शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

विद्यावेतन योजना सुरूच राहणार

By admin | Updated: March 3, 2017 02:38 IST

प्रकल्पग्रस्त पाल्यांच्या शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती अर्थात विद्यावेतन योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोने तूर्तास मागे घेतला

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्त पाल्यांच्या शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती अर्थात विद्यावेतन योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोने तूर्तास मागे घेतला आहे. तशा आशयाचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या २३ मार्च रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडला आहे. विशेष म्हणजे, ही योजना पूर्ववत सुरू करावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश आले असून, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या हजारो पाल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईसह उरण, पनवेल तालुक्यांतील ९५ गावांच्या जमिनी संपादित केल्या. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना सिडकोच्या माध्यमातून १९७३ पासून विद्यावेतन दिले जाते. इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर किंवा आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना या विद्यावेतन योजनेचा लाभ घेता येतो. २0१३ मध्ये तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी विद्यावेतनाच्या रकमेत मोठी वाढ केली होती; परंतु मागील शैक्षणिक वर्षापासून महापालिका कार्यक्षेत्रापुरती ही योजना बंद करण्यात आली.ठाणे तहसीलमधील २९ गावे महापालिका क्षेत्रात मोडतात. तसेच हा संपूर्ण परिसर विकसित झाला आहे. शिवाय, या क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिका काम पाहते. अशा स्थितीत या क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना विद्यावेतन योजना सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद करीत १३ जून, २0१६च्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सिडकोच्या या निर्णयाचा प्रकल्पग्रस्तांतून तीव्र विरोध केला गेला. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. थेट विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून विद्यावेतन योजना बंद न करण्याची मागणी त्यांनी केली. तेव्हापासून या प्रश्नासाठी सिडको आणि शासकीय स्तरावर त्यांचा पाठपुरावा सुरूच होता. गेल्या आठवड्यात त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची भेट घेऊन विद्यावेतन पूर्ववत सुरू करण्याचा सुधारित प्रस्ताव संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत आणण्याची विनंती केली होती. त्यानुसार सिडकोने तशा आशयाचा प्रस्ताव तयार केला असून, २३ मार्च रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>चार वर्षांत अडीच कोटींचे वाटपनवी मुंबई, उरण आणि पनवेल परिसरातील अकरावी ते पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांसाठी सिडकोची विद्यावेतन योजना उपयुक्त ठरली आहे. आयटीआयसाठी ३000, पदवी ५000 आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी वर्षाला ६000 रुपये विद्यावेतन दिले जाते. या योजनेंतर्गत गेल्या चार वर्षांत महापालिका क्षेत्रातील ३४८0 विद्यार्थ्यांना तब्बल अडीच कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.