शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

विखेंनी शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला; ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 02:00 IST

मोदी यांचे गौरवोद्गार, बाळासाहेब विखे ही मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. ते व्यवस्थेचे शिकार झाले नाहीत, तर आपल्या मनाप्रमाणे त्यांनी व्यवस्था बदलवली - मुख्यमंत्री

प्रवरानगर (जि. अहमदनगर) : बाळासाहेब विखे यांनी शेती व ग्रामीण शिक्षणात महत्त्वपूर्ण प्रयोग करुन गावांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला. त्यांचे जीवन राज्याच्या विकासासाठी समर्पित होते. शेती क्षेत्राबाबत त्यांनी जो मूलभूत विचार केला होता त्याची उत्तरे नवीन कृषी सुधारणांमध्ये मिळतात, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

पद्मभूषण, लोकनेते दिवंगत डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन व प्रवरा शिक्षण संस्थेचा नामविस्तार सोहळा मोदी यांच्या हस्ते मंगळवारी व्हर्च्युअल पद्धतीने झाला. या कार्यक्रमासाठी मोदी हे दिल्लीहून तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून आॅनलाईन उपस्थित होते. येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, हरिभाऊ बागडे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे , खासदार डॉ. सुजय विखे आदींची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

मोदी यांनी शिवाजी महाराजांना वंदन करुन मराठीत भाषणाला सुरुवात केली. आत्मचरित्रातील काही उतारे व संदर्भही त्यांनी मराठीतूनच कथन केले. ते म्हणाले, या आत्मचरित्राच्या प्रकाशनासाठी मी प्रत्यक्ष येणार होतो. पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्या पावलावर पाऊल ठेवत बाळासाहेबांनी काम केले. गाव, गरीब आणि शेतकरी यांचे जीवन सुखकर करण्यासाठी त्यांनी राजकारण व सत्तेचा वापर केला. सहकार ही निधर्मी चळवळ असून ती जाती-धर्माची बटिक नसल्याची मांडणी करत विखे यांनी सहकार व सिंचनाबाबत मूलभूत काम केले. शेतीला उद्योग का समजत नाहीत? हा त्यांचा प्रश्न होता. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर नवीन कृषी सुधारणांमध्ये आहे. बाळासाहेब विखे यांनी पाणी परिषदेच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसाठी महत्त्वपूर्ण काम केले, असे फडणवीस यांनी सांगितले.कोंडला गेलेला हिरा : उद्धव ठाकरेबाळासाहेब विखे ही मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. ते व्यवस्थेचे शिकार झाले नाहीत, तर आपल्या मनाप्रमाणे त्यांनी व्यवस्था बदलवली. हे घराणे मूळचे काँग्रेसचे. पण असे असतानाही बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेत घेतले. हा कोंडला गेलेला हिरा मंत्रिपद देऊन अटलजींच्या सरकारमध्ये कोंदणात बसविला. ठाकरे व विखे घराण्याचे ऋणानुबंध असल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस