शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

“सत्ता जाताच फडणवीसांचा महाराष्ट्राच्या पोलिसांवरील विश्वास कमी झाला का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 18:04 IST

राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यापसून, त्यात खोडा कसा घालता येईल यासाठी ते प्रयत्न करत असून त्यांना सत्तांतर पचनी पडत नाही.

मुंबई : एल्गार प्रकरणात राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत असून, भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर यावरूनच आता काँग्रेस नेते तथा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात भाजपची सत्ता असताना त्यांनी एल्गार प्रकरणाचा तपास त्यावेळी एनआयएकडे दिला पाहिजे होता, मात्र त्यांनी तो त्यावेळी दिला नाही. त्यामुळे हा तपास आत्ताच एनआयएकडे देण्याचे कारण काय ?, भाजपची सत्ता असताना फडणवीस यांना महाराष्ट्राच्या पोलिसांवर असलेला तो विश्वास आता राहिला नाही का ? असेही वडेट्टीवार म्हणाले.

तर राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यापसून, त्यात खोडा कसा घालता येईल यासाठी ते प्रयत्न करत असून त्यांना सत्तांतर पचनी पडत नाही. मात्र हे सरकार 5 वर्षे टिकणार असून, लोकांना दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करणार असल्याचे सुद्धा वडेट्टीवार म्हणाले.