शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

मुंबईत मतदारसंख्या घटली

By admin | Updated: July 9, 2016 02:04 IST

प्रत्येक निवडणुकीला जनजागृती करूनही मतदान सरासरी ५० टक्केच राहिल्याचे आणि मतदारांची संख्याही दहा लाखांनी घटल्याचे उघडकीस आले आहे़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत

मुंबई : प्रत्येक निवडणुकीला जनजागृती करूनही मतदान सरासरी ५० टक्केच राहिल्याचे आणि मतदारांची संख्याही दहा लाखांनी घटल्याचे उघडकीस आले आहे़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत तरुण मतदारांना आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे़ त्यानुसार, महाविद्यालयांत मतदार नोंदणी अर्ज वाटणे, शाळांमध्ये निवडणुकीसंदर्भात स्पर्धा आयोजित करणे आणि प्रसिद्ध अभिनेत्यांमार्फत संदेश देण्याचा कार्यक्रम महापालिकेने आखला आहे़महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे़ या निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१७ नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे़ त्यापूर्वी म्हणजे २० डिसेंबरपर्यंत नवीन मतदार, मतदार यादीतून नाव गायब असलेले मतदार, स्थालांतरित मतदार अशा सर्वांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता किंवा अद्ययावत करता येणार आहे़ यासाठी असलेल्या केंद्रांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे़पुढील वर्षी सज्ञान होणारेही मतदार१ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मतदार होता येणार आहे़ यासाठी सप्टेंबरपासून राज्य निवडणूक आयोगामार्फत मतदार नोंदणी मोहीम सुरू होणार आहे़ तेव्हा या मतदारांना आपल्या वयाचा पुरावा देऊन वयाची १८ वर्षे पूर्ण व्हायचा दोन महिने आधीच आपले नाव नोंदविता येईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले़आरक्षण वाढणारसरासरी ५० ते ५५ हजार मतदारांचा एक वॉर्ड असतो़ प्रत्येक वॉर्डाची फेररचना होणार आहे़ अनुसूचित जाती व जमातींच्या व इतर मागासवर्गीयांच्या लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे आरक्षित वॉर्डांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़, तरीही वॉर्डांची संख्या २२७ च राहणार आहे़जनजागृतीसाठी अभिनेते मैदानातमतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्यांना मैदानात उतरविण्यात आले आहे़ या मोहिमेला मराठी अभिनेते अशोक सराफ, प्रशांत दामले आणि स्वप्निल जोशी यांनी प्रतिसाद दिला आहे़ त्यानुसार, मतदार नोंदणीचे संदेश देणाऱ्या पोस्टर्स व जाहितरातींमध्ये हे कलाकार झळकणार आहेत़लोकसंख्येत चढउतार- २०१२ मध्ये मुंबईची लोकसंख्या एक कोटी १९ लाख ७८ हजार ४५० लोकसंख्या होती़ यापैकी १ कोटी दोन लाख ८६ हजार ५७९ मतदार होते़- २०१७ मध्ये लोकसंख्येत वाढ होऊन एक कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ झाली आहे, तर मतदार मात्र ९१ लाख ८७ हजार २७८ उरले आहेत़मतदान केंद्र पहिल्यांदाच वाढणार२०१२ च्या पालिका निवडणुकीत ७,६३९ मतदान केंद्रे होती़ मतदारांची घटणारी संख्या पाहता, दूरवरच्या मतदान केंद्रावर मतदार फिरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे सर्वांना एक किमीहून कमी अंतरावर मतदान केंद्र उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे़ त्यानुसार, नऊ हजारांहून अधिक मतदान केंद्रे या वेळी असणार आहेत़ मात्र, एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांची मर्यादा घालण्यात येणार आहे़प्रत्येक निवडणुकीत मतदान ५० टक्क्यांवरच अडकले आहे़ मतदारांची यादी अद्ययावत केली असता, २०१२ नंतर मतदारांच्या संख्येत एक कोटी दोन लाख ८६ हजार ५७९ इतकी घट झाली असून, सध्या ९१ लाख ८७ हजार २७८ मतदार उरले आहेत़ अशी होणार मतदारांची नोंदणीटोल फ्री हेल्पलाइन १८००२२१९५० यावर मतदार नोंदणीविषयी माहिती उपलब्ध आहे़, तर www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार नोंदणी अर्ज व माहिती उपलब्ध आहे, तसेच महाविद्यालयांमध्येही अर्ज वाटण्यात येणार आहेत़ नावात बदल, नावाचा समावेश, मृत मतदाराचे नाव वगळणे, स्थलांतर, नावात दुरुस्ती व नोंदणीसाठी उपनगरांमध्ये २६ केंद्र आहेत़ ३१ आॅगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहील़ या सर्वांची माहिती संकेतस्थळावर आहे़