शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

अप्पर महासंचालकांच्या बदल्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: May 11, 2017 03:16 IST

राज्य पोलीस दलात आत्तापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. आता पुढच्या टप्प्यात महासंचालक

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलात आत्तापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. आता पुढच्या टप्प्यात महासंचालक, अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पोलीस दलात उत्सुकता निर्माण झालेली आहे. विशेषत: ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदासह मुंबई आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) व राज्य गुप्तवार्ता (एसआयडी) रिक्त असलेल्या पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ही पदे महत्त्वाची असल्याने, त्या जागी नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ आहे. मात्र, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप निर्णय न झाल्याने, ५ ते ६ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाइल प्रलंबित असल्याचे गृहविभागातील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्यात लागू असलेल्या पोलीस बदली (सुधारणा) अधिनियम २०१४ च्या कायद्यानुसार, एखाद्या अधिकाऱ्याला एका पदावर दोन वर्षे कार्यरत राहण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी पीएसआय ते उपअधीक्षक व अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी काटेकोरपणे केली जाते. त्यावरील अधिकाऱ्यांबाबत हा नियम अपवादात्मकरीत्या वापरला जातो. गृहविभागाने २७ एप्रिलला १६ सहआयुक्त/विशेष महानिरीक्षक, १७ अपर आयुक्त व १०४ उपायुक्त/अधीक्षक दर्जाच्या अशा एकूण १३७ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात दोन वर्षांचा कालावधी पूर्ण न झालेल्या ३५ हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पहिल्यांदा बदल्यांचा आदेश जारी झाल्यानंतर ४८ तासांत जवळपास २०च्या वर अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे फेरआदेश काढण्यात आले. त्यामुळे आता अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यात प्रामुख्याने ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ १७ मार्चला पूर्ण झाला आहे. मुंबईनंतर महत्त्वाच्या असलेल्या या पदासाठी अनेक इच्छुक आहेत. त्याचबरोबर, संजय बर्वे यांची सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी पदोन्नती झाल्यानंतर, एसआयडीचे आयुक्तपद दोन महिन्यांपासून रिक्त असून, त्याचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडेच आहे. त्याशिवाय सीआयडीचे प्रमुख संजयकुमार यांची दोन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची बदली अपेक्षित आहे, तसेच पुणे, नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या पदांसाठीही काहींनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. तर पुण्याचे विभाजन करून पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्या ठिकाणचे पहिले आयुक्त बनण्यासाठीही अनेक पोलीस अधिकारी ‘प्रयत्न’शील आहेत.१५ निरीक्षकांच्या एटीएसमध्ये बदल्यालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील १५ पोलीस निरीक्षकांच्या दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तालय व जिल्ह्याच्या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झालेले व इच्छुकांच्या विनंतीवरून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे पोलीस निरीक्षक सध्याच्या ठिकाणांहून कार्यमुक्त होऊन एटीएसमध्ये हजर झाल्यानंतर त्यांची आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. त्याबाबतचे आदेश पोलीस महासंचालकांतर्फे काढण्यात आले आहेत. वाढत्या अतिरेकी कारवायांना लगाम घालण्यासाठी एटीएस अधिक सक्षम केले जात आहे. कार्यक्षम अधिकाऱ्यांची या ठिकाणी काम करण्यास निवड केली जात आहे.