शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हुडहुडीसाठी वाट पाहा आणखी चार दिवस; वाढलेल्या पाऱ्याने लोकांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 07:56 IST

या जिल्ह्यांसह मराठवाड्यात दिवसा अधिक उबदारपणा, तर उर्वरित महाराष्ट्रात नेहमीसारखे साधारण वातावरण राहील, असे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. 

मुंबई : मुंबईसह राज्यभरात किमान तापमानाचा पारा पुन्हा एकदा वर चढत असून, थंडीने पळ काढला की काय असे वाटत आहे. पण हवामानातील हे बदल कायमस्वरूपी नसून, २-३ दिवसांत राज्यात हळूहळू किमान तापमानाची घसरण होऊन ९ डिसेंबरपासून पुन्हा हुडहुडी भरण्यासारखी थंडी पडण्याची शक्यता  आहे. डिसेंबरमध्ये चांगली सुरुवात होऊनही दक्षिणेकडून अल्प आर्द्रतेचा शिरकाव व उत्तरेकडून होत असलेला थंडीचा माराही नंतर स्थिरावल्याने  थंडी हिरावल्याचे चित्र आहे.

पारा ५ अंशांपर्यंत घसरणार दीर्घावधीच्या मासिक अंदाजानुसार साधारण ९ डिसेंबरपासून महिन्याच्या उर्वरित तीन आठवड्यांत राज्यभर पहाटेच्या सुमारास किमान तापमानात सरासरीपेक्षा घट होईल. त्यामुळे थंडीची शक्यता ५५ टक्के जाणवेल. नगर व हिंगोली जिल्ह्यांत तर ही शक्यता ६५ टक्के आहे. 

मराठवाड्यासह नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, तसेच वर्धा, नागपूर जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीइतके जाणवण्याची शक्यताही ५५ टक्के आहे. या जिल्ह्यांसह मराठवाड्यात दिवसा अधिक उबदारपणा, तर उर्वरित महाराष्ट्रात नेहमीसारखे साधारण वातावरण राहील, असे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.