शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

विद्यावेतन योजना सुरूच राहणार

By admin | Updated: March 3, 2017 02:38 IST

प्रकल्पग्रस्त पाल्यांच्या शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती अर्थात विद्यावेतन योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोने तूर्तास मागे घेतला

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्त पाल्यांच्या शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती अर्थात विद्यावेतन योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोने तूर्तास मागे घेतला आहे. तशा आशयाचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या २३ मार्च रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडला आहे. विशेष म्हणजे, ही योजना पूर्ववत सुरू करावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश आले असून, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या हजारो पाल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईसह उरण, पनवेल तालुक्यांतील ९५ गावांच्या जमिनी संपादित केल्या. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना सिडकोच्या माध्यमातून १९७३ पासून विद्यावेतन दिले जाते. इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर किंवा आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना या विद्यावेतन योजनेचा लाभ घेता येतो. २0१३ मध्ये तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी विद्यावेतनाच्या रकमेत मोठी वाढ केली होती; परंतु मागील शैक्षणिक वर्षापासून महापालिका कार्यक्षेत्रापुरती ही योजना बंद करण्यात आली.ठाणे तहसीलमधील २९ गावे महापालिका क्षेत्रात मोडतात. तसेच हा संपूर्ण परिसर विकसित झाला आहे. शिवाय, या क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिका काम पाहते. अशा स्थितीत या क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना विद्यावेतन योजना सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद करीत १३ जून, २0१६च्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सिडकोच्या या निर्णयाचा प्रकल्पग्रस्तांतून तीव्र विरोध केला गेला. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. थेट विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून विद्यावेतन योजना बंद न करण्याची मागणी त्यांनी केली. तेव्हापासून या प्रश्नासाठी सिडको आणि शासकीय स्तरावर त्यांचा पाठपुरावा सुरूच होता. गेल्या आठवड्यात त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची भेट घेऊन विद्यावेतन पूर्ववत सुरू करण्याचा सुधारित प्रस्ताव संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत आणण्याची विनंती केली होती. त्यानुसार सिडकोने तशा आशयाचा प्रस्ताव तयार केला असून, २३ मार्च रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>चार वर्षांत अडीच कोटींचे वाटपनवी मुंबई, उरण आणि पनवेल परिसरातील अकरावी ते पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांसाठी सिडकोची विद्यावेतन योजना उपयुक्त ठरली आहे. आयटीआयसाठी ३000, पदवी ५000 आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी वर्षाला ६000 रुपये विद्यावेतन दिले जाते. या योजनेंतर्गत गेल्या चार वर्षांत महापालिका क्षेत्रातील ३४८0 विद्यार्थ्यांना तब्बल अडीच कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.