शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिक म्हणजे, 'उठवळ मंत्री'; विनायक मेटेंची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 11:20 IST

आरक्षणाच्या नावाने नवाब मलिक यांनी मुस्लीम समाजाची दिशाभूल करू नयेत अशी आमची मागणी आहे, असेही मेटे म्हणाले.

मुंबई : राज्यातील मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून , यावर लवकरच निर्णय होणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. याच घोषणेवरून शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक म्हणजे, 'उठवळ मंत्री' असून, ते समाजाची दिशाभूल करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेत म्हंटलं आहे की, विधान परिषदमध्ये मी धनगर आणि मुस्लीम आरक्षणबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. ठाकरे सरकारमध्ये असलेले नवाब मलिक हे 'उठवळ मंत्री' आहे. मलिक हे मुस्लीम समाजाची दिशाभूल करत असून, सभागृहातंच मी त्यांना हे स्पष्टपणे सांगितले आहे. तर मुस्लीम समाजाला आरक्षण देणे मलिकांच्या हातात नसून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. त्यामुळे आरक्षणाची भूमिका मुख्यमंत्री यांनी आधी स्पष्ट करायली हवी, असे मेटे म्हणाले.

तर, असे असताना सुद्धा आम्ही आरक्षण देणार असे सतत मलिक यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र हे आरक्षण कसे, किती आणि कुठून देणार आहे. यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची मान्यता घ्यावी लगणार आहे. कॅबिनेटचा सुद्धा ठराव लागणार असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची तयारी आहे का ? असा सवालही मेटेंनी यावेळी उपस्थित केला आहे.

मुस्लीम आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये संभ्रम आहे. मलिक यांच्या घोषणेनंतर अवघ्या 2 दिवसात उद्धव ठाकरे यांनी आमचा असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलं. यातून  मुस्लीम आरक्षणाला उद्धव ठाकरे यांचे विरोध असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या नावाने नवाब मलिक यांनी मुस्लीम समाजाची दिशाभूल करू नयेत, असा टोलाही मेटेंनी यावेळी लगावला.