शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
5
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
6
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
7
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
8
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
9
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
10
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
11
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
12
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
13
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
14
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
15
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
16
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
17
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
18
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
19
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
20
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाची निधी अभावी कासवगती

By admin | Updated: February 25, 2016 15:58 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाचा मानबिंदू ठरणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग सध्या निधीअभावी रखडला आहे.

यवतमाळ :  जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे सेवाग्राम आणि शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र नांदेडला जोडणारा बहुप्रतीक्षित आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाचा मानबिंदू ठरणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग सध्या निधीअभावी रखडला आहे. फेब्रुवारी 2008 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. या प्रकल्पाचे आठ वर्षात केवळ 3.7 टक्केच काम झाले आहे. हा प्रकल्प अद्यापही भूसंपादनातच अडकला आहे. 
महत्वाकांक्षी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली त्यावेळी या प्रकल्पाची मुळ किंमत 274 कोटी 55 लाख होती. सध्या या प्रकल्पाची किंमत 1600 कोटी पेक्षा अधिक असून, आतार्पयत या प्रकल्पावर 184 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. अपु:या निधीमुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. 2008-09 च्या अर्थसंकल्पात एक लाख रुपये, 2009-10 मध्ये 15 कोटी रुपये, 2010-11 मध्ये 40 कोटी रुपये, 2011-12 मध्ये 40 कोटी रुपये आणि 2012-13 मध्ये 15 कोटी रुपये निधी मिळाला आहे. निधी मिळण्याची हीच गती कायम राहिल्यास हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी 100 वर्ष लागतील. लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या पुढाकाराने 11 फेब्रुवारी 2009 रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते यवतमाळात या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. 270 किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग केंद्र सरकारचा 60 टक्के आणि राज्य शासनाचा 40 टक्के खर्चातून उभारला जाणार आहे. 
यवतमाळ हा आदिवासीबहूल मागास जिल्हा आहे. येथे कजर्बाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. अशा या मागास भागाचा विकास करण्यासाठी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग हाच एकमेव पर्याय आहे. विशेष म्हणजे या रेल्वेमार्गातील सर्वाधिक म्हणजे 180 किलोमीटर भाग एकटय़ा यवतमाळ जिल्ह्यात येतो. परंतु भरीव निधी मिळत नसल्याने या प्रकल्पाचे काम भूसंपादनावरच थांबले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास विदर्भ आणि मराठवाडय़ातील अर्थकारणाला चालणा मिळेल. यवतमाळ जिल्ह्यात उद्योगाचे नवे दालन सुरू होईल. येथील शेतक:यांचा थेट बाजारपेठेशी संपर्क येईल. माल वाहतूक स्वस्त होईल, मोठे उद्योजकही याठिकाणी उद्योग उभारतील, त्यातून बेरोजगारीची समस्या सुटेल. यासाठी रेल्वेच्या चालू अर्थसंकल्पात या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देऊन भरीव निधीची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
 
संक्षिप्त टिप्पणी
- प्रकल्प जाहीर - फेब्रुवारी 2008 
- उद्घाटन - 11 फेब्रुवारी 2009 
(तत्कालीन रेल्वेमंत्री श्री लालूप्रसादजी यादव यांच्या हस्ते )
- लांबी - 270 किलोमीटर 
- रेल्वे स्टेशन -  27 (तीन जुने, 24 नवीन) देवळी, भिडी, कळंब, तळेगाव, यवतमाळ (लासीना), लाडखेड, तपोना, दारव्हा, अंतरगाव, हरसूल, दिग्रस, बेलगव्हाण, पुसद, हर्षी, शिळोणा, पळशी, उमरखेड, हदगाव, बामणी, वारंगा, देववाडी, अर्धापूर, दाभोळ, मालटेकडी. 
- मूळ किंमत - 274 कोटी 55 लाख 
- सध्याची किंमत - 1600 कोटींपेक्षा अधिक 
- केंद्र शासनाचा वाटा - 60 टक्के 
- राज्य शासनाचा वाटा - 40 टक्के
गत पाच वर्षात मिळालेला निधी 
- केंद्र शासनाकडून - 110 कोटी
- राज्य शासनाकडून - 50 कोटी 
- एकूण - 160 कोटी 
रेल्वे प्रकल्पातील तरतूद (गत पाच वर्षात) 
- सन 2008-09 - 1 लाख रुपये 
- सन 2009-10 - 15 कोटी
- सन 2010-11 - 40 कोटी 
- सन 2011-12 - 40 कोटी
- सन 2012-13 - 15 कोटी
- रेल्वे प्रकल्पाची सध्याची प्रगती - 3.7 टक्के