शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित, पोलिसांवर हल्ले सहन करणार नाही - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 07:04 IST

पोलिसांनी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले असून, सोशल माध्यमे तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मुंबई/नागपूर : नागपुरात सोमवारी रात्री घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना अजिबात सोडण्यात येणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. दरम्यान, सोमवारी सायंकाळनंतर महाल, हंसापुरी भागात झालेल्या दोन गटांमधील संघर्षानंतर मंगळवारी संपूर्ण नागपुरात तणावपूर्ण शांतता होती. शहरातील सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलिसांनी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले असून, सोशल माध्यमे तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

नागपूरच्या हिंसाचारावर निवेदन करताना फडणवीस म्हणाले की, निश्चितपणे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय. हल्ल्यात तीन उपायुक्तांसह ३३ पोलिस जखमी झाले. एका उपायुक्तावर तर कुऱ्हाडीने हल्ला झाला. महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. इथे शांतता राहिली तर प्रगतीकडे जाऊ. यापुढे कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर जात, धर्म न पाहता कारवाई केली जाईल.

काही झाले तरी त्यांना सोडण्यात येणार नाही : फडणवीस११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तसेच, एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस महासंचालकांनी राज्यभर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांवरील हल्ले अजिबात सहन करणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झाले तरी सोडण्यात येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

या प्रकरणाच्या मुळाशी सरकार जाईल : एकनाथ शिंदेनागपूरमध्ये आंदोलनानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही समाजाला शांत केले होते. मात्र, काही तासांत लगेचच दोन-पाच हजाराचा मॉब कसा जमला. घरात मोठे दगड टाकले. हॉस्पिटलची तोडफोड केली. एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केले गेले. दंगेखोरांकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले. वाहनेही जाळण्यात आली. एका विशिष्ट ठिकाणी शंभर - दीडशे बाइक पार्क व्हायच्या पण काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती. याचा अर्थ हे नियोजनपूर्वक षडयंत्र होते. या प्रकरणाच्या मुळाशी सरकार जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस