शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

VIDEO - मुस्लीम उभारतात ताबूत; हिंदू होतात खांदेकरी

By admin | Updated: October 12, 2016 20:20 IST

सुमारे चारशे वर्ष जुनी पारंपरिक प्रथा नाशिकमधील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांच्या दर्ग्याच्या परिसरात मोहरम काळात आजही पाळली जाते. या प्रथेतून हिंदू-मुस्लीम

- अझहर शेख/ आॅनलाइन लोकमतनाशिक, दि.12 - सुमारे चारशे वर्ष जुनी पारंपरिक प्रथा नाशिकमधील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांच्या दर्ग्याच्या परिसरात मोहरम काळात आजही पाळली जाते. या प्रथेतून हिंदू-मुस्लीम ऐक्य आज सायंकाळी पहावयास मिळणार आहे. पंधरा दिवसांचे अथक परिश्रम घेऊन मुस्लीम सय्यद कुटुंबियांनी अळीवच्या बियांपासून मानाचा ताबूत उभारला असून या ताबुताचे खांदेकरीची भूमिका ‘आशुरा’च्या निमित्ताने आज सायंकाळी आदिवासी हिंदू कोळी बांधव पार पाडणार आहे. या पारंपरिक प्रथेतून दरवर्षी नाशिकमध्ये मोहरम काळात राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा पहावयास मिळतो.नाशिक शहराच्या गावठाण परिसरात सारडा सर्कल भागात हजरत सय्यद इमामशहा बाबा यांचा दर्गा आहे. मुहर्रमच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ‘आशुरा’ला या ठिकाणी यात्रा भरते. आज बुधवारी (दि.१२) सकाळपासून यात्रोत्सवाची उत्साह या भागात पहावयास मिळत होता. संध्याकाळी येथील मानाचा अळीवचा ताबूत अर्थात ‘हालौ का ताजीया’ भाविकांच्या दर्शनासाठी दर्ग्याच्या मैदानात आणण्यात येणार आहे. हा ताबूत हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. कारण मुस्लीम बांधव पंधरा दिवस परिश्रम घेऊन बांबुच्या कामट्या, कापूस, अळीवच्या बियांपासून ताबुतची निर्मिती करतात. या ताबुतचे वैशिष्ट म्हणजे अखेरच्या दिवशी ‘आशुरा’ला पुर्णपणे ताबुत हिरवळीने नटलेला पहावयास मिळतो.वर्षानुवर्षे जुनी असलेली परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पाळली जाते. दोन दिवसांपासून दर्ग्याच्या परिसरात स्थापन करण्यात आलेला ताबुत दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे. महिलावर्गांची या ठिकाणी संध्याकाळी दर्शनासाठी व नवस करण्यासाठी गर्दी होते. या ताबुतावरील सजावट आकर्षक असते. या ताबुताचे आगळेपण व या परंपरेचे वैशिष्ट म्हणजे हिंदू-मुस्लीम बांधवांचा एकत्रित सहभाग. संध्याकाळी दिसणार हिंदू-मुस्लीम ऐक्यबुधवारी (दि.१२) संध्याकाळी सारडा सर्कलवरील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांच्या दर्ग्याच्या परिसरात सकाळपासून यात्रा भरली आहे. अळीवच्या हिरवळीचा तयार केलेला मानाचा ताबूत दर्ग्याच्या परिसरात दर्शनासाठी आदिवासी कोळी बांधव खांद्यावर घेऊन संध्याकाळी यात्रोत्सवामध्ये उभे राहणार आहे. अळीवच्या हिरवळीपासून तयार करण्यात आलेला ताबूत जातीय सलोख्याचे प्रतीक आहे. येथील कलीम सय्यद यांचे कुटुंबीयांनी पंधरा दिवस परिश्रम घेऊन ताबूत उभारला असून, पारंपरिक प्रथेप्रमारे आज ‘आशुरा’च्या संध्येला हिंदू कोळी बांधव ताबूतच्या खांदेकरीची भूमिका पार पाडणार आहे. यावेळी दर्गा परिसरात हिंदू-मुस्लीम बांधवांचे ऐक्य सालाबादप्रमाणे यावर्षीही पहावयास मिळणार आहे. ताबुताची ही परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षाहूनही अधिक जुनी असल्याचे सय्यद सांगतात. त्यांची सहाव्या पिढीकडून सध्या ही परंपरा जोपासली जात आहे.किमान सहा तास ताबूत खांद्यावरसायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास यात्रेमध्ये मानाचा अळीवचा ताबूत आणला जाणार आहे. यावेळी आदिवासी कोळी बांधव या ताबुताचे खांदेकरीची भुमिका पार पाडतील. रात्री बारा वाजेपर्यंत ताबूत खांद्यावर घेऊन उभे राहण्याची प्रथा आदिवासी कोळी बांधवांकडून तितक्याच श्रध्देने पाळली जाते. या ताबुताचे विसर्जन पाण्यात केले जात नाही तर दग्याच्या पाठीमागे खड्डा खोदून त्यामध्ये ताबूत दफन केला जातो. या ताबुतापुढे केलेले नवस पुर्ण होतात अशी हिंदू-मुस्लीम बांधवांची धारणा आहे. सुमारे आठ ते दहा आदिवासी तरुण खांदेकरी म्हणून अदलाबदल करत ताबुताला खांदा देतात.