शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

Vidhan Sabha 2019: पक्ष आंबेडकरी, अन् हाती कमळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 00:31 IST

रामदास यांनी स्वत:च्या पक्षाचे अस्तित्वच मिटवून टाकले आहे.

- संजीव साबडे 

नामांतराच्या लढ्यात सहभागी असलेले, रिपब्लिकन ऐक्यासाठी एके काळी प्रयत्न करणारे रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सोडून भाजप-शिवसेना युतीत प्रवेश केला, याला आता पाच वर्षे झाली. पण त्यांनी आतापर्यंत स्वत:च्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले होते. आघाडी असो वा युती, त्यांचे उमेदवार स्वत:च्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावरच लढले. तरीही त्यांचे उमेदवार कायमच पराभूत झाले. पण रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे स्वतंत्र अस्तित्व आठवले यांनी कायमच ठेवले. आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, असे ते सतत सांगत होते. या रामदास आठवलेंनी आता अचानक भाजपचे कमळच हाती घेतले आहे. त्यांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांचे विजयी झालेले उमेदवार कायदेशीर भाजपचेच असतील. त्यांना भाजपचा व्हिप पाळावा लागेल. प्रसंगी रिपब्लिकन पक्षाने भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेतली तरी या आमदारांना मात्र विधानसभेत भाजपच्या भूमिकेनुसारच वागावे लागेल, मतदान करावे लागेल.

रामदास यांनी स्वत:च्या पक्षाचे अस्तित्वच मिटवून टाकले आहे. त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उघडपणे भाजपचा जयजयकार करावा लागेल, भाजपचा झेंडा हातात मिरवावा लागेल आणि भाजपच्या कमळ या चिन्हावर शिक्का मारा, असे मतदारांना सांगावे लागेल. भाजप व कायम हिंदू राष्ट्राची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही... ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यावर माझा विश्वास नाही आणि मी कधीही त्यांची पूजा करणार नाही’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आठवले व त्यांच्या अनुयायांना निवडणुका जिंकण्यासाठी कमळ हाती घेताना डॉ. आंबेडकर यांच्या या विचारांचा विसर पडला की त्यांना आता त्या विचारांचे देणेघेणे राहिले नाही?

निवडणुका येतात आणि जातात. रिपब्लिकन पक्षांच्या विविध गटांना कधीच निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळाले नाही. पण एक विशिष्ट विचार घेऊ न पुढे जाणारा पक्ष म्हणून या गटांची गणना होत असे. मराठवाडा, विदर्भ, नाशिक, कोकण अशा प्रकारे रिपब्लिकन नेत्यांनी पक्षाची शकले करून दाखवली. इतके गट झाले की ते स्वबळावर कधीच निवडून येणार नाही, अशी अवस्था झाली. या गटांचा वापर काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता पार्टी, जनता दल या सर्वांनी वेळोवेळी करून घेतला. नेत्यांना सत्तास्थाने दिली. त्यावर नेते खूश आणि नेत्यांमार्फंत आपल्याला काही तरी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असे. तरीही या गटांचे वेगळेपण कायम राहिले. कवाडे, गवई, आंबेडकर, खोब्रागडे, दाणी, गाणार, कांबळे असे असंख्य गट आंबेडकरी जनतेने पाहिले. पण त्यांच्या हाती काहीच आले नाही, तर प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाचा अप्रत्यक्ष फायदाही भाजपलाच होत आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असे आवाहन आपल्या बांधवांना केले. रा. स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातच त्यांनी लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. पण त्यांचे अनुयायी त्यांची संघटित व्हा ही शिकवणही विसरून चालले आहेत आणि संघर्षाऐवजी सत्ताच त्यांना महत्त्वाची झाली आहे. यापेक्षा मायावती चांगल्या. त्यांनी बाबासाहेबांचा विचार सांगून उत्तर प्रदेशातील सत्ता मिळवून दाखवली. त्यांनी भाजपशी अशी जवळीक कधी केली नाही. आता आठवलेंना आंबेडकरी विचारांचे पाईक म्हणावे का, असा प्रश्न त्यांनी काही अनुयायांना तरी पडला असेल.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019