शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

हुडहुडीसाठी वाट पाहा आणखी चार दिवस; वाढलेल्या पाऱ्याने लोकांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 07:56 IST

या जिल्ह्यांसह मराठवाड्यात दिवसा अधिक उबदारपणा, तर उर्वरित महाराष्ट्रात नेहमीसारखे साधारण वातावरण राहील, असे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. 

मुंबई : मुंबईसह राज्यभरात किमान तापमानाचा पारा पुन्हा एकदा वर चढत असून, थंडीने पळ काढला की काय असे वाटत आहे. पण हवामानातील हे बदल कायमस्वरूपी नसून, २-३ दिवसांत राज्यात हळूहळू किमान तापमानाची घसरण होऊन ९ डिसेंबरपासून पुन्हा हुडहुडी भरण्यासारखी थंडी पडण्याची शक्यता  आहे. डिसेंबरमध्ये चांगली सुरुवात होऊनही दक्षिणेकडून अल्प आर्द्रतेचा शिरकाव व उत्तरेकडून होत असलेला थंडीचा माराही नंतर स्थिरावल्याने  थंडी हिरावल्याचे चित्र आहे.

पारा ५ अंशांपर्यंत घसरणार दीर्घावधीच्या मासिक अंदाजानुसार साधारण ९ डिसेंबरपासून महिन्याच्या उर्वरित तीन आठवड्यांत राज्यभर पहाटेच्या सुमारास किमान तापमानात सरासरीपेक्षा घट होईल. त्यामुळे थंडीची शक्यता ५५ टक्के जाणवेल. नगर व हिंगोली जिल्ह्यांत तर ही शक्यता ६५ टक्के आहे. 

मराठवाड्यासह नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, तसेच वर्धा, नागपूर जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीइतके जाणवण्याची शक्यताही ५५ टक्के आहे. या जिल्ह्यांसह मराठवाड्यात दिवसा अधिक उबदारपणा, तर उर्वरित महाराष्ट्रात नेहमीसारखे साधारण वातावरण राहील, असे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.