शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Video: साध्वी प्रज्ञा या देशद्रोहीची जीभ छाटली पाहिजे - संभाजी ब्रिगेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 16:54 IST

शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची 'जीभ' छाटली पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे. 

पुणे - भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. याचे तीव्र पडसाद ठिकठिकाणी उमटत आहे. सर्व स्तरातून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. हेमंत करकरे यांनी हिंदुत्ववादी व हिंदुत्वाच्या नावावर विकृत विचारसरणी पेरणाऱ्या भगव्या दहशतवाद्यांचा खरा चेहरा 'टरा-टरा' फाडून टाकला. परंतु 'शहिद हेमंत करकरे यांना मारल्यामुळे प्रज्ञा सिंह साध्वीचं सुतक संपलं...?' याचा अर्थ करकरे यांना मारणारे मास्टर माईंड व साध्वीचे बोलवते धनी आरएसएस रुपी कोण आहेत. हे भारतासमोर आज आलेला आहे. करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची 'जीभ' छाटली पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे. 

हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीनं अडकवलं, त्यांना सांगितलं होतं की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला, असं धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे. यावर संतोष शिंदे म्हणाले की, देशासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी हेमंत करकरे, विजय कामठे, विजय साळसकर यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ज्या दहशतवाद्यांनी त्यांना मारलं त्या दहशतवादाचा खोटा चेहरा भारतातील लोकशाही व न्यायव्यवस्थेनी ठेचला. हू किल्ड करकरे...'! याचा अर्थ शहीद करकरे, कामठे व साळसकर यांना मारणारे खरे आरोपी कोण आहेत भारतासमोर आलं पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह साध्वी आहे. अन्य ठिकाणच्या बॉम्बस्फोटाचे व दहशतवादी हल्ल्याच्या गटांमध्ये सुद्धा साध्वीचा हात आहे. ही देशद्रोही व्यक्ती भाजपकडून भोपाळमध्ये उमेदवारी 'भाजप' देते व ती घेते हे या देशाचे दुर्दैव आहे. भाजपचा खोटा देशभक्तीचा भुरका आज प्रज्ञा सिंह साध्वीने टरा-टरा फाडून टाकलेला आहे. अशा देशद्रोही व्यक्तीचे भाजप नेते व पंतप्रधान उमेदवारी देऊन समर्थन करतात हे या देशांमध्ये हिटलरशाही प्रस्थापित करण्याचे उत्तम उदाहरण आहे असा आरोपही संभाजी ब्रिगेडने केला.  

तसेच हा मनुवादी प्रकार आहे. त्याच्यामुळे भारतीय लोकशाहीवर व भारतीय न्यायव्यवस्थेवर प्रचंड वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रज्ञा सिंह साध्वीच्या या वादग्रस्त वक्तव्याचा संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व महाराष्ट्राच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असल्याचं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला