शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा

By admin | Updated: June 7, 2015 02:44 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करणे हा उपाय ठरू शकत नाही, तर सरसकट कर्ज माफ करण्याची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री

नाशिक : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करणे हा उपाय ठरू शकत नाही, तर सरसकट कर्ज माफ करण्याची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत उदासीन राहून चालणार नाही. राज्यात मान्सून लांबण्याचा अंदाज एकीकडे वेधशाळांमार्फत वर्तविला जात असताना दुसरीकडे राज्य सरकार अद्यापही दुष्काळासारखे संकट गांभीर्याने घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.भाजपा सरकारने राज्यासह संपूर्ण देशाला ‘अच्छे दिन’ची आशा लावली; मात्र एक वर्षाचा अवधी उलटूनही ‘अच्छे दिन’बाबत कुठलेही चित्र पहावयास मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारने दोनशे कोटींची तरतूद केली असली तरी, ती पुरेशी नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. स्वातंत्र्य सैनिकांना तरी ‘अच्छे दिन’ येऊ देतदेशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना तरी ‘अच्छे दिन’ येऊ देत, असा टोला चव्हाण यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या राज्यस्तरीय मेळावा लगावला. स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनामध्येही दरवर्षी वाढ करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. ही तर सरकारची नामुष्की : कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पोलीस यंत्रणेला विशेषत: तपास पथकाला संशयितांच्या मुसक्या आवळण्यामध्ये यश येत नाही, ही पोलीस यंत्रणेबरोबरच सरकारची नामुष्की असल्याचे चव्हाण म्हणाले.