शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - टेमघरनंतर आता वडिवळे धरणातून पाणीगळती

By admin | Updated: September 9, 2016 22:13 IST

टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे.

ऑनलाइन लोकमत 
वडगाव मावळ, दि. ९ -  टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे. जलसंपदा विभागाने अनेक वर्षापासून दुरुस्ती व डागडुजी न केल्याने धरणाच्या भिंतीतून कारंजा सारखे पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यामुळे धरण परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी धरण सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. 
मावळ तालुक्यातील नाणो मावळात सुमारे 1.44 टीएमसी क्षमतेचे वडिवळे धरण आहे. या धरणाची निर्मिती 1978 मध्ये करण्यात आली. धरणाची पाणीसाठा क्षमता 40.87 दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा 30.39 दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचा कालवा व नदीपात्रद्वारे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकासाठी सुमारे सहा हजार हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे परिसरातील गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या दरवाजातून पाणी गळती होत असल्यामुळे रोज लाखो लिटर पाणी कालव्याद्वारे वाया जात आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून धरणाची डागडुजी न केल्यामुळे पाणी विसर्गाच्या दरवाजाच्या भागात सिमेंट निखळले असून, खडी वाहून गेली आहे. त्यामुळे भिंतीला छेद पडून त्यातून मोठय़ा प्रमाणात गळती वाढली आहे. संपूर्ण भिंतीवर पाणी गळती होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या धरण 100 टक्के भरलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पाया, भिंतीतून काही अंतरातून असलेली गळती ही कारंज्याप्रमाणो स्पष्ट दिसते. धरणाची गळती तातडीने न थांबविल्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 
स्थानिकांमध्ये असुरक्षितता.  
वडिवळे गावाजवळील कुंडलिका नदीवर बांधलेल्या वडिवळे धरणाला 38 वर्षे झाली आहेत. देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रंना या धरणातून पाणीपुरवठा होतो.  मात्र, धरणाची वेळोवेळी दुरुस्ती व देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे धरण्याच्या भिंतीची दुरवस्था झाली आहे. सांडव्यातून पाणी सोडले जाते, त्या ठिकाणी भिंतीचे सिमेंट निघून गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती सुरू झाली आहे. धरण परिसरात गोवित्री, करंजगाव, साबळेवाडी,कांबरे, कोडीवडे, नाणो, कोलवाडी, वालवंती, उदेवाडी , नवीन उकसान ही गावे आहेत. या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, धरणाची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 
 
‘‘धरणाच्या पाणीविसर्गाच्या ठिकाणी सिमेंट निघून गेल्यामुळे थोडय़ा प्रमाणात पाण्याचा पाझर येत आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.  मे-जून महिन्यांत धरणाची देखभाल दुरुस्ती केल्यामुळे पाण्याचा पाझर कमी झाला आहे. आता पुढील मे-जूनमध्ये पुन्हा देखभाल-दुरुस्तीचे काम केल्यास होणारा पाझर पूर्णपणो बंद होईल. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता पाझर चालू आहे. परंतु पाणी कमी झाल्यास देखभाल करून आम्ही तो पूर्ण नियंत्रणात आणू. धरण पूर्णपणो सुरक्षित आहे.’’
- रवी जाधव, अभियंता, वडिवळे धरण.