शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

अमित देशमुखांच्या गडालाही खिंडार; पण लातूरकर ठाम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 16:29 IST

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर मतदान केले जाते. स्थानिक प्रश्नांना या निवडणुकीत फारस महत्त्व नसते. परंतु, दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लाटेत अमित देशमुखांच्या मतदार संघाला काही प्रमाणात फटका बसला आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठमोठ्या दिग्गजांना पराभव टाळता आला नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही ज्यांनी आपले मतदार संघ कायम राखले होते, यावेळी त्यांचाही पाडाव झाला. लोकसभा निवडणुकीतील भाजपने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी काही प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर आणि उमेदवारावर अवलंबून असल्याने भाजपसाठी विधानसभेचा मार्ग वाटतो तितका सुकर नक्कीच नाही.

२०१४ मध्ये काँग्रेसने नांदेड आणि हिंगोली मतदार संघ कायम राखले होते. नांदेड हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ मानला जातो. मात्र यावेळी भाजपने या मतदार संघाचाही पाडाव केला. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्ह्यातही भाजपने दुसऱ्यांदा विजय मिळवला. यावेळी भाजपचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढले. नरेंद्र मोदी यांची झालेली सभा आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांभाळेली प्रचाराची धुरा यामुळे भाजपने लातूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात आघाडी घेतली. यामध्ये विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदार संघाचाही समावेश आहे.

लातूर लोकसभेतील सातपैकी सहा विधानसभा मतदार संघात भाजपला २५ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये लोहा आणि अहमदपूर मतदार संघात भाजपला अनुक्रमे ६० आणि ६३ हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. लातूरमध्ये लक्षवेधी ठरले ते अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदार संघातील भाजपचे मताधिक्य. येथे भाजपला इतर मतदार संघांच्या तुलनेत सर्वात कमी १४ हजार मतांची आघाडी मिळाली. यावरून लातूरकरांची आजही देशमुख कुटुंबियांवर माया असल्याचे दिसून आले, तरी ही माया काही प्रमाणात पातळ झाल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे काही प्रमाणात का होईना, मिळालेले मताधिक्य भाजपसाठी आनंद देणारे असून अमित देशमुख यांना विचार करायला भाग पाडणारे आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर मतदान केले जाते. स्थानिक प्रश्नांना या निवडणुकीत फारसं महत्त्व नसते. परंतु, दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लाटेत अमित देशमुखांच्या मतदार संघाला काही प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी अमित देशमुख यांना डावपेच आखावे लागणार आहे.