शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अप्पर महासंचालकांच्या बदल्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: May 11, 2017 03:16 IST

राज्य पोलीस दलात आत्तापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. आता पुढच्या टप्प्यात महासंचालक

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलात आत्तापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. आता पुढच्या टप्प्यात महासंचालक, अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पोलीस दलात उत्सुकता निर्माण झालेली आहे. विशेषत: ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदासह मुंबई आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) व राज्य गुप्तवार्ता (एसआयडी) रिक्त असलेल्या पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ही पदे महत्त्वाची असल्याने, त्या जागी नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ आहे. मात्र, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप निर्णय न झाल्याने, ५ ते ६ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाइल प्रलंबित असल्याचे गृहविभागातील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्यात लागू असलेल्या पोलीस बदली (सुधारणा) अधिनियम २०१४ च्या कायद्यानुसार, एखाद्या अधिकाऱ्याला एका पदावर दोन वर्षे कार्यरत राहण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी पीएसआय ते उपअधीक्षक व अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी काटेकोरपणे केली जाते. त्यावरील अधिकाऱ्यांबाबत हा नियम अपवादात्मकरीत्या वापरला जातो. गृहविभागाने २७ एप्रिलला १६ सहआयुक्त/विशेष महानिरीक्षक, १७ अपर आयुक्त व १०४ उपायुक्त/अधीक्षक दर्जाच्या अशा एकूण १३७ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात दोन वर्षांचा कालावधी पूर्ण न झालेल्या ३५ हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पहिल्यांदा बदल्यांचा आदेश जारी झाल्यानंतर ४८ तासांत जवळपास २०च्या वर अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे फेरआदेश काढण्यात आले. त्यामुळे आता अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यात प्रामुख्याने ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ १७ मार्चला पूर्ण झाला आहे. मुंबईनंतर महत्त्वाच्या असलेल्या या पदासाठी अनेक इच्छुक आहेत. त्याचबरोबर, संजय बर्वे यांची सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी पदोन्नती झाल्यानंतर, एसआयडीचे आयुक्तपद दोन महिन्यांपासून रिक्त असून, त्याचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडेच आहे. त्याशिवाय सीआयडीचे प्रमुख संजयकुमार यांची दोन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची बदली अपेक्षित आहे, तसेच पुणे, नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या पदांसाठीही काहींनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. तर पुण्याचे विभाजन करून पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्या ठिकाणचे पहिले आयुक्त बनण्यासाठीही अनेक पोलीस अधिकारी ‘प्रयत्न’शील आहेत.१५ निरीक्षकांच्या एटीएसमध्ये बदल्यालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील १५ पोलीस निरीक्षकांच्या दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तालय व जिल्ह्याच्या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झालेले व इच्छुकांच्या विनंतीवरून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे पोलीस निरीक्षक सध्याच्या ठिकाणांहून कार्यमुक्त होऊन एटीएसमध्ये हजर झाल्यानंतर त्यांची आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. त्याबाबतचे आदेश पोलीस महासंचालकांतर्फे काढण्यात आले आहेत. वाढत्या अतिरेकी कारवायांना लगाम घालण्यासाठी एटीएस अधिक सक्षम केले जात आहे. कार्यक्षम अधिकाऱ्यांची या ठिकाणी काम करण्यास निवड केली जात आहे.