शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

VIDEO - टेमघरनंतर आता वडिवळे धरणातून पाणीगळती

By admin | Updated: September 9, 2016 22:13 IST

टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे.

ऑनलाइन लोकमत 
वडगाव मावळ, दि. ९ -  टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे. जलसंपदा विभागाने अनेक वर्षापासून दुरुस्ती व डागडुजी न केल्याने धरणाच्या भिंतीतून कारंजा सारखे पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यामुळे धरण परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी धरण सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. 
मावळ तालुक्यातील नाणो मावळात सुमारे 1.44 टीएमसी क्षमतेचे वडिवळे धरण आहे. या धरणाची निर्मिती 1978 मध्ये करण्यात आली. धरणाची पाणीसाठा क्षमता 40.87 दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा 30.39 दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचा कालवा व नदीपात्रद्वारे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकासाठी सुमारे सहा हजार हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे परिसरातील गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या दरवाजातून पाणी गळती होत असल्यामुळे रोज लाखो लिटर पाणी कालव्याद्वारे वाया जात आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून धरणाची डागडुजी न केल्यामुळे पाणी विसर्गाच्या दरवाजाच्या भागात सिमेंट निखळले असून, खडी वाहून गेली आहे. त्यामुळे भिंतीला छेद पडून त्यातून मोठय़ा प्रमाणात गळती वाढली आहे. संपूर्ण भिंतीवर पाणी गळती होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या धरण 100 टक्के भरलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पाया, भिंतीतून काही अंतरातून असलेली गळती ही कारंज्याप्रमाणो स्पष्ट दिसते. धरणाची गळती तातडीने न थांबविल्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 
स्थानिकांमध्ये असुरक्षितता.  
वडिवळे गावाजवळील कुंडलिका नदीवर बांधलेल्या वडिवळे धरणाला 38 वर्षे झाली आहेत. देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रंना या धरणातून पाणीपुरवठा होतो.  मात्र, धरणाची वेळोवेळी दुरुस्ती व देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे धरण्याच्या भिंतीची दुरवस्था झाली आहे. सांडव्यातून पाणी सोडले जाते, त्या ठिकाणी भिंतीचे सिमेंट निघून गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती सुरू झाली आहे. धरण परिसरात गोवित्री, करंजगाव, साबळेवाडी,कांबरे, कोडीवडे, नाणो, कोलवाडी, वालवंती, उदेवाडी , नवीन उकसान ही गावे आहेत. या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, धरणाची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 
 
‘‘धरणाच्या पाणीविसर्गाच्या ठिकाणी सिमेंट निघून गेल्यामुळे थोडय़ा प्रमाणात पाण्याचा पाझर येत आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.  मे-जून महिन्यांत धरणाची देखभाल दुरुस्ती केल्यामुळे पाण्याचा पाझर कमी झाला आहे. आता पुढील मे-जूनमध्ये पुन्हा देखभाल-दुरुस्तीचे काम केल्यास होणारा पाझर पूर्णपणो बंद होईल. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता पाझर चालू आहे. परंतु पाणी कमी झाल्यास देखभाल करून आम्ही तो पूर्ण नियंत्रणात आणू. धरण पूर्णपणो सुरक्षित आहे.’’
- रवी जाधव, अभियंता, वडिवळे धरण.