शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विखेंनी शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला; ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 02:00 IST

मोदी यांचे गौरवोद्गार, बाळासाहेब विखे ही मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. ते व्यवस्थेचे शिकार झाले नाहीत, तर आपल्या मनाप्रमाणे त्यांनी व्यवस्था बदलवली - मुख्यमंत्री

प्रवरानगर (जि. अहमदनगर) : बाळासाहेब विखे यांनी शेती व ग्रामीण शिक्षणात महत्त्वपूर्ण प्रयोग करुन गावांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला. त्यांचे जीवन राज्याच्या विकासासाठी समर्पित होते. शेती क्षेत्राबाबत त्यांनी जो मूलभूत विचार केला होता त्याची उत्तरे नवीन कृषी सुधारणांमध्ये मिळतात, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

पद्मभूषण, लोकनेते दिवंगत डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन व प्रवरा शिक्षण संस्थेचा नामविस्तार सोहळा मोदी यांच्या हस्ते मंगळवारी व्हर्च्युअल पद्धतीने झाला. या कार्यक्रमासाठी मोदी हे दिल्लीहून तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून आॅनलाईन उपस्थित होते. येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, हरिभाऊ बागडे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे , खासदार डॉ. सुजय विखे आदींची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

मोदी यांनी शिवाजी महाराजांना वंदन करुन मराठीत भाषणाला सुरुवात केली. आत्मचरित्रातील काही उतारे व संदर्भही त्यांनी मराठीतूनच कथन केले. ते म्हणाले, या आत्मचरित्राच्या प्रकाशनासाठी मी प्रत्यक्ष येणार होतो. पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्या पावलावर पाऊल ठेवत बाळासाहेबांनी काम केले. गाव, गरीब आणि शेतकरी यांचे जीवन सुखकर करण्यासाठी त्यांनी राजकारण व सत्तेचा वापर केला. सहकार ही निधर्मी चळवळ असून ती जाती-धर्माची बटिक नसल्याची मांडणी करत विखे यांनी सहकार व सिंचनाबाबत मूलभूत काम केले. शेतीला उद्योग का समजत नाहीत? हा त्यांचा प्रश्न होता. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर नवीन कृषी सुधारणांमध्ये आहे. बाळासाहेब विखे यांनी पाणी परिषदेच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसाठी महत्त्वपूर्ण काम केले, असे फडणवीस यांनी सांगितले.कोंडला गेलेला हिरा : उद्धव ठाकरेबाळासाहेब विखे ही मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. ते व्यवस्थेचे शिकार झाले नाहीत, तर आपल्या मनाप्रमाणे त्यांनी व्यवस्था बदलवली. हे घराणे मूळचे काँग्रेसचे. पण असे असतानाही बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेत घेतले. हा कोंडला गेलेला हिरा मंत्रिपद देऊन अटलजींच्या सरकारमध्ये कोंदणात बसविला. ठाकरे व विखे घराण्याचे ऋणानुबंध असल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस