शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

...तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार : विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 12:19 PM

vijay wadettiwar : भटक्या विमुक्त जाती-जमाती मुक्ती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (३१ ऑगस्ट) सोलापुरात भटक्या विमुक्त व ओबीसींचा राज्यस्तरीय निर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमात वडेट्टीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सोलापूर : ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू असं सांगताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर यावेळी विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना “आम्हाला मोदींकडे घेऊन चला” अशी सादच घातली आहे. भटक्या विमुक्त जाती-जमाती मुक्ती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (३१ ऑगस्ट) सोलापुरात भटक्या विमुक्त व ओबीसींचा राज्यस्तरीय निर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमात वडेट्टीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. राजकीय शेरेबाजी आणि टोलेबाजीने हा मेळावा चांगलाच गाजला. यावेळी भाजपाचे नेते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, माकपचे नेते नरसय्या आडम, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, ओबीसी मेळाव्याचे राज्य समन्वयक रामराव वडकुते उपस्थित होते. 

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी रस्त्यावर उतरू. तरीही आरक्षण नाही मिळालं तर घोंगडी आणि काठी हातात घेऊ असा इशारा दिला. तसंच ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू असं सांगताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायला तयार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना “आम्हाला मोदींकडे घेऊन चला” अशी सादच घातली आहे. 

याचबरोबर, विजयवडेट्टीवार म्हणाले की, “आमचा मराठा समाजावर रोख नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा अजिबात विरोध नाही. उलट आम्ही पाठिंबाच देऊ. मात्र, प्रस्थापितांनी ओबीसीमधून आरक्षण मागू नये. आमच्या आरक्षणात प्रस्थापित आले तर इथे कोण टिकणार?”असा सवाल करतानाच “हात जोडून विनंती करतो पण ओबीसींमधून आरक्षण मागू नका”, असं विजय वड्डेटीवार यावेळी म्हणाले.

"हक्क मागणे हा गुन्हा नाही"३१ ऑगस्ट १९५२ रोजी देशाचे भाग्यविधाते पं. जवाहरलाल नेहरूंनी भटक्या विमुक्त जाती-जमातींवरचा गुन्हेगारीचा शिक्का पुसून त्यांना तारेच्या कुंपणातून मुक्त केले. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक घटनेला ७० वर्षे लोटली तरीही भटक्या विमुक्तांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन अजून बदलला नाही. भटक्या विमुक्त जाती-जमातींसह ओबीसी समाजाने प्रस्थापितांविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केल्याशिवाय आपले हक्क मिळणार नाहीत. हक्क मागणे हा गुन्हा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी अठरापगड जातींना एकत्र केले आणि स्वराज्य निर्माण केले. परंतु आज काहीजण महाराज ‘आमचे-तुमचे’ अशा भेदभावाची भाषा करतात. या सत्तेला झुकविण्याची ताकद निर्माण करावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय आगामी कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, या इशाऱ्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. 

"...तर एक लाख लोक आले असते"आजच्या दिवशीच सोलापूरात भटक्या विमुक्तांना मुक्त करण्याचे काम झाले होते. मात्र समाजाच्या दृष्टीकोणाला आजही आम्ही बदलू शकलो नाही. मान-अपमान सगळं सोडून, पक्षीय बंधनं सोडून चंद्रशेखर बावनकुळे इथे उपस्थित राहिले. कोरोनाचे बंधन नसते, तर एक लाख लोक इथे जमले असते. मंत्री पद काही कायम राहणार नाही. महाराष्ट्रचे नेतृत्व करण्याची क्षमता या समाजात आहे. माझी इच्छा आहे हा समाज मागणारा नव्हे तर देणारा व्हावा. इंग्रजांची सत्ता गेली तरी आमच्या समाजाला आजही गुलाम असल्यासारखे वाटते. आमच्यातला कोणी चपराशी झाला तरी दोन बायका करतो. अजूनही आम्हाला घर नाही, जातीचे दाखले मिळत नाहीत, असं सांगतानाच 2008 चा जीआर पुनर्जिवीत करण्यात येणार आहे. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवकांना जात कोणती ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNarendra Modiनरेंद्र मोदी