शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

अप्पर महासंचालकांच्या बदल्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: May 11, 2017 03:16 IST

राज्य पोलीस दलात आत्तापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. आता पुढच्या टप्प्यात महासंचालक

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलात आत्तापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. आता पुढच्या टप्प्यात महासंचालक, अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पोलीस दलात उत्सुकता निर्माण झालेली आहे. विशेषत: ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदासह मुंबई आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) व राज्य गुप्तवार्ता (एसआयडी) रिक्त असलेल्या पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ही पदे महत्त्वाची असल्याने, त्या जागी नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ आहे. मात्र, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप निर्णय न झाल्याने, ५ ते ६ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाइल प्रलंबित असल्याचे गृहविभागातील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्यात लागू असलेल्या पोलीस बदली (सुधारणा) अधिनियम २०१४ च्या कायद्यानुसार, एखाद्या अधिकाऱ्याला एका पदावर दोन वर्षे कार्यरत राहण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी पीएसआय ते उपअधीक्षक व अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी काटेकोरपणे केली जाते. त्यावरील अधिकाऱ्यांबाबत हा नियम अपवादात्मकरीत्या वापरला जातो. गृहविभागाने २७ एप्रिलला १६ सहआयुक्त/विशेष महानिरीक्षक, १७ अपर आयुक्त व १०४ उपायुक्त/अधीक्षक दर्जाच्या अशा एकूण १३७ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात दोन वर्षांचा कालावधी पूर्ण न झालेल्या ३५ हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पहिल्यांदा बदल्यांचा आदेश जारी झाल्यानंतर ४८ तासांत जवळपास २०च्या वर अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे फेरआदेश काढण्यात आले. त्यामुळे आता अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यात प्रामुख्याने ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ १७ मार्चला पूर्ण झाला आहे. मुंबईनंतर महत्त्वाच्या असलेल्या या पदासाठी अनेक इच्छुक आहेत. त्याचबरोबर, संजय बर्वे यांची सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी पदोन्नती झाल्यानंतर, एसआयडीचे आयुक्तपद दोन महिन्यांपासून रिक्त असून, त्याचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडेच आहे. त्याशिवाय सीआयडीचे प्रमुख संजयकुमार यांची दोन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची बदली अपेक्षित आहे, तसेच पुणे, नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या पदांसाठीही काहींनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. तर पुण्याचे विभाजन करून पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्या ठिकाणचे पहिले आयुक्त बनण्यासाठीही अनेक पोलीस अधिकारी ‘प्रयत्न’शील आहेत.१५ निरीक्षकांच्या एटीएसमध्ये बदल्यालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील १५ पोलीस निरीक्षकांच्या दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तालय व जिल्ह्याच्या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झालेले व इच्छुकांच्या विनंतीवरून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे पोलीस निरीक्षक सध्याच्या ठिकाणांहून कार्यमुक्त होऊन एटीएसमध्ये हजर झाल्यानंतर त्यांची आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. त्याबाबतचे आदेश पोलीस महासंचालकांतर्फे काढण्यात आले आहेत. वाढत्या अतिरेकी कारवायांना लगाम घालण्यासाठी एटीएस अधिक सक्षम केले जात आहे. कार्यक्षम अधिकाऱ्यांची या ठिकाणी काम करण्यास निवड केली जात आहे.