शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

“गद्दारी, बेईमानी केली, कधीही माफ करणार नाही”; ठाकरे गटाची मनिषा कायंदे यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 15:28 IST

यांना राजकारणात काडीचीही किंमत नव्हती, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, असे सांगत ठाकरे गटाने जोरदार टीका केली.

Vinayak Raut Criticised Manisha Kayande: शिवसेनेचे वर्धापन दिन शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून साजरा केला जात आहे. मात्र, वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे आणि शिशिर शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याची माहिती मिळाली आहे. पैकी मनिषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून, मनिषा कायंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कधीही माफ करणार नाही, असे म्हटले आहे. 

१९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यासाठी ठाकरे गट आणि शिंदेंची शिवसेना दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. या वर्धापन दिनापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधान परिषदेतील आमदार असलेल्या मनिषा कायंदे गेल्या काही काळापासून ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यानंतर आता मनिषा कायंदे नॉट रिचेबल आहेत. मनिषा कायंदे आता शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आता ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे.

गद्दारी, बेईमानी केली, कधीही माफ करणार नाही

सत्तापिपासू, स्वार्थी आणि संधीसाधू विधान परिषेदच्या आमदार शिंदे गटात जाणार आहेत. याची कल्पना आम्हाला दोन महिन्यांपासून होती. विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळण्यासाठी गद्दारी आणि बेईमानी केली आहे. यांना राजकारणात काडीचीही किंमत नव्हती, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. एवढा मोठा मानसन्मान प्राप्त करून दिला. शिवसेना पक्षाला गरज असताना उपकारकर्त्यांशी बेईमानी करून सत्तेसाठी राजकारणाच्या डबक्यात उडी मारत आहेत. तुम्हाला नियती कधीही माफ करणार नाही, या शब्दांत विनायक राऊतांनी टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरेंना मानसिक त्रास द्यायचा हा एकमेक धंदा गद्दारांचा

शिंदे गटाने खरेदी-विक्रीचा बाजार सुरू केला आहे. त्यांच्याकडे कोणतेही विचार नाहीत. केवळ उद्धव ठाकरेंना मानसिक त्रास द्यायचा हा एकमेक धंदा गद्दारांचा आहे. बाटगा अधिक कोडगा असतो… तसे हे कोडगे शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्यासाठी निघाले आहेत. पण, त्यांचा मनसुबा स्वार्थी लोकांना जवळ घेऊन कधीही पूर्ण होणार नाही, असे सांगत विनायक राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला.

 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे