शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

VIDEO - टेमघरनंतर आता वडिवळे धरणातून पाणीगळती

By admin | Updated: September 9, 2016 22:13 IST

टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे.

ऑनलाइन लोकमत 
वडगाव मावळ, दि. ९ -  टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे. जलसंपदा विभागाने अनेक वर्षापासून दुरुस्ती व डागडुजी न केल्याने धरणाच्या भिंतीतून कारंजा सारखे पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यामुळे धरण परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी धरण सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. 
मावळ तालुक्यातील नाणो मावळात सुमारे 1.44 टीएमसी क्षमतेचे वडिवळे धरण आहे. या धरणाची निर्मिती 1978 मध्ये करण्यात आली. धरणाची पाणीसाठा क्षमता 40.87 दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा 30.39 दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचा कालवा व नदीपात्रद्वारे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकासाठी सुमारे सहा हजार हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे परिसरातील गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या दरवाजातून पाणी गळती होत असल्यामुळे रोज लाखो लिटर पाणी कालव्याद्वारे वाया जात आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून धरणाची डागडुजी न केल्यामुळे पाणी विसर्गाच्या दरवाजाच्या भागात सिमेंट निखळले असून, खडी वाहून गेली आहे. त्यामुळे भिंतीला छेद पडून त्यातून मोठय़ा प्रमाणात गळती वाढली आहे. संपूर्ण भिंतीवर पाणी गळती होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या धरण 100 टक्के भरलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पाया, भिंतीतून काही अंतरातून असलेली गळती ही कारंज्याप्रमाणो स्पष्ट दिसते. धरणाची गळती तातडीने न थांबविल्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 
स्थानिकांमध्ये असुरक्षितता.  
वडिवळे गावाजवळील कुंडलिका नदीवर बांधलेल्या वडिवळे धरणाला 38 वर्षे झाली आहेत. देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रंना या धरणातून पाणीपुरवठा होतो.  मात्र, धरणाची वेळोवेळी दुरुस्ती व देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे धरण्याच्या भिंतीची दुरवस्था झाली आहे. सांडव्यातून पाणी सोडले जाते, त्या ठिकाणी भिंतीचे सिमेंट निघून गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती सुरू झाली आहे. धरण परिसरात गोवित्री, करंजगाव, साबळेवाडी,कांबरे, कोडीवडे, नाणो, कोलवाडी, वालवंती, उदेवाडी , नवीन उकसान ही गावे आहेत. या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, धरणाची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 
 
‘‘धरणाच्या पाणीविसर्गाच्या ठिकाणी सिमेंट निघून गेल्यामुळे थोडय़ा प्रमाणात पाण्याचा पाझर येत आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.  मे-जून महिन्यांत धरणाची देखभाल दुरुस्ती केल्यामुळे पाण्याचा पाझर कमी झाला आहे. आता पुढील मे-जूनमध्ये पुन्हा देखभाल-दुरुस्तीचे काम केल्यास होणारा पाझर पूर्णपणो बंद होईल. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता पाझर चालू आहे. परंतु पाणी कमी झाल्यास देखभाल करून आम्ही तो पूर्ण नियंत्रणात आणू. धरण पूर्णपणो सुरक्षित आहे.’’
- रवी जाधव, अभियंता, वडिवळे धरण.