शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: पक्ष आंबेडकरी, अन् हाती कमळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 00:31 IST

रामदास यांनी स्वत:च्या पक्षाचे अस्तित्वच मिटवून टाकले आहे.

- संजीव साबडे 

नामांतराच्या लढ्यात सहभागी असलेले, रिपब्लिकन ऐक्यासाठी एके काळी प्रयत्न करणारे रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सोडून भाजप-शिवसेना युतीत प्रवेश केला, याला आता पाच वर्षे झाली. पण त्यांनी आतापर्यंत स्वत:च्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले होते. आघाडी असो वा युती, त्यांचे उमेदवार स्वत:च्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावरच लढले. तरीही त्यांचे उमेदवार कायमच पराभूत झाले. पण रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे स्वतंत्र अस्तित्व आठवले यांनी कायमच ठेवले. आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, असे ते सतत सांगत होते. या रामदास आठवलेंनी आता अचानक भाजपचे कमळच हाती घेतले आहे. त्यांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांचे विजयी झालेले उमेदवार कायदेशीर भाजपचेच असतील. त्यांना भाजपचा व्हिप पाळावा लागेल. प्रसंगी रिपब्लिकन पक्षाने भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेतली तरी या आमदारांना मात्र विधानसभेत भाजपच्या भूमिकेनुसारच वागावे लागेल, मतदान करावे लागेल.

रामदास यांनी स्वत:च्या पक्षाचे अस्तित्वच मिटवून टाकले आहे. त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उघडपणे भाजपचा जयजयकार करावा लागेल, भाजपचा झेंडा हातात मिरवावा लागेल आणि भाजपच्या कमळ या चिन्हावर शिक्का मारा, असे मतदारांना सांगावे लागेल. भाजप व कायम हिंदू राष्ट्राची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही... ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यावर माझा विश्वास नाही आणि मी कधीही त्यांची पूजा करणार नाही’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आठवले व त्यांच्या अनुयायांना निवडणुका जिंकण्यासाठी कमळ हाती घेताना डॉ. आंबेडकर यांच्या या विचारांचा विसर पडला की त्यांना आता त्या विचारांचे देणेघेणे राहिले नाही?

निवडणुका येतात आणि जातात. रिपब्लिकन पक्षांच्या विविध गटांना कधीच निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळाले नाही. पण एक विशिष्ट विचार घेऊ न पुढे जाणारा पक्ष म्हणून या गटांची गणना होत असे. मराठवाडा, विदर्भ, नाशिक, कोकण अशा प्रकारे रिपब्लिकन नेत्यांनी पक्षाची शकले करून दाखवली. इतके गट झाले की ते स्वबळावर कधीच निवडून येणार नाही, अशी अवस्था झाली. या गटांचा वापर काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता पार्टी, जनता दल या सर्वांनी वेळोवेळी करून घेतला. नेत्यांना सत्तास्थाने दिली. त्यावर नेते खूश आणि नेत्यांमार्फंत आपल्याला काही तरी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असे. तरीही या गटांचे वेगळेपण कायम राहिले. कवाडे, गवई, आंबेडकर, खोब्रागडे, दाणी, गाणार, कांबळे असे असंख्य गट आंबेडकरी जनतेने पाहिले. पण त्यांच्या हाती काहीच आले नाही, तर प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाचा अप्रत्यक्ष फायदाही भाजपलाच होत आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असे आवाहन आपल्या बांधवांना केले. रा. स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातच त्यांनी लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. पण त्यांचे अनुयायी त्यांची संघटित व्हा ही शिकवणही विसरून चालले आहेत आणि संघर्षाऐवजी सत्ताच त्यांना महत्त्वाची झाली आहे. यापेक्षा मायावती चांगल्या. त्यांनी बाबासाहेबांचा विचार सांगून उत्तर प्रदेशातील सत्ता मिळवून दाखवली. त्यांनी भाजपशी अशी जवळीक कधी केली नाही. आता आठवलेंना आंबेडकरी विचारांचे पाईक म्हणावे का, असा प्रश्न त्यांनी काही अनुयायांना तरी पडला असेल.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019