शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

वाधवान बंधूंचा आता ताबा ‘सीबीआय’कडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 06:07 IST

कपिल व धीरज वाधवानला ताब्यात घ्यावे या आशयाचे १० दिवसाअगोदरच ‘सीबीआय’ला पत्र पाठविले होते. त्यांचा ‘क्वॉरंटाईन’चा कालावधी संपला होता.

नागपूर : ‘येस बँक’ घोटाळ््याप्रकरणी जामिनावर बाहेर असलेले ‘डीएचएफएल’चे प्रवर्तक कपिल व धीरज वाधवान यांचा रविवारी दुपारी साताऱ्यात ‘सीबीआय’कडे ताबा देण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी येथे दिली. ‘लॉकडाउन’च्या कालावधीत हे दोघेही कुटुंबीयांसह आपत्कालीन स्थितीचे कारण देत मुंबईहून महाबळेश्वरला पोहोचले होते. त्यांच्या इतर कुटुंबीयांना ‘होम क्वॉरंटाइन’ करण्यात आले आहे.गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची परवानगी घेऊन वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला गेले होते. ही बाब समोर येताच त्यांना ‘क्वॉरंटाइन’ करण्यात आले होते. कपिल व धीरज वाधवानला ताब्यात घ्यावे या आशयाचे १० दिवसाअगोदरच ‘सीबीआय’ला पत्र पाठविले होते. त्यांचा ‘क्वॉरंटाईन’चा कालावधी संपला होता. रविवारी दुपारी ३.३० वाजता साताºयाच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना ‘सीबीआय’च्या ताब्यात दिले. सोबतच मुंबईपर्यंत सुरक्षेसाठी पोलीसदेखील दिले, अशी माहिती अनिल देशमुख यांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून दिली.अमिताभ गुप्ता यांनी जे पत्र दिले होते त्याची चौकशी करण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे होती. त्यांचा अहवाल रविवारीच प्राप्त झाला. संबंधित पत्र हे गुप्ता यांनी कुठल्याही दबावात न येता स्वत: दिल्याचे चौकशीत कबूल केले होते. या अहवालाची रीतसर फाईल तयार होईल व माझ्याकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यानंतरच अहवालावर निर्णय घेण्यात येईल. हा अहवाल लवकरच आम्ही सार्वजनिकदेखील करू, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.या प्रकरणावरुन जे राजकारण करण्यात आले ते दुर्दैवी होते. पत्र कुणाच्या तरी दबावातून देण्यात आले असे तर्कवितर्क लावण्यात आले. राज्य ‘कोरोना’चा सामना करत असताना राज्याचे नेतृत्व केलेले लोकच राजकारण करत असतील ही दु:खद बाब आहे, असे देखील ते म्हणाले.-------------त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदतराज्यातील पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल टाकून ‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करत आहे. दोन पोलीस कर्मचाºयांचा ‘कोरोना’मुळेच मृत्यू झाला. शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. शासनाच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत करण्यात येईल. शिवाय कुटुंबातील एकाला नोकरी व नियमानुसार इतर सहकार्य करण्यात येईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. मुंबईतील दोन इस्पितळे पोलीस यंत्रणेसाठी राखून ठेवली आहेत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.