शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अमित देशमुखांच्या गडालाही खिंडार; पण लातूरकर ठाम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 16:29 IST

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर मतदान केले जाते. स्थानिक प्रश्नांना या निवडणुकीत फारस महत्त्व नसते. परंतु, दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लाटेत अमित देशमुखांच्या मतदार संघाला काही प्रमाणात फटका बसला आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठमोठ्या दिग्गजांना पराभव टाळता आला नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही ज्यांनी आपले मतदार संघ कायम राखले होते, यावेळी त्यांचाही पाडाव झाला. लोकसभा निवडणुकीतील भाजपने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी काही प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर आणि उमेदवारावर अवलंबून असल्याने भाजपसाठी विधानसभेचा मार्ग वाटतो तितका सुकर नक्कीच नाही.

२०१४ मध्ये काँग्रेसने नांदेड आणि हिंगोली मतदार संघ कायम राखले होते. नांदेड हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ मानला जातो. मात्र यावेळी भाजपने या मतदार संघाचाही पाडाव केला. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्ह्यातही भाजपने दुसऱ्यांदा विजय मिळवला. यावेळी भाजपचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढले. नरेंद्र मोदी यांची झालेली सभा आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांभाळेली प्रचाराची धुरा यामुळे भाजपने लातूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात आघाडी घेतली. यामध्ये विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदार संघाचाही समावेश आहे.

लातूर लोकसभेतील सातपैकी सहा विधानसभा मतदार संघात भाजपला २५ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये लोहा आणि अहमदपूर मतदार संघात भाजपला अनुक्रमे ६० आणि ६३ हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. लातूरमध्ये लक्षवेधी ठरले ते अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदार संघातील भाजपचे मताधिक्य. येथे भाजपला इतर मतदार संघांच्या तुलनेत सर्वात कमी १४ हजार मतांची आघाडी मिळाली. यावरून लातूरकरांची आजही देशमुख कुटुंबियांवर माया असल्याचे दिसून आले, तरी ही माया काही प्रमाणात पातळ झाल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे काही प्रमाणात का होईना, मिळालेले मताधिक्य भाजपसाठी आनंद देणारे असून अमित देशमुख यांना विचार करायला भाग पाडणारे आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर मतदान केले जाते. स्थानिक प्रश्नांना या निवडणुकीत फारसं महत्त्व नसते. परंतु, दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लाटेत अमित देशमुखांच्या मतदार संघाला काही प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी अमित देशमुख यांना डावपेच आखावे लागणार आहे.