शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

VIDEO - टेमघरनंतर आता वडिवळे धरणातून पाणीगळती

By admin | Updated: September 9, 2016 22:13 IST

टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे.

ऑनलाइन लोकमत 
वडगाव मावळ, दि. ९ -  टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे. जलसंपदा विभागाने अनेक वर्षापासून दुरुस्ती व डागडुजी न केल्याने धरणाच्या भिंतीतून कारंजा सारखे पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यामुळे धरण परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी धरण सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. 
मावळ तालुक्यातील नाणो मावळात सुमारे 1.44 टीएमसी क्षमतेचे वडिवळे धरण आहे. या धरणाची निर्मिती 1978 मध्ये करण्यात आली. धरणाची पाणीसाठा क्षमता 40.87 दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा 30.39 दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचा कालवा व नदीपात्रद्वारे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकासाठी सुमारे सहा हजार हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे परिसरातील गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या दरवाजातून पाणी गळती होत असल्यामुळे रोज लाखो लिटर पाणी कालव्याद्वारे वाया जात आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून धरणाची डागडुजी न केल्यामुळे पाणी विसर्गाच्या दरवाजाच्या भागात सिमेंट निखळले असून, खडी वाहून गेली आहे. त्यामुळे भिंतीला छेद पडून त्यातून मोठय़ा प्रमाणात गळती वाढली आहे. संपूर्ण भिंतीवर पाणी गळती होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या धरण 100 टक्के भरलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पाया, भिंतीतून काही अंतरातून असलेली गळती ही कारंज्याप्रमाणो स्पष्ट दिसते. धरणाची गळती तातडीने न थांबविल्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 
स्थानिकांमध्ये असुरक्षितता.  
वडिवळे गावाजवळील कुंडलिका नदीवर बांधलेल्या वडिवळे धरणाला 38 वर्षे झाली आहेत. देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रंना या धरणातून पाणीपुरवठा होतो.  मात्र, धरणाची वेळोवेळी दुरुस्ती व देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे धरण्याच्या भिंतीची दुरवस्था झाली आहे. सांडव्यातून पाणी सोडले जाते, त्या ठिकाणी भिंतीचे सिमेंट निघून गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती सुरू झाली आहे. धरण परिसरात गोवित्री, करंजगाव, साबळेवाडी,कांबरे, कोडीवडे, नाणो, कोलवाडी, वालवंती, उदेवाडी , नवीन उकसान ही गावे आहेत. या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, धरणाची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 
 
‘‘धरणाच्या पाणीविसर्गाच्या ठिकाणी सिमेंट निघून गेल्यामुळे थोडय़ा प्रमाणात पाण्याचा पाझर येत आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.  मे-जून महिन्यांत धरणाची देखभाल दुरुस्ती केल्यामुळे पाण्याचा पाझर कमी झाला आहे. आता पुढील मे-जूनमध्ये पुन्हा देखभाल-दुरुस्तीचे काम केल्यास होणारा पाझर पूर्णपणो बंद होईल. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता पाझर चालू आहे. परंतु पाणी कमी झाल्यास देखभाल करून आम्ही तो पूर्ण नियंत्रणात आणू. धरण पूर्णपणो सुरक्षित आहे.’’
- रवी जाधव, अभियंता, वडिवळे धरण.