाडखेड, तपोना, दारव्हा, अंतरगाव, हरसूल, दिग्रस, बेलगव्हाण, पुसद, हर्षी, शिळोणा, पळशी, उमरखेड, हदगाव, बामणी, वारंगा, देववाडी, अर्धापूर, दाभोळ, मालटेकडी. 
- मूळ किंमत - 274 कोटी 55 लाख 
- सध्याची किंमत - 1600 कोटींपेक्षा अधिक 
- केंद्र शासनाचा वाटा - 60 टक्के 
- राज्य शासनाचा वाटा - 40 टक्के
गत पाच वर्षात मिळालेला निधी 
- केंद्र शासनाकडून - 110 कोटी
- राज्य शासनाकडून - 50 कोटी 
- एकूण - 160 कोटी 
रेल्वे प्रकल्पातील तरतूद (गत पाच वर्षात) 
- सन 2008-09 - 1 लाख रुपये 
- सन 2009-10 - 15 कोटी
- सन 2010-11 - 40 कोटी 
- सन 2011-12 - 40 कोटी
- सन 2012-13 - 15 कोटी
- रेल्वे प्रकल्पाची सध्याची प्रगती - 3.7 टक्के