शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाधवान बंधूंचा आता ताबा ‘सीबीआय’कडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 06:07 IST

कपिल व धीरज वाधवानला ताब्यात घ्यावे या आशयाचे १० दिवसाअगोदरच ‘सीबीआय’ला पत्र पाठविले होते. त्यांचा ‘क्वॉरंटाईन’चा कालावधी संपला होता.

नागपूर : ‘येस बँक’ घोटाळ््याप्रकरणी जामिनावर बाहेर असलेले ‘डीएचएफएल’चे प्रवर्तक कपिल व धीरज वाधवान यांचा रविवारी दुपारी साताऱ्यात ‘सीबीआय’कडे ताबा देण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी येथे दिली. ‘लॉकडाउन’च्या कालावधीत हे दोघेही कुटुंबीयांसह आपत्कालीन स्थितीचे कारण देत मुंबईहून महाबळेश्वरला पोहोचले होते. त्यांच्या इतर कुटुंबीयांना ‘होम क्वॉरंटाइन’ करण्यात आले आहे.गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची परवानगी घेऊन वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला गेले होते. ही बाब समोर येताच त्यांना ‘क्वॉरंटाइन’ करण्यात आले होते. कपिल व धीरज वाधवानला ताब्यात घ्यावे या आशयाचे १० दिवसाअगोदरच ‘सीबीआय’ला पत्र पाठविले होते. त्यांचा ‘क्वॉरंटाईन’चा कालावधी संपला होता. रविवारी दुपारी ३.३० वाजता साताºयाच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना ‘सीबीआय’च्या ताब्यात दिले. सोबतच मुंबईपर्यंत सुरक्षेसाठी पोलीसदेखील दिले, अशी माहिती अनिल देशमुख यांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून दिली.अमिताभ गुप्ता यांनी जे पत्र दिले होते त्याची चौकशी करण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे होती. त्यांचा अहवाल रविवारीच प्राप्त झाला. संबंधित पत्र हे गुप्ता यांनी कुठल्याही दबावात न येता स्वत: दिल्याचे चौकशीत कबूल केले होते. या अहवालाची रीतसर फाईल तयार होईल व माझ्याकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यानंतरच अहवालावर निर्णय घेण्यात येईल. हा अहवाल लवकरच आम्ही सार्वजनिकदेखील करू, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.या प्रकरणावरुन जे राजकारण करण्यात आले ते दुर्दैवी होते. पत्र कुणाच्या तरी दबावातून देण्यात आले असे तर्कवितर्क लावण्यात आले. राज्य ‘कोरोना’चा सामना करत असताना राज्याचे नेतृत्व केलेले लोकच राजकारण करत असतील ही दु:खद बाब आहे, असे देखील ते म्हणाले.-------------त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदतराज्यातील पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल टाकून ‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करत आहे. दोन पोलीस कर्मचाºयांचा ‘कोरोना’मुळेच मृत्यू झाला. शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. शासनाच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत करण्यात येईल. शिवाय कुटुंबातील एकाला नोकरी व नियमानुसार इतर सहकार्य करण्यात येईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. मुंबईतील दोन इस्पितळे पोलीस यंत्रणेसाठी राखून ठेवली आहेत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.