शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विधिमंडळ अंदाज समितीची जिल्ह्याला भेट

By admin | Updated: July 14, 2017 03:28 IST

औद्योगिक विभाग, मत्स्य विभाग, गृह विभाग, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग (गौण खनिज) आणि फलोत्पादन विभागांना महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीने भेटी दिल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक विभाग, मत्स्य विभाग, गृह विभाग, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग (गौण खनिज) आणि फलोत्पादन विभागांना महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीने भेटी दिल्या. सर्वपक्षीय २५ सदस्य असलेल्या समितीमध्ये फक्त नऊच सदस्य उपस्थित होते. रायगड जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ६६० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. समितीचा पूर्व नियोजित दौरा रद्द झाल्याने त्यांनी अचानक जिल्ह्याला भेट देण्याचे ठरविले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. १३ आणि १४ जुलै या दोन दिवसांमध्ये समिती जिल्ह्यातील विविध विभागांना भेटी घेऊन तेथील आढावा घेणार आहेत. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन समितीने आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. जिल्ह्याची भौगोलिक रचना मोठी असल्यामुळे सदस्यांचे दोन गट करण्यात आले. एक गट कर्जत, खालापूर, पेण, पनवेल तालुक्याच्या दिशेने गेला तर, दुसरा गट हा रोहे, माणगाव, महाड, पाली, पोलादपूर तालुक्याला भेट देण्यासाठी रवाना झाला. या गटामध्ये समितीचे कार्यकारी प्रमुख आमदार उदय सामंत होते. पहिल्या गटामध्ये विधिमंडळ अंदाज समितीचे माजी अध्यक्ष श्यामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील होते. आमदार सामंत यांच्या गटाने रोहे तालुक्यातील सुदर्शन केमिकल कंपनीला भेट दिली. रेती उत्खननाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तेथील पाहणी करण्यात आली. रोहे तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी कंपनीलाही भेट दिली, तसेच तालुक्यातील फलोत्पादन विभागाचीही पाहणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पास्को कंपनी, एमआयडीसी, सुधागड पाली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कामाचीही पाहणी केली. रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीची पाहणी करून आजच्या दौऱ्याची सांगता केल्याचे समिती प्रमुख आमदार उदय सामंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.समितीच्या पहिल्या गटातील आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता याबाबतची माहिती आताच देता येणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.समिती १४ जुलै रोजी अलिबाग तालुक्यातील मांडवा व मुरुड तालुक्याला भेट देणार आहे. समितीने ज्या विभागांचा दौरा केला आहे त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना आम्ही पत्रकारांशी बोलू असेही आ. सामंत यांनी सांगितले.