शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा

By admin | Updated: June 7, 2015 02:44 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करणे हा उपाय ठरू शकत नाही, तर सरसकट कर्ज माफ करण्याची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री

नाशिक : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करणे हा उपाय ठरू शकत नाही, तर सरसकट कर्ज माफ करण्याची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत उदासीन राहून चालणार नाही. राज्यात मान्सून लांबण्याचा अंदाज एकीकडे वेधशाळांमार्फत वर्तविला जात असताना दुसरीकडे राज्य सरकार अद्यापही दुष्काळासारखे संकट गांभीर्याने घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.भाजपा सरकारने राज्यासह संपूर्ण देशाला ‘अच्छे दिन’ची आशा लावली; मात्र एक वर्षाचा अवधी उलटूनही ‘अच्छे दिन’बाबत कुठलेही चित्र पहावयास मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारने दोनशे कोटींची तरतूद केली असली तरी, ती पुरेशी नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. स्वातंत्र्य सैनिकांना तरी ‘अच्छे दिन’ येऊ देतदेशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना तरी ‘अच्छे दिन’ येऊ देत, असा टोला चव्हाण यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या राज्यस्तरीय मेळावा लगावला. स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनामध्येही दरवर्षी वाढ करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. ही तर सरकारची नामुष्की : कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पोलीस यंत्रणेला विशेषत: तपास पथकाला संशयितांच्या मुसक्या आवळण्यामध्ये यश येत नाही, ही पोलीस यंत्रणेबरोबरच सरकारची नामुष्की असल्याचे चव्हाण म्हणाले.