शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

रुग्णवाहिकेला वाट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2016 04:50 IST

विघ्नहर्त्याच्या आगमनाला अवघ्या काही तासांचा अवधी उरल्याने महाराष्ट्रात उत्साही वातावरण असताना त्याचा फटका रुग्णांना बसू नये

जमीर काझी,

मुंबई- विघ्नहर्त्याच्या आगमनाला अवघ्या काही तासांचा अवधी उरल्याने महाराष्ट्रात उत्साही वातावरण असताना त्याचा फटका रुग्णांना बसू नये, यासाठी पोलिसांनी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. वाहने सावकाश चालवा, रुग्णवाहिकेला वाट करून द्या, अशी साद राज्यभरातील पोलिसांकडून गणेशभक्तांना घातली जाणार आहे. मिरवणूक व सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना बेशिस्त वाहनांमुळे अपघात होऊ नये, तसेच रुग्णांना वेळेत रुग्णालयामध्ये नेता यावे, यासाठी ‘गणपती उत्सव थीम-२०१६’ ही जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.राज्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी त्याबाबत पोस्टर लावून नागरिकांना आवाहन करावे, अशी सूचना पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना केली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. मिरवणूक, वाहनांच्या गर्दीमुळे रुग्णांना घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकांना वेळेत रुग्णालयात पोहोचण्यास अडथळा होत असतो. त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याचे काम मुंबईतील राधी डिझास्टर अ‍ॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने केले जाते. त्यानुसार प्रत्येक पोलीस घटकप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सवाच्या कालावधीत रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज आल्यास मार्गावरील वाहने डाव्या बाजूला ठेवणे तसेच हळू चालविण्याबाबत गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करावयाची आहे. (प्रतिनिधी)>नागरिकांनी खबरदारी घ्यावीमहाराष्ट्रात नऊ पोलीस आयुक्तालये व ३५ अधीक्षक कार्यालये आहेत. त्याअंतर्गत एकूण १ हजार ७६ पोलीस ठाणी असून, त्यांच्या हद्दीतील प्रत्येक गणेशोत्सव मंडळामार्फत ‘स्लो ड्राइव्ह आणि वे टू अ‍ॅम्ब्युलन्स’ याबाबत जनजागृती केली जाणार आहे.गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे. अपघातात एकूण मृत्युमुखी पडणाऱ्या दर पाच व्यक्तींमध्ये एकाचा मृत्यू हा वेळेत उपचार न मिळाल्याने होतो. त्यामुळे याबाबत प्रत्येक पोलीस ठाण्याकडून गणेशोत्सव मंडळांमध्ये ही जनजागृती मोहीम राबविली जाईल. - सतीश माथूर (पोलीस महासंचालक)