शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

अमित देशमुखांच्या गडालाही खिंडार; पण लातूरकर ठाम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 16:29 IST

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर मतदान केले जाते. स्थानिक प्रश्नांना या निवडणुकीत फारस महत्त्व नसते. परंतु, दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लाटेत अमित देशमुखांच्या मतदार संघाला काही प्रमाणात फटका बसला आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठमोठ्या दिग्गजांना पराभव टाळता आला नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही ज्यांनी आपले मतदार संघ कायम राखले होते, यावेळी त्यांचाही पाडाव झाला. लोकसभा निवडणुकीतील भाजपने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी काही प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर आणि उमेदवारावर अवलंबून असल्याने भाजपसाठी विधानसभेचा मार्ग वाटतो तितका सुकर नक्कीच नाही.

२०१४ मध्ये काँग्रेसने नांदेड आणि हिंगोली मतदार संघ कायम राखले होते. नांदेड हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ मानला जातो. मात्र यावेळी भाजपने या मतदार संघाचाही पाडाव केला. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्ह्यातही भाजपने दुसऱ्यांदा विजय मिळवला. यावेळी भाजपचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढले. नरेंद्र मोदी यांची झालेली सभा आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांभाळेली प्रचाराची धुरा यामुळे भाजपने लातूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात आघाडी घेतली. यामध्ये विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदार संघाचाही समावेश आहे.

लातूर लोकसभेतील सातपैकी सहा विधानसभा मतदार संघात भाजपला २५ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये लोहा आणि अहमदपूर मतदार संघात भाजपला अनुक्रमे ६० आणि ६३ हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. लातूरमध्ये लक्षवेधी ठरले ते अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदार संघातील भाजपचे मताधिक्य. येथे भाजपला इतर मतदार संघांच्या तुलनेत सर्वात कमी १४ हजार मतांची आघाडी मिळाली. यावरून लातूरकरांची आजही देशमुख कुटुंबियांवर माया असल्याचे दिसून आले, तरी ही माया काही प्रमाणात पातळ झाल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे काही प्रमाणात का होईना, मिळालेले मताधिक्य भाजपसाठी आनंद देणारे असून अमित देशमुख यांना विचार करायला भाग पाडणारे आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर मतदान केले जाते. स्थानिक प्रश्नांना या निवडणुकीत फारसं महत्त्व नसते. परंतु, दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लाटेत अमित देशमुखांच्या मतदार संघाला काही प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी अमित देशमुख यांना डावपेच आखावे लागणार आहे.