शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बारवर आता एआय कॅमेऱ्यांची नजर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 05:52 IST

पुण्यातील ७० अनधिकृत पबवर कारवाई

मुंबई : पुण्यासह राज्यातील पब आणि बारमध्ये नियमांचे पालन होत आहे का, हे तपासण्यासाठी ‘एआय’ कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केले. पोर्शेकार दुर्घटनेप्रकरणी पुण्याच्या पोलिस आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी फेटाळली. 

पुण्यातील कल्याणी नगर अपघातप्रकरणी उद्धवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्यासह विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, भास्कर जाधव, रोहित पवार, रवींद्र धंगेकर यांनी लक्ष्यवेधी उपस्थित केली होती. विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील बार, पबधारकांकडून हप्ते उकळले जात आहेत, त्याचे रेटकार्ड ठरलेले आहे, पुण्याचा उडता पंजाब झाला आहे  असा गंभीर आरोप केला. फडणवीस यांनी हा आरोप फेटाळला पण सभागृहाचे सदस्य माहिती देतात ती खरी मानून चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. 

पुण्यातील दुर्घटनेबाबत ते म्हणाले की, ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्यावर सरकारने तत्काळ कारवाई केली आहे. तरुण पिढीला ड्रग्जचा विळखा लावण्याचा प्रयत्न चालला आहे. पूर्वी बाहेरून ड्रग्ज आणावे लागत होते पण आता ते केमिकलपासून बनवले जातात, सरकारने त्यावरही कारवाई केली असून ड्रग्जच्या बाबतीत झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू आहे. पोलिसांचा जर त्यात सहभाग आढळला तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. पुण्यातील ७० अनधिकृत पबवर कारवाई केली आहे.

‘पुण्याची बदनामी करू नका’वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यात ड्रग्ज माफियांनी थैमान घातले आहे. शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे त्याच पुण्यात बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यात पाठवावे की नाही याची पालकांना चिंता वाटते. अपघात झालेली कार विना नंबर प्लेट रस्त्यावर कशी फिरली, पोलिसांच्या हे का लक्षात आले नाही?

यावर अशा पद्धतीने पुण्याची बदनामी करणे योग्य नाही. सांस्कृतिक व शैक्षणिक शहर अशी पुण्याची ओळख आहे, आपण शहराबाबत टीका केली तर त्याचा दुष्परिणाम गुंतवणुकीवर होऊ शकतो, असे फडणवीस म्हणाले. पुण्याच्या आयुक्तांनी अधिक सक्रिय होऊन दुर्घटनेसंदर्भात कारवाई केली पण वैद्यकीय चाचणी उशिरा करणे, रक्ताचा नमुना बदलणे असे जे प्रकार घडले त्याबाबत पोलिसांनी व राज्य सरकारने तातडीने कारवाई केली असेही ते म्हणाले. 

राजकीय दबाव नाहीआमदार रोहित पवार यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेनंतर काही राजकीय नेते मंडळींनी दबाव टाकल्याचा आरोप चर्चेदरम्यान केला. मात्र, गृहमंत्री फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला. या प्रकरणी कोणत्याही मंत्र्यांचा पोलिसांना फोन आलेला नाही. स्थानिक आमदार पोलिस ठाण्यात गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आलेले आहे. त्याची नोंद घेण्यात आली आहे, मात्र याप्रकरणी कोणीही दबाव आणलेला नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघात