शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दिल्लीत हिंसाचार; राज्यात सतर्कतेच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 06:32 IST

कॅबविरोधातील असंतोष; डाव्या, विद्यार्थी संघटनांवर पोलिसांचे लक्ष

मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात (कॅब) देशातील राजधानी दिल्ली व पूर्व भागातील वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: या कायद्याला विरोध करणाऱ्या डाव्या, विद्यार्थी संघटना, संस्थांवर लक्ष ठेवण्याची सूचना पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी सर्व पोलीस घटकप्रमुखांना दिली आहे.

हिवाळी अधिवेशन, ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ‘कॅब’विरोधातील आंदोलनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याबाबत विशेष खबरदारी बाळगण्याची सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कॅब विधेयकाला हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळविली. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी केल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्याविरोधात पूर्व राज्ये व दिल्लीत हिंसक आंदोलने होत आहेत. राज्यातही कॉँग्रेस, राष्टÑवादी व डावे पक्ष आणि संघटनांनी विरोध दर्शविला आहे. राज्यात विविध ठिकाणी त्याच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात येत आहेत. मात्र दिल्लीतील जामिया विद्यापीठ व अन्यत्र झालेल्या हिंसक आंदोलनाचे पडसाद राज्यातही उमटण्याची शक्यता आहे. विशेषत: काही विद्यार्थी संघटनांकडून आंदोलनाची तीव्रता वाढविण्याची शक्यता असल्याने त्याबाबत खबरदारी बाळगण्याची सूचना पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी केली आहे. महाविद्यालयीन परीक्षा सुरू असल्याने आंदोलनामुळे त्याचे वेळापत्रक बिघडू नये, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निमाण होऊ नये, यासाठी महाविद्यालयीन परिसर व महत्त्वाच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.