शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

बालगृहांच्या नवनिर्माणाची प्रतीक्षा, सत्ताबदलामुळे दिरंगाई होत असल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 04:11 IST

एमएमआरडीएचा प्रस्ताव धूळखात; सत्ताबदलामुळे दिरंगाई होत असल्याची चर्चा

मुंबई : मुंबईतल्या बालगृहांच्या मेकओव्हरसाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) नियुक्ती करण्याची प्रक्रिया राज्यातील सत्ता बदलामुळे रखडल्याची माहिती हाती आली आहे. गेल्याच आठवड्यात या बालगृहांचे संचलन करणाऱ्या चिल्ड्रन एड सोसायटीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, बालगृहे सरकारने ताब्यात घ्यावीत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. त्या पार्श्वभूमीवर तरी एमएमआरडीएच्या प्रस्तावाला चालना देत, बालगृहांच्या परिस्थितीत सुधारणा होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वंचित घटक, निराधार मुलांना हक्काचा निवारा मिळावा, अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांच्या वेदनेवर फुंकर घालता यावी, यासाठी बालगृहांची स्थापना झाली. महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारित येणाºया मुंबईतल्या बालगृहांच्या संचलनाची जबाबदारी चिल्ड्रन एड सोसायटीकडे आहे. सरकारचे प्रतिनिधित्व करणाºया समितीची त्यावर देखरेख असली, तरी स्वच्छतागृहांपासून ते निवास व्यवस्थेपर्यंत आणि आरोग्य सुविधांपासून ते लैंगिक अत्याचारापर्यंत अनेक गैरप्रकारांमुळे बालगृहे वादाच्या भोवºयात सापडतात. तिथल्या मोकळ्या जागेवर अतिक्रमणही झाले आहे.हे चित्र बदलण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उमरखाडी, मानखुर्द, माटुंगा, बोरला येथील बालगृहांच्या ७० एकर जागेसाठी अर्बन डिझाइन गाइडलाइन तयार करण्याचे आदेश दिले होते. सोसायटीच्या विनंतीनंतर हे काम एमएमआरडीएकडे सोपविण्यात आले. त्यासाठी डीडीएफ कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या जागेच्या विकासाबाबतचे सविस्तर आराखड्यांचे काम या सल्लागारांनी केले असून, अहवाल जवळपास पूर्ण झाला आहे. दरम्यान, सोसायटीने १० एप्रिल, २०१९ रोजी केलेल्या विनंतीनुसार एमएमआरडीएने या परिसरासाठी विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची मागणी मान्य केली. त्याला प्राधिकरणात मंजुरी घेत, प्रस्ताव २२ मे आणि १६ जुलै, २०१९ रोजी राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला. मात्र, मंजुरी अद्याप मिळाली नसल्याचे एमएमआरडीएतल्या सूत्रांनी सांगितले.राज्यातील निवडणुकांचा हंगाम आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे हा प्रस्ताव अडगळीत पडला. मात्र, लवकरच त्याला चालना मिळेल, अशी अपेक्षाही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सरकारने मंजुरी दिल्यानंतर बालगृहाच्या जागांचे व्यवस्थापन, निधी कसा उभा करायचा, याबाबतचे निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.बालगृहातील मुलांना त्यांच्या वयोगटानुसार राहण्यासाठी, स्वच्छतागृहांची स्वतंत्र व्यवस्था असावी. वैद्यकीय उपचारांची सध्या प्रचंड गैरसोय होते. त्यात सुधारणा अपेक्षित आहे. बैठ्या खेळांसाठी खोली, अभ्यासिका, मोकळे मैदान अशी बालगृहांसाठी कायद्याला अभिप्रेत असलेली व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून ते काम झाले, तर निश्चित आनंद होईल. - विजय अध्यक्ष, बाल कल्याण समिती.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएMumbaiमुंबई