शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

Vidhan Sabha 2019: भाजपमध्ये आयारामांमुळे नव्या-जुन्यांचा वाद ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 3:59 PM

एखाद्या पक्षाची सत्ता येणार असल्याचे वातावरण असल्यास अयारामांची तिकडे गर्दी सुरु होते.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात मोठ्याप्रमाणावर अयारामांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे निष्ठावंत आणि आयाराम अशी दोन गट भाजपमध्ये निर्माण झाले असून, नवीन कार्यकर्त्याना बैलासारखे शिंग मारु नये त्यांना सांभाळून घ्यावे असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना म्हणण्याची वेळ आली. विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली तर सहजपणे तिची फळे चाखणाऱ्या आयारामांच्या गर्दीत आपला निभाव लागण्याची शक्यता कमी असल्याने, निष्ठावंतांच्या वेदना ठसठसू लागल्या असल्याची चर्चा आहे.

एखाद्या पक्षाची सत्ता येणार असल्याचे वातावरण असल्यास अयारामांची तिकडे गर्दी सुरु होते. भाजपमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मेघा भरती सुरु आहे. पक्षात येणाऱ्या नवीन नेत्यांसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचा घोळका सुद्धा आपल्या साहेबांबरोबर नवा झेंडा हातात घेत असतात. मात्र आता याच आयाराम आणि निष्ठावंत यांच्यात नव्या-जुन्यांचा वाद उफाळून येत असल्याचे दिसत आहे.

नुकतेच पैठण येथील भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. युती बाबतचा निर्णय अजूनही झाला नसताना सुद्धा नव्याने पक्षात आलेले नेते पक्षाकडून आपणच उमेदवार असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण करत असल्याचे सांगत या शिष्टमंडळाने दानवेंसमोर कैफियत मांडली. तसेच मतदारसंघ जर भाजपला सुटला किंवा युती झाली नाही तर जुन्यांपैकी असेल्या इच्छुकाला उमेदवारी देण्याची मागणी सुद्धा यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दानवेंकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निवडणुकीपूर्वी केलेल्या इनकमिंगमुळे भाजपात मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे या मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ की काय अशी भीती वाटते आहे, असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तर पक्षात आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना साभाळून घेण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी दिला होता. मात्र सत्ता नसताना सुद्धा पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंताना डावलून आयाररामांना संधी दिली जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे, हे ही  तितकेच सत्य आहे.