शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित, पोलिसांवर हल्ले सहन करणार नाही - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 07:04 IST

पोलिसांनी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले असून, सोशल माध्यमे तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मुंबई/नागपूर : नागपुरात सोमवारी रात्री घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना अजिबात सोडण्यात येणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. दरम्यान, सोमवारी सायंकाळनंतर महाल, हंसापुरी भागात झालेल्या दोन गटांमधील संघर्षानंतर मंगळवारी संपूर्ण नागपुरात तणावपूर्ण शांतता होती. शहरातील सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलिसांनी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले असून, सोशल माध्यमे तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

नागपूरच्या हिंसाचारावर निवेदन करताना फडणवीस म्हणाले की, निश्चितपणे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय. हल्ल्यात तीन उपायुक्तांसह ३३ पोलिस जखमी झाले. एका उपायुक्तावर तर कुऱ्हाडीने हल्ला झाला. महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. इथे शांतता राहिली तर प्रगतीकडे जाऊ. यापुढे कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर जात, धर्म न पाहता कारवाई केली जाईल.

काही झाले तरी त्यांना सोडण्यात येणार नाही : फडणवीस११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तसेच, एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस महासंचालकांनी राज्यभर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांवरील हल्ले अजिबात सहन करणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झाले तरी सोडण्यात येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

या प्रकरणाच्या मुळाशी सरकार जाईल : एकनाथ शिंदेनागपूरमध्ये आंदोलनानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही समाजाला शांत केले होते. मात्र, काही तासांत लगेचच दोन-पाच हजाराचा मॉब कसा जमला. घरात मोठे दगड टाकले. हॉस्पिटलची तोडफोड केली. एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केले गेले. दंगेखोरांकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले. वाहनेही जाळण्यात आली. एका विशिष्ट ठिकाणी शंभर - दीडशे बाइक पार्क व्हायच्या पण काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती. याचा अर्थ हे नियोजनपूर्वक षडयंत्र होते. या प्रकरणाच्या मुळाशी सरकार जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस