शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

व्हायरल फिव्हर : ‘सोशल’ भक्तांची अंध मुशाफिरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 15:17 IST

पाठव पुढेचा धडाका : व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुकवर धुमाकूळ 

ज्ञानेश्वर मुंदे/ यवतमाळ : ‘आज रात्री कॉस्मिक किरणांचा मारा होणार, मोबाइल बंद ठेवा’, ‘महत्त्वाची कागदपत्रे सापडली, संबंधितापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा’ असे संदेश व्हॉट्सअ‍ॅप तर ‘जानिए अपके पिछले जन्म के रहस्य’, ‘चोरी छिपे आपका प्रोफाईल कोण देखता है, ‘जय हिंद लिखकर शेअर करे’ अशा पोस्ट फेसबुकवर धडधड येऊन पडतात. ‘पाठव पुढे’चा धडाका लावत सोशल भक्तांची अंध मुशाफिरी सुरू आहे. काही वर्षापूर्वी संवादाचे माध्यम असलेला मोबाइल आता गॅझेट झाले आहे. कोणतीही गोष्ट अवघ्या काही क्षणात मोबाइलवरुन करणे शक्य झाले आहे. आर्थिक व्यवहारापासून ते  माहितीच्या अदान-प्रदानापर्यंत सर्वच मोबाइलवर होऊ लागले. त्यातच काही कंपन्यांनी अल्पदरात मुबलक डाटा दिल्याने ग्राहकांची संख्या वाढली. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आणि या स्मार्ट फोनने अनेकांना भुरळ पाडली. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप तर  प्रत्येकाचा श्वास झाला आहे. अनेकांना त्याचे व्यसनच लागले आहे. दर पाच-दहा मिनिटांनी मोबाइलवर बोटे फिरवून ‘जगाच्या संपर्कात’ राहण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश व्हॉटस्अ‍ॅपचे व्यसन प्रत्येक स्मार्ट फोनधारकाला लागले आहे. त्यावर येणारे मॅसेज पाठविण्याचा आनंद प्रत्येकच जण घेत आहे. मात्र अनेकदा कोणतीही खातरजमा न करता मॅसेज समोर पाठविले जातात. त्यातून अनेकदा सामाजिक समस्या, सामाजिक तेढ निर्माण करणा-या घटना घडतात. याचा अनुभव अनेकांनी घेतलाही आहे. काहींवर तर गुन्हेही दाखल झाले. परंतु त्यातून कुणी सुशिक्षित झाला नाही. अलिकडे तर भीती निर्माण करणारेही मॅसेज येतात. एकच मॅसेज दहादा   एकाच ग्रुपवर दहादा तोच तो मॅसेज वाचावा लागतो. काही दिवसापूर्वी आज कॉस्मेटिक किरणांचा मारा होणार, आपला मोबाइल मध्यरात्रीपासून बंद ठेवा, असे संदेश फिरत होते. यासाठी नासाची बीबीसी न्यूज सर्च करा, असेही सांगितले जाते.  परंतु या मॅसेज खाली कुठलीही तारीख दिलेली नसते. त्यामुळे तो मॅसेज नेमका केव्हाचा हेही समजत नाही. परंतु आपल्याला माहीत झाले, दुस-यांना माहीत व्हावे या अंध:विश्वासातून हा मॅसेज सारखा फिरत असतो. महत्त्वाची कागदपत्रे सापडली, कुणाला तरी मिल्ट्रीचा कॉल आला परंतु त्याचा पत्ता चुकीचा आहे, संबंधितांपर्यंत पोहोचविण्यास मदत करा असे एक ना अनेक मॅसेज बीप बीप धडकत असतात. फेसबुकवरही अलिकडे युझर्सला भुरळ घालणारे पोस्ट येत आहे. भावनात्मक आवाहन केले जाते तर कधी भीती दाखविली जाते. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी भविष्यात कोणते संकट उभे करेल हे सांगता येत नाही. 

अखेर न वाचताच मॅसेज डिलीट प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये किमान दहा ग्रुप तरी असतात. प्रत्येक ग्रुपवर दिवसाला २० मॅसेज आले तरी दिवसाकाठी २०० मॅसेज येऊन पडतात. त्यासोबत इमेजेसही असतात. कुणालाच एका दिवशी २०० मॅसेज वाचण्यासाठी वेळ नसते. मग बल्कमध्ये मॅसेज डिलिट केले जातात. यात अनेकदा महत्वाचे संदेशही नाईलाजाने डिलीट होतात. सोशल मीडियावर मुशाफिरी करताना काय महत्त्वाचे आणि कुणाला पाठवायचे याचा विचार करूनच पोस्ट करणे अपेक्षित आहे.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया