शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

"एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार"; वडेट्टीवारांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:10 IST

महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची गरज संपली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar on Eknath Shinde: महायुती सरकारमध्ये सध्या पालकमंत्री पदावरूनही प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी दोन पालकमंत्र्यांच्या नियु्क्तीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरुन वादाची ठिणगी पडल्याचे म्हटलं जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन दरे गावी गेल्याचे म्हटलं जात आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांची गरज संपली असून नवीन उदय पुढे येणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदे गटाने दावा केला होता. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीष महाजन यांच्या नावाला अजित पवार गटाने विरोध केला होता. त्यानंतर रविवारी महायुती सरकारमधील मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावरुनच विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.

"ही सगळी परिस्थिती पाहून जनताच सरकारला स्थिगिती देईल असं मला वाटायला लागलय. बहुमत मिळालं तरी ही काय सरकार चालवायची पद्धत आहे. आपआपसातले मतभेद वाढले आहेत. केवळ सत्तेसाठी ही स्पर्धा सुरु आहे. भांडा आणि महाराष्ट्राचे वाटोळे करा असं म्हणायची वेळ आली आहे. आता पालकमंत्री बदलले आहेत शेवटी मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे नाराज होऊन दरे गावी गेल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावरही वडेट्टीवारांनी भाष्य केलं. "नाराज होऊन पदरात पाडता येईल असा विषय आता फक्त बाकी आहे. एकनाथ शिंदेची परिस्थिती बिकट आहे. एकनाथ शिंदेंची गरज संपली का? कदाचित एकनाथ शिदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल. शिवसेनेच्या बाबतीत ही सुद्धा स्थिती येईल. शिवसेनेचा तिसरा उदय दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण उदय दोन्ही बाजूवर हात ठेवून आहेत. त्यांनी संबंध इतके सुंदर करुन ठेवले आहेत की ते उदयासाठीच आहेत," असा टोलाही विजय वडेट्टीवारांनी लगावला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUday Samantउदय सामंत